शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भाज्या कडाडल्याने ग्राहक झाले हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:08 IST

आॅक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत चाललेला परतीचा पाऊस आणि दिवाळीच्या सुटीमुळे बाहेरगावी असलेल्या नाशिककरांमुळे शहरातील भाजीबाजार ओस पडले आहेत. भाज्यांची आवकदेखील कमी असल्याने गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.

नाशिक : आॅक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत चाललेला परतीचा पाऊस आणि दिवाळीच्या सुटीमुळे बाहेरगावी असलेल्या नाशिककरांमुळे शहरातील भाजीबाजार ओस पडले आहेत. भाज्यांची आवकदेखील कमी असल्याने गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.  ऐन सणासुदीच्या काळात गृहिणींचे बजेट कोलमडल्याने स्वयंपाक करावा तरी कसा, असा प्रश्न कायम सतावत आहे. नाशिक शहरातील पंचवटी, सातपूर, सिडको, इंदिरानगरसह नाशिकरोड परिसरातही भाज्यांचे दर कडाडले आहेत.शहरातील बाजारपेठेत सगळ्याच भाज्या उपलब्ध असल्या तरीही बाजारात नव्याने दाखल झालेल्या कांद्यांची ४० ते ५० रुपये किलोने विक्री होत आहे. नवा कांदा हा ओलसर असल्याने या कांद्याची साठवणूकदेखील करता येत नाही त्यामुळे या कांद्याला तुलनेने उठाव कमी आहे. परतीच्या पावसापूर्वी कांद्याचा भाव प्रतिक्विंटल २७०० ते ३००० असताना कांद्याची विक्री किरकोळ बाजारात २० रुपये ते ३० रुपये किलोने होत होती, परंतु आज कांद्याचा भाव प्रति क्विंटल २३०० ते २६०० रुपये असून, हाच भाव किरकोळ बाजारपेठेत ४० रुपये किलो असा आहे.  दिवाळीच्या सुटीत मेसचालकांचा व्यवसायान ेदेखील अपेक्षित गती घेतलेली नसल्याने बाजारपेठेतील भाज्यांना उठाव कमी आहे. बाजारभाव कडाडलेले असल्याने ग्राहकांना किलो, सव्वा किलो भाज्या खरेदीसाठी किमान शंभर रुपयांची नोट मोजावी लागत आहे. भाजीबाजार तसेच छोट्या गाड्यांवर टमाटा, भोपळा, फ्लॉवर, दोडके, वांगी, भेंडी, ढोबळी मिरची, वाल, कारली, गिलके आदी फळभाज्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत, मात्र या भाज्या ४० ते ८० रुपये किलो दराने विक्री होत असल्याने ग्राहकांचे दैनंदिन स्वयंपाकाचे सूत्र कोलमडले आहे.  पुढील आठवड्यात शाळा सुरू झाल्यानंतर तसेच नागरिक बाहेरगावाहून शहरात दाखल झाल्यानंतर शहरातील बाजार पेठेतील चित्र बदलेल, अशी अपेक्षा भाजी व्यावसायिकांनी केली आहे.समाधानकारक बाजारभावपरतीच्या पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका शेतमालाला बसला आहे. पावसामुळे आवक कमी झाली असली तरी शेतमालाला हमीभाव मिळतो आहे. चांगल्या बाजारभावामुळे उत्पादन खर्च तर निघतो शिवाय बळीराजाला आर्थिक फायदा होत आहे.  - युवराज पगारे, शेतकरीखिशाला आर्थिक फटकागेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कांद्यासाठी ४० ते ५० रुपये तर इतर भाज्यांच्या खरेदीसाठी ७० ते ८० रुपये मोजावे लागत असल्याने महिन्याचे आर्थिक गणित जुळवताना मोठी कसरत करावी लागते.  - गणेश परदेशी, ग्राहकदिवाळी सुटीचा परिणामआताच्या तुलनेत दिवाळीपूर्वी भाज्या स्वस्त होत्या. ऐन दिवाळीमध्ये भाज्यांचे दर वाढले असताना ग्राहक बाजारात खरेदीसाठी बाजारात फिरकत नसल्याचे चित्र आहे. सुटीनंतर बाजारात ग्राहकांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा  आहे.  - राजा अर्धापुरे, भाजीविक्रेताएरवी पर्याय उपलब्धदिवाळीच्या सुटीसाठी पाहुणे आलेले असताना भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. एरवी घरातील सदस्य असताना भाज्यांसाठी डाळ, वरण, खिचडी असे पर्याय उपलब्ध असतात, परंतु पाहुणे असताना दरवाढ असली तरीही भाज्या खरेदी कराव्याच लागतात.  - कल्पना माळवे, ग्राहक