शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

राष्ट्रवादी महिला कॉँग्रेसचा संविधान मोर्चा

By श्याम बागुल | Updated: November 26, 2018 16:21 IST

शासनाचा जनविरोधी कारभाराचा निषेध म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने संविधान दिनानिमित्त संविधान मोर्चा काढण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शालिमार येथे निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

नाशिक : सध्याच्या केंद्र व राज्य सरकारने अनेक देशविरोधी निर्णय घेऊन भारतीय राज्यघटनेचा दुरुपयोग चालविला असल्यामुळे भारताची लोकशाही ही धोक्यात आली असल्याचा आरोप करून शासनाचा जनविरोधी कारभाराचा निषेध म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने संविधान दिनानिमित्त संविधान मोर्चा काढण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शालिमार येथे निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्वत:चा फायदा करून घेत असताना समाजातील इतर कुठल्याही घटकाला त्रास होता कामा नये, अशी आपल्याला संविधानाची शिकवण आहे. मात्र आज देशभरात ज्या प्रकारच्या घटना घडत आहेत, त्यात सत्ताधारी स्वत:च्या फायद्याच्या गोष्टींवर लक्ष देत आहेत. त्यामध्ये संविधानांच्या अनेक मूल्यांना धक्का बसल्याचे आढळत आहे. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी आपले रक्त सांडले म्हणून आपण सर्व देशात शांतीने वावरत आहोत. त्याचमुळे आपल्याला संविधानाने मूलभूत अधिकार दिले. मात्र शासन त्या अधिकारावर गदा आणत असून, संविधानातील नमूद केलेल्या समानता, एकता, बंधुभाव, स्वातंत्र्य या मूल्यांचे पालन होताना दिसून येत नाही. महिला व बालकांवर होणारे अत्याचार, सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणे तसेच दलित व मागासवर्गीय समाजावर होणाºया अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, समाजात अशांतता पसरली आहे. प्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्ष अनिता भामरे, दिंडोरी लोकसभा कार्याध्यक्षा डॉ. भारती पवार, विजयश्री चुंभळे, समिना मेमन, कविता कर्डक पुष्पलता उदावंत, मेघा दराडे, संगीता राऊत, पूनम गवळी, सरला गायकवाड, आफरीन सय्यद, नंदा काळे, वनिता सिंग, संध्या भगत, कांचना रेवगडे आदी उपस्थित होत्या. 

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक