शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

कॉँग्रेसचा जनसंघर्ष विरोधकांशी नव्हे स्वकीयांशीच

By श्याम बागुल | Updated: October 9, 2018 15:03 IST

जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथून सुरू झालेल्या दुस-या टप्प्यातील जनसंघर्ष यात्रेचे शनिवारी रात्री नाशिक जिल्ह्यात आगमन झाले. रविवारी दिवसभर मालेगाव, सटाणा, चांदवड येथे जाहीर सभा होवून सायंकाळी नाशिक शहरात यात्रा दाखल

नाशिक : केंद्र व राज्य सरकारच्या सत्तेविरूद्ध रस्त्यावर उतरलेल्या कॉँग्रेसच्या दुसऱ्या टप्प्यातील जनसंघर्ष यात्रेच्या नाशिक जिल्ह्याच्या दौ-याने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कॉँग्रेस विचारसरणीच्या कार्यकर्त्यांना काहीशी उभारी मिळाली असली तरी, या यात्रेच्या नियोजनात नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पदाधिका-यांनी हात अखडता घेणे व यात्रेच्या पार्श्वभुमीवर शहर व जिल्हाध्यक्ष बदलण्यासाठी शिष्टमंडळांनी जोरदार फिल्डींग लावणे या दोन्ही बाबी पाहता, जनसामान्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरलेल्या कॉँग्रेसला विरोधकांशी नव्हे तर स्वकीयांशीच संघर्ष करण्याची वेळ अजुनही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथून सुरू झालेल्या दुस-या टप्प्यातील जनसंघर्ष यात्रेचे शनिवारी रात्री नाशिक जिल्ह्यात आगमन झाले. रविवारी दिवसभर मालेगाव, सटाणा, चांदवड येथे जाहीर सभा होवून सायंकाळी नाशिक शहरात यात्रा दाखल झाली. पुर्वनियोजीत वेळेनुसार या यात्रेचे काहीसे उशिराने आगमन झाल्यामुळे पुढचे सारे नियोजन ढासळले. यात्रेच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांना ताटकळावे लागले तर सभाही दोन तास उशिराने सुरू झाल्यामुळे प्रमुख नेत्यांचे विचार ऐकण्यासाठी आलेल्या नाशिककरांनी सभास्थळावरून काढता पाय घेतला. रविवारी रात्री मुक्कामी व सोमवारी यात्रा नाशकात तळ ठोकून मंगळवारी पुढच्या दौºयासाठी रवाना होणार असल्याचे यापुर्वी जाहीर करण्यात आले होते. तथापि, नाशिक जिल्ह्यातील कॉँग्रेस पक्षाच्या एकूणच अवस्थेविषयी अवगत असलेल्या पक्ष नेतृत्वाने नाशिकचा दौरा एक दिवसाने कमी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु शनिवार, रविवार लागून दोन दिवस येत असल्यामुळे व पुढे नवरात्रौत्सव सुरू होत असल्यामुळे ही यात्रा नियोजीत दिवसातच पुर्ण करण्याचा प्रदेशने निर्णय घेतल्यामुळे नाशिकला दोन दिवस यात्रा थांबली तथापि, गंगाघाटावरील जाहीर सभा वगळता या यात्रेचे अस्तित्व शहरात कुठेच जाणवले नाही. त्यामागचे कारणेही अनेक असून, यात्रेच्या नियोजनासाठी येणाºया खर्चाची तजवीज कोणी करायची असा प्रश्न निर्माण झाला. ग्रामीण भागात तीन सभा व शहरात एक सभा असल्याने जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांवर त्याची जबाबदारी टाकण्यात आली असली तरी, यात्रेच्या पार्श्वभुमीवर जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष बदलण्याची मोहिम राबविण्यात आली. त्यामुळे ज्यांनी ही मोहीम राबविली त्यांच्यावर यात्रेच्या यशस्वीतेची जबाबदारी टाका असा पवित्रा घेवून त्यातून बेबनाव निर्माण झाला. परिणामी यात्रेच्या निमित्ताने विरोधकांशी संघर्ष करण्याऐवजी स्वकीयांशी लढण्याची वेळ स्थानिक नेतृत्वावर आली. आता हा संघर्ष पदाधिकारी बदलापर्यंत कायम राहील.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक