शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भाज्या कडाडल्याने ग्राहक झाले हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:08 IST

आॅक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत चाललेला परतीचा पाऊस आणि दिवाळीच्या सुटीमुळे बाहेरगावी असलेल्या नाशिककरांमुळे शहरातील भाजीबाजार ओस पडले आहेत. भाज्यांची आवकदेखील कमी असल्याने गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.

नाशिक : आॅक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत चाललेला परतीचा पाऊस आणि दिवाळीच्या सुटीमुळे बाहेरगावी असलेल्या नाशिककरांमुळे शहरातील भाजीबाजार ओस पडले आहेत. भाज्यांची आवकदेखील कमी असल्याने गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.  ऐन सणासुदीच्या काळात गृहिणींचे बजेट कोलमडल्याने स्वयंपाक करावा तरी कसा, असा प्रश्न कायम सतावत आहे. नाशिक शहरातील पंचवटी, सातपूर, सिडको, इंदिरानगरसह नाशिकरोड परिसरातही भाज्यांचे दर कडाडले आहेत.शहरातील बाजारपेठेत सगळ्याच भाज्या उपलब्ध असल्या तरीही बाजारात नव्याने दाखल झालेल्या कांद्यांची ४० ते ५० रुपये किलोने विक्री होत आहे. नवा कांदा हा ओलसर असल्याने या कांद्याची साठवणूकदेखील करता येत नाही त्यामुळे या कांद्याला तुलनेने उठाव कमी आहे. परतीच्या पावसापूर्वी कांद्याचा भाव प्रतिक्विंटल २७०० ते ३००० असताना कांद्याची विक्री किरकोळ बाजारात २० रुपये ते ३० रुपये किलोने होत होती, परंतु आज कांद्याचा भाव प्रति क्विंटल २३०० ते २६०० रुपये असून, हाच भाव किरकोळ बाजारपेठेत ४० रुपये किलो असा आहे.  दिवाळीच्या सुटीत मेसचालकांचा व्यवसायान ेदेखील अपेक्षित गती घेतलेली नसल्याने बाजारपेठेतील भाज्यांना उठाव कमी आहे. बाजारभाव कडाडलेले असल्याने ग्राहकांना किलो, सव्वा किलो भाज्या खरेदीसाठी किमान शंभर रुपयांची नोट मोजावी लागत आहे. भाजीबाजार तसेच छोट्या गाड्यांवर टमाटा, भोपळा, फ्लॉवर, दोडके, वांगी, भेंडी, ढोबळी मिरची, वाल, कारली, गिलके आदी फळभाज्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत, मात्र या भाज्या ४० ते ८० रुपये किलो दराने विक्री होत असल्याने ग्राहकांचे दैनंदिन स्वयंपाकाचे सूत्र कोलमडले आहे.  पुढील आठवड्यात शाळा सुरू झाल्यानंतर तसेच नागरिक बाहेरगावाहून शहरात दाखल झाल्यानंतर शहरातील बाजार पेठेतील चित्र बदलेल, अशी अपेक्षा भाजी व्यावसायिकांनी केली आहे.समाधानकारक बाजारभावपरतीच्या पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका शेतमालाला बसला आहे. पावसामुळे आवक कमी झाली असली तरी शेतमालाला हमीभाव मिळतो आहे. चांगल्या बाजारभावामुळे उत्पादन खर्च तर निघतो शिवाय बळीराजाला आर्थिक फायदा होत आहे.  - युवराज पगारे, शेतकरीखिशाला आर्थिक फटकागेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कांद्यासाठी ४० ते ५० रुपये तर इतर भाज्यांच्या खरेदीसाठी ७० ते ८० रुपये मोजावे लागत असल्याने महिन्याचे आर्थिक गणित जुळवताना मोठी कसरत करावी लागते.  - गणेश परदेशी, ग्राहकदिवाळी सुटीचा परिणामआताच्या तुलनेत दिवाळीपूर्वी भाज्या स्वस्त होत्या. ऐन दिवाळीमध्ये भाज्यांचे दर वाढले असताना ग्राहक बाजारात खरेदीसाठी बाजारात फिरकत नसल्याचे चित्र आहे. सुटीनंतर बाजारात ग्राहकांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा  आहे.  - राजा अर्धापुरे, भाजीविक्रेताएरवी पर्याय उपलब्धदिवाळीच्या सुटीसाठी पाहुणे आलेले असताना भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. एरवी घरातील सदस्य असताना भाज्यांसाठी डाळ, वरण, खिचडी असे पर्याय उपलब्ध असतात, परंतु पाहुणे असताना दरवाढ असली तरीही भाज्या खरेदी कराव्याच लागतात.  - कल्पना माळवे, ग्राहक