शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
3
जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास
4
शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर
5
यू टर्न की मास्टरस्ट्रोक? जनतेच्या खिशातून अधिकचेच पैसे काढले; ८ वर्षांनी सरकारच्या लक्षात आले
6
मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे
7
कुजबुज! राज ठाकरेंचं एवढेच वाक्य वादळ ठरले; शिंदेसेनेच्या आमदाराने लगावला टोला, "आधी लोकांमधून.."
8
प्रवाशांनी लावला रेल्वेला चुना, त्यामुळे आता स्थानकात क्यूआर तिकीट बंद; प्रशासनाचा निर्णय
9
"मराठी माणूस एकटवला, म्हणून..."; निदर्शनांवर निर्बंधांच्या मागणीवरून मिलिंद देवरांवर टीकेची झोड 
10
जीआरवर उगाच संभ्रम निर्माण केला जातोय; दगाफटका केला तर सुपडा साफ होईल, मनोज जरांगेंचा इशारा
11
ओ देवाभाऊ, तुही जात कंची? फडणवीसांवर विषारी टीका करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या नेतृत्वावर...
12
घटनात्मक गुंतागुंत! एखाद्या विधिमंडळ सदस्याने चुकीचे वर्तन केले तर त्याला शिक्षा कोण देणार?
13
२३ वर्षीय प्रियकर, ८३ वर्षीय प्रेयसी! अनोखी प्रेमकहाणी आली चर्चेत; मैत्रिणीच्या घरी गेला अन्...
14
पक्ष्यांसह विमानांच्या सुरक्षेवर आता ‘बर्डगार्ड’ ठेवणार वॉच; नवी मुंबई विमानतळ कंपनीची माहिती
15
३ वेळा १० थर, तरी विश्वविक्रम नाही; कुठेतरी पाणी मुरतंय, जय जवान गोविंदा पथकाचा आरोप
16
पत्नीने प्रेयसीसोबत लॉजवर पकडलं; घाबरलेल्या पतीने खाडीत मारली उडी, त्यानंतर 'असं' काही घडलं...
17
जगभ्रमंतीसाठी निघालेल्या नवी मुंबईच्या ट्रॅव्हल ब्लॉगरची दुचाकी इंग्लंडमध्ये चोरीला
18
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
19
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
20
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?

काँग्रेसचा मोदी सरकारविरोधात विश्वासघात मोर्चा, इंधन दरवाढीचा केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 13:36 IST

केंद्रातील मोदी सरकारच्या कारकिर्दीला चार वर्षे पूर्ण झाले असून या चार वर्षात मोदी सरकाने जनतेचा विश्वास घात केल्याचा अरोप करीत नाशिक शहर काँग्रेस कमिटीतर्फे शनिवारी (दि.26)शहरातून मोर्चा काढूून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देकाँग्रेसचे केंद्र सरकारविरोधात विश्वासघात आंदोलनपेट्रोल डीझेल दरवाढीचा काँग्रेसकडून निषेध भाजपा, मोदींनी जनतेची फसवणूक केल्याचा आरोप

नाशिक : केंद्रातील मोदी सरकारच्या कारकिर्दीला चार वर्षे पूर्ण झाले असून या चार वर्षात मोदी सरकाने जनतेचा विश्वास घात केल्याचा अरोप करीत नाशिक शहर काँग्रेस कमिटीतर्फे शनिवारी (दि.26)शहरातून मोर्चा काढूून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.परंतु चौथा शनिवारमुळे शासकीय कार्यालये बंद असल्याने तहसील दार अमित पवार यांनी आंदोलकांना सामोरे जाऊन काँग्रेच्या पदाधिकाऱ्यांकडून निवेदन स्विकारले.केंद्रात आणि राज्यातही भाजपचे सरकार असून या सरकारने निव्वळ आश्वासने देऊन जनतेची फसवणूकच केल्याचा आरोप काँग्रेसने केला असून या सरकारच्या या फसवणुकी विरोधात व वाढत्या पेट्रोल डिङोल दरवाढीच्या निषेधार्थ शहर कॉँग्रेसच्या कार्यकत्र्यानी काळ्य़ा पटय़ा बांधून व काळ्य़ा रंगाचा पेहराव करून जिल्हाधिकारी कार्यालयार्पयत मोर्चा काढला. महिला नेत्या व कार्यकत्र्यानीही काळ्य़ा रंगाच्या साडय़ांमध्ये मोर्चात सहभाग घेतला. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकत्र्यानी काँग्रेस कमिटीच्या कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयार्पयत चारचाकी वाहन ओढून व मोटरसायकलची अंत्ययात्र काढून पेट्रोल व डिङोल दरवाढीचा विरोध केला. यावेळी चार वर्षात मोदी सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरल्याची टिका करताना सामान्य व्यक्तींचे जीवन जगणो या सरकारमुळे कठीण झाले असून, नुकत्याच इंधनाच्या दरात झालेली वाढ पाहता महागाईला आमंत्रण देण्यात आले आहे. सरकारने दरवाढ तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. मोर्चा दरम्यान काँग्रेस कार्यकत्र्यानी भाजप सरकार विरोधी घोषणाबाजी करीत पेट्रोल व डिङोलची दरवाढ रद्ध करण्याची मागणी केली. यावेळी काँग्रेसचे विधान परिषद आमदार सुधीर तांबे, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणो, शहराध्यक्ष शरद अहेर, माजीमंत्री शोभा बच्छाव, बबलू खैरे, वत्सला अखैरे, संजय तुपसाखरे, सिराज कोकणी, किशोर बाफना. रमेश पवार, बाळासाहेब गामणो, गुलाम शेख, सुरेश मारू, गोपाल जगताप आदि पदाधिकारी व कार्यकत्र्यानी मोर्चात सहभाग घेत सरकारविरोधात निषेध नोंदवला.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीने जनतेला अनेक फसवी अश्वासने देऊन सत्ता मिळविली. परंतु मोदींनी सत्तवर आल्यानंतर जनतेचा विश्वासघात केला असून वाढते, पेट्रोल व डिङोलचे भाव, महागाई, बलात्कार, अत्याचार व जाचीय हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे काँग्रेसने आज विश्वासघात मोर्चा काढून मोदी सरकारचा निषेध नोंदवला आहे. - सुधीर तांबे, आमदार, पदवीधर मतदारसंघ, नाशिक

टॅग्स :agitationआंदोलनnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयcongressकाँग्रेस