शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

कोरोनाने कांद्यालाही फोडला घाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 15:33 IST

हॉटेल व्यवसाय ठप्प : उठाव नसल्याने दरात घसरण

ठळक मुद्दे कोरोना इफेक्टने बाजारपेठ सगळ्यात जास्त बाधित

येवला : आधी अवकाळी पावसाचा फटका, नंतर निर्यातबंदीमुळे बसलेला धक्का आणि आता कोरोनाचा विळखा या दुष्टचक्रात कांदा उत्पादक सापडले असून, कोरोनामुळे हॉटेल्ससह अन्य व्यवसाय ठप्प झाल्याने कांद्याला बाजारपेठ मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा मेटाकुटीला आला आहे.जगभरात कोरोनाने दहशत निर्माण झाली आहे. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी प्रशासन, शासन यंत्रणा सज्ज असून, सर्वच स्तरावर काळजी घेतली जात आहे. मात्र, या कोरोना इफेक्टने बाजारपेठ सगळ्यात जास्त बाधित झाली आहे. त्यात कांंदा उत्पादक व व्यापारीवर्गाला मोठा फटका बसला आहे. यंदा उन्हाळ व रांगडा कांदा एकाच वेळी स्थानिक बाजारात आला आहे. परराज्यासह महाराष्ट्रात कांदा आवक वाढली आहे. त्यात भर म्हणून कोरोनामुळे हॉटेलसह इतर व्यवसाय ठप्प झाले, परिणामी कांद्याच्या मागणीत घट झाली आहे. मागणी घटल्याने दरात घसरण होत असून, कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. शासनाने अशा परिस्थितीत कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.कांदा काढणे आणि विकणेदेखील मुश्कीलकांद्याला मागच्या वेळेस पंधराशे ते दोन हजार रुपये पर्यंतचा दर होता. आता अकराशे ते आठशे रु पयांपर्यंत दर आहे. त्यामुळे कांदा काढणे आणि विकणेदेखील मुश्कील झाले आहे.- श्रावण जाधव, कांदा उत्पादक शेतकरी

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदा