शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

दिलासा : किमान तपमानाचा पारा दोन अंशांनी वर सरकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 19:39 IST

नाशिक : मागील तीन दिवसांपासून शहराच्या किमान तपमानाचा पारा १० अंशांच्या खाली घसरला होता. यामुळे नाशिककर गारठले होते. थंडीच्या ...

ठळक मुद्देकिमान तपमानाचा पारा ११ अंशांपर्यंत वर सरकलागुरुवारी सकाळी वातावरणात आर्द्रताही वाढलेली होती. बहुतांश नागरिकांना सर्दी-पडशाचा त्रास

नाशिक : मागील तीन दिवसांपासून शहराच्या किमान तपमानाचा पारा १० अंशांच्या खाली घसरला होता. यामुळे नाशिककर गारठले होते. थंडीच्या तीव्रतेत प्रचंड वाढ झाल्याने नागरिकांना हुडहुडी भरली होती; मात्र गुरुवारी (दि.१३) थंडीच्या कडाक्यापासून काही अंशी दिलासा मिळाला.गुरुवारी पहाटे थंडीची तीव्रता जाणवली; मात्र दोन दिवसांच्या थंडीच्या तुलनेत काहीसा प्रभाव कमी होता. सकाळी ९ वाजेनंतर थंडी गायब झाल्याचा अनुभव नागरिकांना आला. त्यामुळे दोन दिवसांपासून दिवसभर उबदार कपडे परिधान करण्यास पसंती देणाऱ्या नागरिकांनी गुरुवारी सकाळी काही तास आणि संध्याकाळी चाकरमान्यांनी घराकडे परतताना उबदार कपड्यांचा वापर करताना दिसून आले. गुरुवारी कमाल तपमान २८.५ इतके नोंदविले गेले. किमान तपमानाचा पारा ११ अंशांपर्यंत वर सरकला. यामुळे थंडीची तीव्रता कमी झालेच्या अनुभव नागरिकांना आला.या हंगामात सर्वाधिक नीचांकी किमान तपमान मंगळवारी (दि.११) ९.४ अंश इतके तपमान नोंदविले गेले होते. सलग दोन दिवस किमान तपमान इतके राहिल्याने नाशिककर गारठले होते. निफ ाड तालुक्याचा पारा थेट ८.८ अंशांपर्यंत खाली आला होता. बुधवारी किमान तपमानात किंचित बदल होऊन ९.६ अंश इतके तपमान नोंदविले गेले होते. त्यामुळे थंडीचा कडाका कायम होता. वाढत्या थंडीमुळे रस्त्यांवर पहाटे तसेच संध्याकाळनंतर शेकोट्या पेटू लागल्या होत्या. गोदाकाठालगत उघड्यावर राहणा-या आदिवासी मजुरांच्या वस्तींना शेकोट्यांचा एकमेव आधार होता. कारण नदीकाठ असल्यामुळे बोच-या थंडीचा कडाका या भागात अधिक जाणवत होता.किमान तपमान दोन अंशांनी वाढले असले तरी किमान तपमानात खूप काही फरक गुरुवारी दिसून आला नाही. तसेच दोन दिवसांच्या तुलनेत गुरुवारी सकाळी वातावरणात आर्द्रताही वाढलेली होती. सकाळी ८९ टक्के, तर संध्याकाळी ३३ टक्के इतकी आर्द्रता मोजण्यात मागील आठवड्यात ८३ टक्के हा आर्द्रतेचा उच्चांक राहिला होता. एकूणच वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण कायम असल्यामुळे त्वचेची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. मागील तीन दिवस किमान तपमानाचा पारा घसरल्यामुळे बहुतांश नागरिकांना सर्दी-पडशाचा त्रासही जाणवायला सुरुवात झाली होती. सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.

टॅग्स :weatherहवामानTemperatureतापमानNashikनाशिक