शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

भाज्या कडाडल्याने ग्राहक झाले हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:08 IST

आॅक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत चाललेला परतीचा पाऊस आणि दिवाळीच्या सुटीमुळे बाहेरगावी असलेल्या नाशिककरांमुळे शहरातील भाजीबाजार ओस पडले आहेत. भाज्यांची आवकदेखील कमी असल्याने गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.

नाशिक : आॅक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत चाललेला परतीचा पाऊस आणि दिवाळीच्या सुटीमुळे बाहेरगावी असलेल्या नाशिककरांमुळे शहरातील भाजीबाजार ओस पडले आहेत. भाज्यांची आवकदेखील कमी असल्याने गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.  ऐन सणासुदीच्या काळात गृहिणींचे बजेट कोलमडल्याने स्वयंपाक करावा तरी कसा, असा प्रश्न कायम सतावत आहे. नाशिक शहरातील पंचवटी, सातपूर, सिडको, इंदिरानगरसह नाशिकरोड परिसरातही भाज्यांचे दर कडाडले आहेत.शहरातील बाजारपेठेत सगळ्याच भाज्या उपलब्ध असल्या तरीही बाजारात नव्याने दाखल झालेल्या कांद्यांची ४० ते ५० रुपये किलोने विक्री होत आहे. नवा कांदा हा ओलसर असल्याने या कांद्याची साठवणूकदेखील करता येत नाही त्यामुळे या कांद्याला तुलनेने उठाव कमी आहे. परतीच्या पावसापूर्वी कांद्याचा भाव प्रतिक्विंटल २७०० ते ३००० असताना कांद्याची विक्री किरकोळ बाजारात २० रुपये ते ३० रुपये किलोने होत होती, परंतु आज कांद्याचा भाव प्रति क्विंटल २३०० ते २६०० रुपये असून, हाच भाव किरकोळ बाजारपेठेत ४० रुपये किलो असा आहे.  दिवाळीच्या सुटीत मेसचालकांचा व्यवसायान ेदेखील अपेक्षित गती घेतलेली नसल्याने बाजारपेठेतील भाज्यांना उठाव कमी आहे. बाजारभाव कडाडलेले असल्याने ग्राहकांना किलो, सव्वा किलो भाज्या खरेदीसाठी किमान शंभर रुपयांची नोट मोजावी लागत आहे. भाजीबाजार तसेच छोट्या गाड्यांवर टमाटा, भोपळा, फ्लॉवर, दोडके, वांगी, भेंडी, ढोबळी मिरची, वाल, कारली, गिलके आदी फळभाज्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत, मात्र या भाज्या ४० ते ८० रुपये किलो दराने विक्री होत असल्याने ग्राहकांचे दैनंदिन स्वयंपाकाचे सूत्र कोलमडले आहे.  पुढील आठवड्यात शाळा सुरू झाल्यानंतर तसेच नागरिक बाहेरगावाहून शहरात दाखल झाल्यानंतर शहरातील बाजार पेठेतील चित्र बदलेल, अशी अपेक्षा भाजी व्यावसायिकांनी केली आहे.समाधानकारक बाजारभावपरतीच्या पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका शेतमालाला बसला आहे. पावसामुळे आवक कमी झाली असली तरी शेतमालाला हमीभाव मिळतो आहे. चांगल्या बाजारभावामुळे उत्पादन खर्च तर निघतो शिवाय बळीराजाला आर्थिक फायदा होत आहे.  - युवराज पगारे, शेतकरीखिशाला आर्थिक फटकागेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कांद्यासाठी ४० ते ५० रुपये तर इतर भाज्यांच्या खरेदीसाठी ७० ते ८० रुपये मोजावे लागत असल्याने महिन्याचे आर्थिक गणित जुळवताना मोठी कसरत करावी लागते.  - गणेश परदेशी, ग्राहकदिवाळी सुटीचा परिणामआताच्या तुलनेत दिवाळीपूर्वी भाज्या स्वस्त होत्या. ऐन दिवाळीमध्ये भाज्यांचे दर वाढले असताना ग्राहक बाजारात खरेदीसाठी बाजारात फिरकत नसल्याचे चित्र आहे. सुटीनंतर बाजारात ग्राहकांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा  आहे.  - राजा अर्धापुरे, भाजीविक्रेताएरवी पर्याय उपलब्धदिवाळीच्या सुटीसाठी पाहुणे आलेले असताना भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. एरवी घरातील सदस्य असताना भाज्यांसाठी डाळ, वरण, खिचडी असे पर्याय उपलब्ध असतात, परंतु पाहुणे असताना दरवाढ असली तरीही भाज्या खरेदी कराव्याच लागतात.  - कल्पना माळवे, ग्राहक