शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या पायलट- सुरक्षारक्षकांमध्ये वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 00:54 IST

ओझर विमानतळावर कॉँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानाचे पायलट उशिराने पोहोचल्याने त्यांची तपासणी करण्याच्या विषयावरून पायलट व विशेष सुरक्षा दल (एसपीजी) यांच्यात वाद झाला.

नाशिक : ओझर विमानतळावर कॉँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानाचे पायलट उशिराने पोहोचल्याने त्यांची तपासणी करण्याच्या विषयावरून पायलट व विशेष सुरक्षा दल (एसपीजी) यांच्यात वाद झाला. सुरक्षा दलाने माफी मागावी अन्यथा विमान न चालविण्याचा पायलटने निर्णय घेतला. दरम्यान, या दोघांच्या वादामुळे पोलीस व प्रशासनातील अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. अखेर राहुल गांधी यांनी दोघांचीही समजूत घालून स्वत: दिलगिरी व्यक्त करण्याचा इरादा बोलून दाखविल्यावर वातावरणातील तणाव निवळला. अर्धातासानंतर गांधी दिल्लीकडे रवाना झाले.राहुल गांधी यांचे शुक्रवारी रात्री ८ वाजता ओझर विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर ते रोडमार्गे संगमनेर येथे रवाना झाले. रात्री दहा वाजेपर्यंत जाहीर सभेला मार्गदर्शन केल्यानंतर गांधी यांनी संगमनेर येथेच मुक्काम केला. शनिवारी सकाळी त्यांनी ओझरकडे प्रयाण केले. राहुल गांधी ओझर येथे येण्यापूर्वी काही वेळ अगोदर त्यांच्या विमानाचे पायलट विमानतळावर पोहोचले. त्यावेळी तेथे तैनात असलेल्या एसपीजीने पायलटच्या ताब्यात असलेल्या बॅगेची तपासणी करण्याचा प्रयत्न केला. बॅगेची तपासणी झाल्याचे सांगितल्यावरही एसपीजी ठाम असल्याने वाद नको म्हणून पायलटने त्यांच्या हातात बॅग सोपविली. त्या बॅगेत एक पाऊच होते व त्याला कुलूप असल्याने ते उघडविण्याचा आग्रह पायलटने धरला. तथापि, पायलटने ‘तुम्ही तुमचे उघडून घ्या’ असे सांगितले. चार वर्षांपासून गांधी यांच्या विमानाचा पायलट म्हणून काम करीत असून, आजवर असा अनुभव आला नसल्याचे सांगितले. त्यामुळे दोघांमध्ये वाद झडला. दोघांचे भांडण सुरू झाल्याने राहुल गांधी यांची वाट पहात असलेले पोलीस, प्रशासनातील अधिकारी व कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली.‘आमची मानसिकता बिघडल्याने आता विमान चालवू शकत नाही’ अशी भूमिका पायलटने घेतली. दरम्यान, थोड्याच वेळात गांधी यांचे हेलिकॉप्टरचे लॅँडिंग झाले. त्यांना शहर अध्यक्ष शरद अहेर यांनी पायलट-एसपीजी यांच्यातील वादाची कल्पना दिली. गांधी यांनी वाद समजावून घेतल्यानंतर दोघांपैकी कोणीच कोणाची दिलगिरी व्यक्त करणार नाही, मीच दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हणत एसपीजी अधिकारी व पायलट यांच्याशी संवाद साधला. अखेर दोघांनीही समजूतदारपणा दाखविला व वादावर पडदा टाकण्यात आला.अग्निशामक दलाच्या वाहनात गांधी बसलेपायलट-एसपीजी दोघांमधील वाद मिटल्यानंतर पायलटने विमान सुरू केले. उड्डाणासाठी वीस मिनिटे शिल्लक असल्याने राहुल गांधी यांचे अग्निशामक दलाच्या पथकाकडे लक्ष गेले. तेथे गेल्यावर त्यांनी अग्निशामक दलाच्या बंबावर चढून चालक व जवानाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पायलट-एसपीजी यांच्यात झालेल्या वादाची कहाणीही त्यांना सांगून टाकली.

टॅग्स :AirportविमानतळNashikनाशिकRahul Gandhiराहुल गांधीpilotवैमानिक