शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

नाशिकमध्ये जलजीवनचे काम संपले, कंत्राटी अभियंते तहानलेले; नऊ महिन्यांपासून विनावेतन काम

By श्याम बागुल | Updated: July 29, 2023 17:08 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून दोन वर्षांपूर्वी जलजीवन मिशन योजनेची घोेषणा करण्यात आली होती.

नाशिक : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘हर घर जल’ या जलजीवन मिशनचे काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची अवस्था ‘गरज सरो अन् वैद्य मरो’ अशी झाली असून, जिल्ह्यात जलजीवन मिशनची कामे सुरू होऊन घराघरात नळाद्वारे थेट पाणीपुरवठा सुरू झालेला असताना मात्र या कामासाठी दिवस-रात्र काम करणाऱ्या कंत्राटी अभियंत्यांना मात्र गेल्या नऊ महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. शिवाय काम संपल्यामुळे आता त्यांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतल्याने शासनाची इमानेइतबारे सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून दोन वर्षांपूर्वी जलजीवन मिशन योजनेची घोेषणा करण्यात आली होती. ग्रामीण भागातील जनतेला थेट घरात नळाद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या या योजनेची अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागावर सोपविण्यात आली. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे खासगी कंपनीच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने कनिष्ठ अभियंत्यांची मानधनावर नियुक्ती करण्यात आली होती. गावोगावी जाऊन तेथील पाण्याचे स्रोत शोधणे, त्याचे अंदाजपत्रक तयार करणे अशा सर्व प्रकारची कामे दिवस-रात्र या कंत्राटी अभियंत्यांकडून करून घेण्यात आली. प्रत्यक्षात ही कामे सुरू झाली. त्यातील काही कामे पूर्ण झाल्यानंतर त्याची तपासणी, देखरेख आदी कामे त्यांच्याकडून करून घेण्यात आली. मात्र, साधारणत: गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यापासून या कर्मचाऱ्यांना त्यांचे दरमहाचे वेतनापोटी दिले जाणारे मानधन देण्याचा जिल्हा परिषदेला विसर पडला.

टॅग्स :Nashikनाशिक