शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या पायलट- सुरक्षारक्षकांमध्ये वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 00:54 IST

ओझर विमानतळावर कॉँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानाचे पायलट उशिराने पोहोचल्याने त्यांची तपासणी करण्याच्या विषयावरून पायलट व विशेष सुरक्षा दल (एसपीजी) यांच्यात वाद झाला.

नाशिक : ओझर विमानतळावर कॉँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानाचे पायलट उशिराने पोहोचल्याने त्यांची तपासणी करण्याच्या विषयावरून पायलट व विशेष सुरक्षा दल (एसपीजी) यांच्यात वाद झाला. सुरक्षा दलाने माफी मागावी अन्यथा विमान न चालविण्याचा पायलटने निर्णय घेतला. दरम्यान, या दोघांच्या वादामुळे पोलीस व प्रशासनातील अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. अखेर राहुल गांधी यांनी दोघांचीही समजूत घालून स्वत: दिलगिरी व्यक्त करण्याचा इरादा बोलून दाखविल्यावर वातावरणातील तणाव निवळला. अर्धातासानंतर गांधी दिल्लीकडे रवाना झाले.राहुल गांधी यांचे शुक्रवारी रात्री ८ वाजता ओझर विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर ते रोडमार्गे संगमनेर येथे रवाना झाले. रात्री दहा वाजेपर्यंत जाहीर सभेला मार्गदर्शन केल्यानंतर गांधी यांनी संगमनेर येथेच मुक्काम केला. शनिवारी सकाळी त्यांनी ओझरकडे प्रयाण केले. राहुल गांधी ओझर येथे येण्यापूर्वी काही वेळ अगोदर त्यांच्या विमानाचे पायलट विमानतळावर पोहोचले. त्यावेळी तेथे तैनात असलेल्या एसपीजीने पायलटच्या ताब्यात असलेल्या बॅगेची तपासणी करण्याचा प्रयत्न केला. बॅगेची तपासणी झाल्याचे सांगितल्यावरही एसपीजी ठाम असल्याने वाद नको म्हणून पायलटने त्यांच्या हातात बॅग सोपविली. त्या बॅगेत एक पाऊच होते व त्याला कुलूप असल्याने ते उघडविण्याचा आग्रह पायलटने धरला. तथापि, पायलटने ‘तुम्ही तुमचे उघडून घ्या’ असे सांगितले. चार वर्षांपासून गांधी यांच्या विमानाचा पायलट म्हणून काम करीत असून, आजवर असा अनुभव आला नसल्याचे सांगितले. त्यामुळे दोघांमध्ये वाद झडला. दोघांचे भांडण सुरू झाल्याने राहुल गांधी यांची वाट पहात असलेले पोलीस, प्रशासनातील अधिकारी व कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली.‘आमची मानसिकता बिघडल्याने आता विमान चालवू शकत नाही’ अशी भूमिका पायलटने घेतली. दरम्यान, थोड्याच वेळात गांधी यांचे हेलिकॉप्टरचे लॅँडिंग झाले. त्यांना शहर अध्यक्ष शरद अहेर यांनी पायलट-एसपीजी यांच्यातील वादाची कल्पना दिली. गांधी यांनी वाद समजावून घेतल्यानंतर दोघांपैकी कोणीच कोणाची दिलगिरी व्यक्त करणार नाही, मीच दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हणत एसपीजी अधिकारी व पायलट यांच्याशी संवाद साधला. अखेर दोघांनीही समजूतदारपणा दाखविला व वादावर पडदा टाकण्यात आला.अग्निशामक दलाच्या वाहनात गांधी बसलेपायलट-एसपीजी दोघांमधील वाद मिटल्यानंतर पायलटने विमान सुरू केले. उड्डाणासाठी वीस मिनिटे शिल्लक असल्याने राहुल गांधी यांचे अग्निशामक दलाच्या पथकाकडे लक्ष गेले. तेथे गेल्यावर त्यांनी अग्निशामक दलाच्या बंबावर चढून चालक व जवानाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पायलट-एसपीजी यांच्यात झालेल्या वादाची कहाणीही त्यांना सांगून टाकली.

टॅग्स :AirportविमानतळNashikनाशिकRahul Gandhiराहुल गांधीpilotवैमानिक