शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

राहुल गांधींच्या पायलट- सुरक्षारक्षकांमध्ये वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 00:54 IST

ओझर विमानतळावर कॉँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानाचे पायलट उशिराने पोहोचल्याने त्यांची तपासणी करण्याच्या विषयावरून पायलट व विशेष सुरक्षा दल (एसपीजी) यांच्यात वाद झाला.

नाशिक : ओझर विमानतळावर कॉँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानाचे पायलट उशिराने पोहोचल्याने त्यांची तपासणी करण्याच्या विषयावरून पायलट व विशेष सुरक्षा दल (एसपीजी) यांच्यात वाद झाला. सुरक्षा दलाने माफी मागावी अन्यथा विमान न चालविण्याचा पायलटने निर्णय घेतला. दरम्यान, या दोघांच्या वादामुळे पोलीस व प्रशासनातील अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. अखेर राहुल गांधी यांनी दोघांचीही समजूत घालून स्वत: दिलगिरी व्यक्त करण्याचा इरादा बोलून दाखविल्यावर वातावरणातील तणाव निवळला. अर्धातासानंतर गांधी दिल्लीकडे रवाना झाले.राहुल गांधी यांचे शुक्रवारी रात्री ८ वाजता ओझर विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर ते रोडमार्गे संगमनेर येथे रवाना झाले. रात्री दहा वाजेपर्यंत जाहीर सभेला मार्गदर्शन केल्यानंतर गांधी यांनी संगमनेर येथेच मुक्काम केला. शनिवारी सकाळी त्यांनी ओझरकडे प्रयाण केले. राहुल गांधी ओझर येथे येण्यापूर्वी काही वेळ अगोदर त्यांच्या विमानाचे पायलट विमानतळावर पोहोचले. त्यावेळी तेथे तैनात असलेल्या एसपीजीने पायलटच्या ताब्यात असलेल्या बॅगेची तपासणी करण्याचा प्रयत्न केला. बॅगेची तपासणी झाल्याचे सांगितल्यावरही एसपीजी ठाम असल्याने वाद नको म्हणून पायलटने त्यांच्या हातात बॅग सोपविली. त्या बॅगेत एक पाऊच होते व त्याला कुलूप असल्याने ते उघडविण्याचा आग्रह पायलटने धरला. तथापि, पायलटने ‘तुम्ही तुमचे उघडून घ्या’ असे सांगितले. चार वर्षांपासून गांधी यांच्या विमानाचा पायलट म्हणून काम करीत असून, आजवर असा अनुभव आला नसल्याचे सांगितले. त्यामुळे दोघांमध्ये वाद झडला. दोघांचे भांडण सुरू झाल्याने राहुल गांधी यांची वाट पहात असलेले पोलीस, प्रशासनातील अधिकारी व कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली.‘आमची मानसिकता बिघडल्याने आता विमान चालवू शकत नाही’ अशी भूमिका पायलटने घेतली. दरम्यान, थोड्याच वेळात गांधी यांचे हेलिकॉप्टरचे लॅँडिंग झाले. त्यांना शहर अध्यक्ष शरद अहेर यांनी पायलट-एसपीजी यांच्यातील वादाची कल्पना दिली. गांधी यांनी वाद समजावून घेतल्यानंतर दोघांपैकी कोणीच कोणाची दिलगिरी व्यक्त करणार नाही, मीच दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हणत एसपीजी अधिकारी व पायलट यांच्याशी संवाद साधला. अखेर दोघांनीही समजूतदारपणा दाखविला व वादावर पडदा टाकण्यात आला.अग्निशामक दलाच्या वाहनात गांधी बसलेपायलट-एसपीजी दोघांमधील वाद मिटल्यानंतर पायलटने विमान सुरू केले. उड्डाणासाठी वीस मिनिटे शिल्लक असल्याने राहुल गांधी यांचे अग्निशामक दलाच्या पथकाकडे लक्ष गेले. तेथे गेल्यावर त्यांनी अग्निशामक दलाच्या बंबावर चढून चालक व जवानाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पायलट-एसपीजी यांच्यात झालेल्या वादाची कहाणीही त्यांना सांगून टाकली.

टॅग्स :AirportविमानतळNashikनाशिकRahul Gandhiराहुल गांधीpilotवैमानिक