शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

बाबारावांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान अमूल्यच

By admin | Updated: September 29, 2014 00:29 IST

वसुधा परांजपे : नवरात्रोत्सव व्याख्यानमाला

नाशिक : बाबाराव सावरकरांनी त्यांचे जीवन देशाला वाहून देशातील तरुणांपुढे एक आदर्श निर्माण केला. ब्रिटिशकाळात त्यांच्यावर खटला भरण्याची एकही संधी ब्रिटिशांनी सोडली नाही. पण बाबारावांनी हार न मानता जीवनाच्या अखेरपर्यंत लढा दिला, असे वसुधा परांजपे यांनी सांगितले. राणी लक्ष्मीबाई स्मारकात नवरात्रीनिमित्त आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या.बाबारावांनी स्वातंत्र्यलढ्यात देशासाठी जे योगदान दिले ते अमूल्य आहे. त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली. त्यावेळी विजेचा जीवघेणा प्रवाह त्यांच्यावर सोडून त्यांना मरणयातना भोगायला ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भाग पाडले. त्यांना वेडे ठरवून पायात बेड्या घातल्या गेल्या व नाशिकला पायी फिरविण्यात आले, तरी त्यांनी देशासाठीचा लढा सुरूच ठेवला, असेही त्या म्हणाल्या. तसेच यावेळी परांजपे यांनी सावरकर बंधूंचे स्वातंत्र्यलढ्यातील कार्य, अभिनव भारत चळवळ, हिंदू युवक संघटना यांची माहिती दिली. सावरकरयुगाचा प्रवास सांगून सावरकर कुटुंबीयांनी स्वातंत्र्यलढ्यात केलेले काम अतुलनीय असल्याचे त्या म्हणाल्या. नवरात्रोत्सवानिमित्त रोज राणी लक्ष्मीबाई स्मारकात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नऊ दिवस भजने, व्याख्याने, भोंडला, स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. (प्रतिनिधी)