शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोरोनामुळे फळ उत्पादक शेतकऱ्यांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 01:08 IST

मानोरी : कोरोनाच्या संकटाने हतबल झालेला शेतकरीच आता, व्यापारी-विक्रेता होऊन रस्त्यावर टरबूज, द्राक्ष विकताना राज्यमहामार्गांवर दिसून येत आहे.

मानोरी : कोरोनाच्या संकटाने हतबल झालेला शेतकरीच आता, व्यापारी-विक्रेता होऊन रस्त्यावर टरबूज, द्राक्ष विकताना राज्यमहामार्गांवर दिसून येत आहे. कवडीमोल दरात शेतमाल विकावा लागत असल्याने त्याचा पुढचे आर्थिक संकट अधिक गडद होत चालले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी आणि जमावबंदी लागू केल्याने बाजारपेठा, वाहतूक व्यवस्था बंद पडल्या आहेत. याबरोबरच गावोगाव सीमाबंदी सुरू झाली. गाव परिसरातील सर्वच आठवडे बाजार बंद झाले. स्थानिक खरेदीदार, व्यापारी नाहीत आणि निर्यातबंदीने लाखो रुपये खर्चून तयार केलेला शेतकऱ्यांचा शेतमाल शेतातच पडून आहे. वाढत्या उन्हाच्या चटक्याने नाशवंत असलेली टरबूज, द्राक्षे, पेरू, चिकू आदी फळे शेतात ठेवून करणार काय, असा विचार करून हतबल झालेला शेतकरीच आता व्यापारी होऊन रस्त्यावर टरबूज, द्राक्ष विकताना दिसून येत आहे. महामार्गांवरही अत्यावश्यक सेवा वगळून रहदारी पूर्णत: ठप्प असल्याने टरबूज, द्राक्षविक्रेत्यांना खरेदीदार भेटणेदेखील दुरापास्त झाल्याचे द्राक्ष उत्पादक विक्रेते शेतकरी प्रवीण मिटके यांच्यासह शंकर ठुबे, नितीन पेंढारकर, पांडुरंग गुंजाळ, आकाश भोसले यांनी सांगितले. द्राक्षांना १५ रुपये प्रतिकिलो, तर टरबूज १५ ते ३० रुपये प्रतिनग अशा कवडीमोल दराने विकण्याची नामुष्की यंदा शेतकºयांवर ओढवली आहे. आसमानी, सुलतानी संकटांशी सामना करत फळ उत्पादक शेतकरी वर्गाने लाखो रुपये खर्च करून व मोठ्या मेहनतीने द्राक्ष, टरबूज आदी फळपिके घेतली, मात्र कोरोनाच्या फटक्याने द्राक्ष आणि टरबूज उत्पादकांसह सर्वच शेतकºयांचे आर्थिक गणित पूर्णत: कोलमडून गेले आहे. 

टॅग्स :Nashikनाशिक