शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

इंधन दरवाढीस कॉँग्रेसच जबाबदार : दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 01:00 IST

देशात वाढत असलेल्या इंधन दरवाढीच्या संदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कॉँग्रेसलाच जबाबदार ठरवले असून, त्यांनी इंधनाच्या किमती आंतरराष्टÑीय बाजाराशी संलग्न केल्यानेच हा प्रकार घडत असल्याची टीका त्यांनी शनिवारी (दि.१५) केली.

नाशिक : देशात वाढत असलेल्या इंधन दरवाढीच्या संदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कॉँग्रेसलाच जबाबदार ठरवले असून, त्यांनी इंधनाच्या किमती आंतरराष्टÑीय बाजाराशी संलग्न केल्यानेच हा प्रकार घडत असल्याची टीका त्यांनी शनिवारी (दि.१५) केली.खासगी कार्यक्रमासाठी आलेल्या रावसाहेब दानवे यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, आंतरराष्टÑीय बाजारपेठेत क्रुड आॅइलचे दर वाढले की भारतातही दर वाढतात, मात्र त्यासाठी कॉँग्रेस पक्षच जबाबदार असून त्यांच्या सत्तेच्या कालावधीत त्यांनी इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय बाजाराशी संलग्न केले आहेत. जीएसटीमध्ये इंधनाचा समावेश केल्यास त्याचे दर नियंत्रित होऊ शकतात. मात्र सर्वांचे एकमत झाले पाहिजे, असेही ते म्हणाले.गेल्या चार वर्षांच्या सत्ताकाळात भाजपाच्या मंत्र्यांवर कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचाराचा आरोप नाही. पंतप्रधानांनी जगभर फिरून आणललेल्या गुंतवणुकीपैकी सर्वाधिक ३५ टक्के गुंतवणूक महाराष्टÑात झाली आहे, असे सांगून दानवे यांनी विरोधकांच्या हल्लाबोलचा कोणताही परिणाम भाजपावर होणार नाही.राष्टÑवादी कॉंग्रेसने यापूर्वी चांदा ते बांदा यात्रा काढली होती. ज्या मार्गावरून ही यात्रा गेली त्या सर्वच मार्गांवरील नगरपालिकेत भाजपाला सत्ता मिळाली आहे. त्यामुळे आताही हल्लाबोल आंदोलनाचा परिणाम होणार नाही असे सांगून भारिप आणि एमआयएम युतीचा भाजपावर परिणाम होणार नाही. गेल्यावेळी लोकसभेच्या २३ जागा भाजपाने जिंकल्या होत्या त्यापेक्षा जास्त जागा यंदा भाजपा महाराष्टÑात जिंकेल, असाही दावा त्यांनी केला आहे.

टॅग्स :BJPभाजपाRaosaheb Danweरावसाहेब दानवे