शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

कॉँग्रेसचा जनसंघर्ष विरोधकांशी नव्हे स्वकीयांशीच

By श्याम बागुल | Updated: October 9, 2018 15:03 IST

जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथून सुरू झालेल्या दुस-या टप्प्यातील जनसंघर्ष यात्रेचे शनिवारी रात्री नाशिक जिल्ह्यात आगमन झाले. रविवारी दिवसभर मालेगाव, सटाणा, चांदवड येथे जाहीर सभा होवून सायंकाळी नाशिक शहरात यात्रा दाखल

नाशिक : केंद्र व राज्य सरकारच्या सत्तेविरूद्ध रस्त्यावर उतरलेल्या कॉँग्रेसच्या दुसऱ्या टप्प्यातील जनसंघर्ष यात्रेच्या नाशिक जिल्ह्याच्या दौ-याने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर कॉँग्रेस विचारसरणीच्या कार्यकर्त्यांना काहीशी उभारी मिळाली असली तरी, या यात्रेच्या नियोजनात नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पदाधिका-यांनी हात अखडता घेणे व यात्रेच्या पार्श्वभुमीवर शहर व जिल्हाध्यक्ष बदलण्यासाठी शिष्टमंडळांनी जोरदार फिल्डींग लावणे या दोन्ही बाबी पाहता, जनसामान्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरलेल्या कॉँग्रेसला विरोधकांशी नव्हे तर स्वकीयांशीच संघर्ष करण्याची वेळ अजुनही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथून सुरू झालेल्या दुस-या टप्प्यातील जनसंघर्ष यात्रेचे शनिवारी रात्री नाशिक जिल्ह्यात आगमन झाले. रविवारी दिवसभर मालेगाव, सटाणा, चांदवड येथे जाहीर सभा होवून सायंकाळी नाशिक शहरात यात्रा दाखल झाली. पुर्वनियोजीत वेळेनुसार या यात्रेचे काहीसे उशिराने आगमन झाल्यामुळे पुढचे सारे नियोजन ढासळले. यात्रेच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांना ताटकळावे लागले तर सभाही दोन तास उशिराने सुरू झाल्यामुळे प्रमुख नेत्यांचे विचार ऐकण्यासाठी आलेल्या नाशिककरांनी सभास्थळावरून काढता पाय घेतला. रविवारी रात्री मुक्कामी व सोमवारी यात्रा नाशकात तळ ठोकून मंगळवारी पुढच्या दौºयासाठी रवाना होणार असल्याचे यापुर्वी जाहीर करण्यात आले होते. तथापि, नाशिक जिल्ह्यातील कॉँग्रेस पक्षाच्या एकूणच अवस्थेविषयी अवगत असलेल्या पक्ष नेतृत्वाने नाशिकचा दौरा एक दिवसाने कमी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु शनिवार, रविवार लागून दोन दिवस येत असल्यामुळे व पुढे नवरात्रौत्सव सुरू होत असल्यामुळे ही यात्रा नियोजीत दिवसातच पुर्ण करण्याचा प्रदेशने निर्णय घेतल्यामुळे नाशिकला दोन दिवस यात्रा थांबली तथापि, गंगाघाटावरील जाहीर सभा वगळता या यात्रेचे अस्तित्व शहरात कुठेच जाणवले नाही. त्यामागचे कारणेही अनेक असून, यात्रेच्या नियोजनासाठी येणाºया खर्चाची तजवीज कोणी करायची असा प्रश्न निर्माण झाला. ग्रामीण भागात तीन सभा व शहरात एक सभा असल्याने जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांवर त्याची जबाबदारी टाकण्यात आली असली तरी, यात्रेच्या पार्श्वभुमीवर जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष बदलण्याची मोहिम राबविण्यात आली. त्यामुळे ज्यांनी ही मोहीम राबविली त्यांच्यावर यात्रेच्या यशस्वीतेची जबाबदारी टाका असा पवित्रा घेवून त्यातून बेबनाव निर्माण झाला. परिणामी यात्रेच्या निमित्ताने विरोधकांशी संघर्ष करण्याऐवजी स्वकीयांशी लढण्याची वेळ स्थानिक नेतृत्वावर आली. आता हा संघर्ष पदाधिकारी बदलापर्यंत कायम राहील.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक