शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
3
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
4
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
5
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
8
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
9
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
10
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
11
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
12
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
13
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
14
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
17
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
18
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
19
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
20
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले

इंधन दरवाढीस कॉँग्रेसच जबाबदार : दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 01:00 IST

देशात वाढत असलेल्या इंधन दरवाढीच्या संदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कॉँग्रेसलाच जबाबदार ठरवले असून, त्यांनी इंधनाच्या किमती आंतरराष्टÑीय बाजाराशी संलग्न केल्यानेच हा प्रकार घडत असल्याची टीका त्यांनी शनिवारी (दि.१५) केली.

नाशिक : देशात वाढत असलेल्या इंधन दरवाढीच्या संदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कॉँग्रेसलाच जबाबदार ठरवले असून, त्यांनी इंधनाच्या किमती आंतरराष्टÑीय बाजाराशी संलग्न केल्यानेच हा प्रकार घडत असल्याची टीका त्यांनी शनिवारी (दि.१५) केली.खासगी कार्यक्रमासाठी आलेल्या रावसाहेब दानवे यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, आंतरराष्टÑीय बाजारपेठेत क्रुड आॅइलचे दर वाढले की भारतातही दर वाढतात, मात्र त्यासाठी कॉँग्रेस पक्षच जबाबदार असून त्यांच्या सत्तेच्या कालावधीत त्यांनी इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय बाजाराशी संलग्न केले आहेत. जीएसटीमध्ये इंधनाचा समावेश केल्यास त्याचे दर नियंत्रित होऊ शकतात. मात्र सर्वांचे एकमत झाले पाहिजे, असेही ते म्हणाले.गेल्या चार वर्षांच्या सत्ताकाळात भाजपाच्या मंत्र्यांवर कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचाराचा आरोप नाही. पंतप्रधानांनी जगभर फिरून आणललेल्या गुंतवणुकीपैकी सर्वाधिक ३५ टक्के गुंतवणूक महाराष्टÑात झाली आहे, असे सांगून दानवे यांनी विरोधकांच्या हल्लाबोलचा कोणताही परिणाम भाजपावर होणार नाही.राष्टÑवादी कॉंग्रेसने यापूर्वी चांदा ते बांदा यात्रा काढली होती. ज्या मार्गावरून ही यात्रा गेली त्या सर्वच मार्गांवरील नगरपालिकेत भाजपाला सत्ता मिळाली आहे. त्यामुळे आताही हल्लाबोल आंदोलनाचा परिणाम होणार नाही असे सांगून भारिप आणि एमआयएम युतीचा भाजपावर परिणाम होणार नाही. गेल्यावेळी लोकसभेच्या २३ जागा भाजपाने जिंकल्या होत्या त्यापेक्षा जास्त जागा यंदा भाजपा महाराष्टÑात जिंकेल, असाही दावा त्यांनी केला आहे.

टॅग्स :BJPभाजपाRaosaheb Danweरावसाहेब दानवे