शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

त्र्यंबकेश्वर नगरपालिकेला कंत्राटी कामगारांच्या वेतनाची चिंता

By admin | Updated: July 21, 2015 00:11 IST

निधींची टंचाई : महिन्यानंतर पालिकेचा गाडा चालविणे मुश्कील

 

त्र्यंबकेश्वर : सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर सध्या पालिका कार्यालयासह प्रत्येक विभागात कंत्राटी कामगार, नाका लिपिक, कार्यालयीन लिपीक, पाणीपुरवठा कुली असे मिळून जवळपास ५० ते ६० कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करीत आहेत. आॅगस्ट आणि सप्टेंबर या महिन्याचा पगार शासनाकडून मिळेल. पण वर्षभराच्या कालावधीसाठी शासन निधी देणार नाही. त्यामुळे यासाठी पैसा कसा उभा करावा असा यक्ष प्रश्न पालिका प्रशासनापुढे उभा राहिला आहे.नगरपालिकेला तशी कर्मचाऱ्यांची नितांत गरज आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर येथे दररोज २५ ते ३० हजार किंबहुना कधी कधी जास्तही संख्येने भाविक येऊ शकतात. जानेवारी महिन्यातील निवृत्तीनाथ यात्रा व महाशिवरात्रीच्या या सिंहस्थ कालावधीतच येणार आहेत. याशिवाय पालिकेची झालेली हद्दवाढ यामुळे मनुष्यबळाची गरज आवश्यक ठरणार आहे. एकिकडे शासन पालिकेत नवीन पदे मागू नये, गरज पडल्यास कंत्राटी पद्धतीने कामगार नियुक्तीचे आदेश दिले आहे तर दुसरीकडे कंत्राटी पद्धतीने जरी भरती केली तरी त्यांना किमान वेतन देण्याच्या सूचना आहेत. यापूर्वी रु. १८०/- रोजंदारी होती. त्यानंतर रु. २२५ रोज करण्यात आला. आता तसा दैनिक रोज ४२७ रुपये करावे असे आदेश खुद्द शासनाचेच आहे. अशा परिस्थितीत कारभार कसा करावा असा प्रश्न नगरपालिका प्रशासनासमोर उभा राहिला आहे. (वार्ताहर)