शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

कळवणला भरदिवसा घरफोड्या; लाखोंचा ऐवज गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 01:05 IST

१२ मे ही लग्नकार्याची दाट तिथी असल्याने बहुतांशी कळवणकर घरांना कुलूप लावून लग्नकार्याला बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत अट्टल घरफोड्यांनी चार ठिकाणी घरफोड्या करत लाखोंचा ऐवज लांबविला आहे. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला.

कळवण : १२ मे ही लग्नकार्याची दाट तिथी असल्याने बहुतांशी कळवणकर घरांना कुलूप लावून लग्नकार्याला बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत अट्टल घरफोड्यांनी चार ठिकाणी घरफोड्या करत लाखोंचा ऐवज लांबविला आहे. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला.  शहरातील वेगवेगळ्या भागात चार ठिकाणी बंद घरांचे कुलूप तोडून  भरदिवसा दुपारी २ ते ३ वाजेच्या सुमारास धाडसी चोऱ्या झाल्या. त्यामुळे  शहरातील नागरिकांमध्ये खळबळ  उडाली असून, भीतीचे वातावरण  पसरले आहे. रात्री उशिरा श्वान  पथकाला पाचारण करण्यात आल्याने उशिरा  गुन्हा दाखल झाला . कसमादे पट्ट्यात 12 मे लग्नाची शेवटची तिथी असल्याने शहरात व कॉलनी परिसरात दिवसभर शुकशुकाट होता. या संधीचा फायदा घेऊन चोरटयांनी आपला मोर्चा कळवण शहरातील गणेशनगर भागातील रेणुका कॉलनीतील कळवण पंचायत समतिीचे गटविकासधिकारी डी एम बिहरम, शिवनेरी कॉलनीतील भरत पाटील, ग्रामसेवक पवार हे संपूर्ण कुटुंबासह लग्न समारंभासाठी बाहेर गावी गेले होते. चप्पल बुटाचे व्यापारी गोविंद पंढरीनाथ मालपुरे हे आपल्या व्यापारी प्रतिष्ठानात गेले होते. दुपारच्या सुमारास उन्हाच्या तडाख्यामुळे काही नागरिक घरात झोपले असल्याचा फायदा घेत सर्वांच्या बंद घराचे कुलूप कोयंडा तोडून भरिदवसा धाडसी चोर्या केल्या आहेत.  या चोरीत लाखो रु पयांचा मुद्देमाल गेल्याने व दिवसा चोर्या झाल्याने कळवण शहरातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. या चोरीचा तपास लावण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. रात्री उशीराने श्वान पथक दाखल झालेल्या रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. या चोर्यांचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी देवीदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल फुला, विनोद जाधोर, पोलीस कर्मचारी करीत आहेत. 

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा