शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

कॉँग्रेसचा जनसंघर्ष विरोधकांशी नव्हे स्वकीयांशीच

By श्याम बागुल | Updated: October 9, 2018 15:03 IST

जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथून सुरू झालेल्या दुस-या टप्प्यातील जनसंघर्ष यात्रेचे शनिवारी रात्री नाशिक जिल्ह्यात आगमन झाले. रविवारी दिवसभर मालेगाव, सटाणा, चांदवड येथे जाहीर सभा होवून सायंकाळी नाशिक शहरात यात्रा दाखल

नाशिक : केंद्र व राज्य सरकारच्या सत्तेविरूद्ध रस्त्यावर उतरलेल्या कॉँग्रेसच्या दुसऱ्या टप्प्यातील जनसंघर्ष यात्रेच्या नाशिक जिल्ह्याच्या दौ-याने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कॉँग्रेस विचारसरणीच्या कार्यकर्त्यांना काहीशी उभारी मिळाली असली तरी, या यात्रेच्या नियोजनात नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पदाधिका-यांनी हात अखडता घेणे व यात्रेच्या पार्श्वभुमीवर शहर व जिल्हाध्यक्ष बदलण्यासाठी शिष्टमंडळांनी जोरदार फिल्डींग लावणे या दोन्ही बाबी पाहता, जनसामान्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरलेल्या कॉँग्रेसला विरोधकांशी नव्हे तर स्वकीयांशीच संघर्ष करण्याची वेळ अजुनही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथून सुरू झालेल्या दुस-या टप्प्यातील जनसंघर्ष यात्रेचे शनिवारी रात्री नाशिक जिल्ह्यात आगमन झाले. रविवारी दिवसभर मालेगाव, सटाणा, चांदवड येथे जाहीर सभा होवून सायंकाळी नाशिक शहरात यात्रा दाखल झाली. पुर्वनियोजीत वेळेनुसार या यात्रेचे काहीसे उशिराने आगमन झाल्यामुळे पुढचे सारे नियोजन ढासळले. यात्रेच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांना ताटकळावे लागले तर सभाही दोन तास उशिराने सुरू झाल्यामुळे प्रमुख नेत्यांचे विचार ऐकण्यासाठी आलेल्या नाशिककरांनी सभास्थळावरून काढता पाय घेतला. रविवारी रात्री मुक्कामी व सोमवारी यात्रा नाशकात तळ ठोकून मंगळवारी पुढच्या दौºयासाठी रवाना होणार असल्याचे यापुर्वी जाहीर करण्यात आले होते. तथापि, नाशिक जिल्ह्यातील कॉँग्रेस पक्षाच्या एकूणच अवस्थेविषयी अवगत असलेल्या पक्ष नेतृत्वाने नाशिकचा दौरा एक दिवसाने कमी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु शनिवार, रविवार लागून दोन दिवस येत असल्यामुळे व पुढे नवरात्रौत्सव सुरू होत असल्यामुळे ही यात्रा नियोजीत दिवसातच पुर्ण करण्याचा प्रदेशने निर्णय घेतल्यामुळे नाशिकला दोन दिवस यात्रा थांबली तथापि, गंगाघाटावरील जाहीर सभा वगळता या यात्रेचे अस्तित्व शहरात कुठेच जाणवले नाही. त्यामागचे कारणेही अनेक असून, यात्रेच्या नियोजनासाठी येणाºया खर्चाची तजवीज कोणी करायची असा प्रश्न निर्माण झाला. ग्रामीण भागात तीन सभा व शहरात एक सभा असल्याने जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांवर त्याची जबाबदारी टाकण्यात आली असली तरी, यात्रेच्या पार्श्वभुमीवर जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष बदलण्याची मोहिम राबविण्यात आली. त्यामुळे ज्यांनी ही मोहीम राबविली त्यांच्यावर यात्रेच्या यशस्वीतेची जबाबदारी टाका असा पवित्रा घेवून त्यातून बेबनाव निर्माण झाला. परिणामी यात्रेच्या निमित्ताने विरोधकांशी संघर्ष करण्याऐवजी स्वकीयांशी लढण्याची वेळ स्थानिक नेतृत्वावर आली. आता हा संघर्ष पदाधिकारी बदलापर्यंत कायम राहील.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक