शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

बागलाण तालुक्यात सहा हजार घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 18:05 IST

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत बेघर व्यक्तींना तसेच मोडकळीस आलेल्या घरात राहणार्?यांना पक्की घरे बांधण्यासाठी भाजप सरकारकडून अर्थसाहाय्य करण्यात येत असून बागलाण तालुक्यातील सहा हजार घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासन किटबद्ध असल्याची ग्वाही संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी दिली.प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना या महत्वकांक्षी योजनेचा मेळावा डॉ.भामरे यांच्या उपस्थितीत सटाणा येथे घेण्यात आला त्यावेळी भामरे बोलत होते.

ठळक मुद्देसुभाष भामरे : सटाणा येथे लाभार्थी मेळावा

सटाणा : प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत बेघर व्यक्तींना तसेच मोडकळीस आलेल्या घरात राहणार्?यांना पक्की घरे बांधण्यासाठी भाजप सरकारकडून अर्थसाहाय्य करण्यात येत असून बागलाण तालुक्यातील सहा हजार घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासन किटबद्ध असल्याची ग्वाही संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी दिली.प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना या महत्वकांक्षी योजनेचा मेळावा डॉ.भामरे यांच्या उपस्थितीत सटाणा येथे घेण्यात आला त्यावेळी भामरे बोलत होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाकडून समाजातील गोरगरीब घटकांच्या उत्थानासाठी सर्वंकष प्रयत्न होत आहेत.त्याचाच एक भाग म्हणून आॅनलाइन प्रणाली स्वीकारण्यात आली असून पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान आॅनलाइन पद्धतीने थेट बँक खात्यात जमा होत आहे.त्यामुळे साहजिकच गरजू लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूक थांबली असून त्यांची दलालीपासून सुटका झाली आहे असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले.डॉ.भामरे यांच्या हस्ते तालुक्यातील पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना डॉ.भामरे यांनी बागलाण तालुक्यासाठी आगामी काळात घरकुल उिद्दष्ट वाढवून मिळण्याची मागणी करण्यात आल्याचे सांगून आपण त्या समतिीवर चेअरमन असल्याने तालुक्यासाठी अधिकाधिक घरकुले मंजूर करण्यात येतील अशी ग्वाही देखील त्यांनी उपस्थित नागरिकांना दिली.यावेळी त्यांनी मोदी शासनाकडून गोरगरीब वंचित घटकांसाठी सुरू असलेल्या विविध उपाययोजना आण िकार्यक्र मांची माहिती दिली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दादा जाधव,नेते डॉ. विलास बच्छाव, जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पाटील आदींची भाषणे झाली.तालुका गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी कार्यक्र माचे प्रास्ताविक करून मेळाव्याच्या आयोजनाबाबत माहिती दिली.कार्यक्र मासाठी प्रांताधिकारी प्रवीण महाजन,तहसीलदार प्रमोद हिले,पोलीस निरीक्षक वासुदेव देसले आदींसह डॉ.शेषराव पाटील,जिल्हा परिषद सदस्य मीना मोरे,कण्हू गायकवाड,साधना गवळी,लता बच्छाव,पंचायत समतिी सभापती विमल सोनवणे,उपसभापती शीतल कोर,सटाणा नगर पालिकेचे नगरसेवक,सटाणा व नामपूर बाजार समतिीचे संचालक व सर्व शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.मेळाव्यासाठी तालुक्यातून आलेले शेकडो घरकुल योजनेचे लाभार्थी उपस्थित होते.भाजपा सरकारने केली दलाली बंदकॉंग्रेस सरकारच्या काळात दिल्लीहून जर शंभर रु पये पाठविले तर गावापर्यंत केवळ दहा रु पये पोहचत होते.भाजप सरकारने यात कमालीच्या सुधारणा करत दिल्लीपासून ते गल्लीपर्यंतची दलाली बंद केली असून प्रत्येक योजनेचा पैसा थेट लाभार्थ्याच्या खात्यात वर्ग करून पारदर्शक काम सुरु केले आहे.यापलीकडेही शासनाच्या योजनेसाठी जर कोणी अधिकारी किवा कर्मचारी लाभार्थ्याकडे पैशांची मागणी करत असेल तर थेट माङयाकडे तक्र ार करा असेही त्यांनी भरसभेत सांगितल्याने उपस्थित लाभार्थ्यांनी टाळ्या वाजवून डॉ.भामरेंचे स्वागत केले.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक