शहरं
Join us  
Trending Stories
1
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
2
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
3
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
4
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
5
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
6
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
7
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
8
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
9
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
10
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
11
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
13
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
14
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
15
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
16
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
17
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
18
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
19
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
20
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  

भाज्या कडाडल्याने ग्राहक झाले हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:08 IST

आॅक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत चाललेला परतीचा पाऊस आणि दिवाळीच्या सुटीमुळे बाहेरगावी असलेल्या नाशिककरांमुळे शहरातील भाजीबाजार ओस पडले आहेत. भाज्यांची आवकदेखील कमी असल्याने गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.

नाशिक : आॅक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत चाललेला परतीचा पाऊस आणि दिवाळीच्या सुटीमुळे बाहेरगावी असलेल्या नाशिककरांमुळे शहरातील भाजीबाजार ओस पडले आहेत. भाज्यांची आवकदेखील कमी असल्याने गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.  ऐन सणासुदीच्या काळात गृहिणींचे बजेट कोलमडल्याने स्वयंपाक करावा तरी कसा, असा प्रश्न कायम सतावत आहे. नाशिक शहरातील पंचवटी, सातपूर, सिडको, इंदिरानगरसह नाशिकरोड परिसरातही भाज्यांचे दर कडाडले आहेत.शहरातील बाजारपेठेत सगळ्याच भाज्या उपलब्ध असल्या तरीही बाजारात नव्याने दाखल झालेल्या कांद्यांची ४० ते ५० रुपये किलोने विक्री होत आहे. नवा कांदा हा ओलसर असल्याने या कांद्याची साठवणूकदेखील करता येत नाही त्यामुळे या कांद्याला तुलनेने उठाव कमी आहे. परतीच्या पावसापूर्वी कांद्याचा भाव प्रतिक्विंटल २७०० ते ३००० असताना कांद्याची विक्री किरकोळ बाजारात २० रुपये ते ३० रुपये किलोने होत होती, परंतु आज कांद्याचा भाव प्रति क्विंटल २३०० ते २६०० रुपये असून, हाच भाव किरकोळ बाजारपेठेत ४० रुपये किलो असा आहे.  दिवाळीच्या सुटीत मेसचालकांचा व्यवसायान ेदेखील अपेक्षित गती घेतलेली नसल्याने बाजारपेठेतील भाज्यांना उठाव कमी आहे. बाजारभाव कडाडलेले असल्याने ग्राहकांना किलो, सव्वा किलो भाज्या खरेदीसाठी किमान शंभर रुपयांची नोट मोजावी लागत आहे. भाजीबाजार तसेच छोट्या गाड्यांवर टमाटा, भोपळा, फ्लॉवर, दोडके, वांगी, भेंडी, ढोबळी मिरची, वाल, कारली, गिलके आदी फळभाज्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत, मात्र या भाज्या ४० ते ८० रुपये किलो दराने विक्री होत असल्याने ग्राहकांचे दैनंदिन स्वयंपाकाचे सूत्र कोलमडले आहे.  पुढील आठवड्यात शाळा सुरू झाल्यानंतर तसेच नागरिक बाहेरगावाहून शहरात दाखल झाल्यानंतर शहरातील बाजार पेठेतील चित्र बदलेल, अशी अपेक्षा भाजी व्यावसायिकांनी केली आहे.समाधानकारक बाजारभावपरतीच्या पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका शेतमालाला बसला आहे. पावसामुळे आवक कमी झाली असली तरी शेतमालाला हमीभाव मिळतो आहे. चांगल्या बाजारभावामुळे उत्पादन खर्च तर निघतो शिवाय बळीराजाला आर्थिक फायदा होत आहे.  - युवराज पगारे, शेतकरीखिशाला आर्थिक फटकागेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कांद्यासाठी ४० ते ५० रुपये तर इतर भाज्यांच्या खरेदीसाठी ७० ते ८० रुपये मोजावे लागत असल्याने महिन्याचे आर्थिक गणित जुळवताना मोठी कसरत करावी लागते.  - गणेश परदेशी, ग्राहकदिवाळी सुटीचा परिणामआताच्या तुलनेत दिवाळीपूर्वी भाज्या स्वस्त होत्या. ऐन दिवाळीमध्ये भाज्यांचे दर वाढले असताना ग्राहक बाजारात खरेदीसाठी बाजारात फिरकत नसल्याचे चित्र आहे. सुटीनंतर बाजारात ग्राहकांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा  आहे.  - राजा अर्धापुरे, भाजीविक्रेताएरवी पर्याय उपलब्धदिवाळीच्या सुटीसाठी पाहुणे आलेले असताना भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. एरवी घरातील सदस्य असताना भाज्यांसाठी डाळ, वरण, खिचडी असे पर्याय उपलब्ध असतात, परंतु पाहुणे असताना दरवाढ असली तरीही भाज्या खरेदी कराव्याच लागतात.  - कल्पना माळवे, ग्राहक