शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

सुरगाण्यात  आढावा बैठकीत तक्रारींचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:07 IST

तालुक्यातील दुष्काळावर चर्चा करण्यासाठी दिंडोरी लोकसभेचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मंगळवारी (दि.१३) येथील तहसील कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन केले होते.

सुरगाणा : तालुक्यातील दुष्काळावर चर्चा करण्यासाठी दिंडोरी लोकसभेचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मंगळवारी (दि.१३) येथील तहसील कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन केले होते.  या बैठकीकडे वनविभाग अधिकारी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आदींसह अनेक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याने आढावा बैठकीत चर्चा करून तालुक्यात दुष्काळ जाहीर होणार ही अपेक्षाच फोल ठरली आहे. त्यामुळे तहसील कार्यालयात जमलेल्या नागरिकांनी उपस्थित अधिकारी वर्गावरच राग व्यक्त करीत संतापाला वाट मोकळी करून दिली. तालुक्यातील विकासकामांचा सुमार दर्जा पाहून खासदार चव्हाण यांनी चांगलेच खडेबोल सुनावले. तालुक्यात चांगली कामे करून दाखवा. दुष्काळाची चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली आहे. मात्र अधिकारीच गैरहजर आहेत. पाऊस कमी झाल्याने भात, नागली, वरई आदी पिके निसवलीच नाही, जी पिके जेमतेम निसवली त्यात दाणे भरले नाहीत. तालुके दुष्काळी जाहीर करताना शासनाने नेमके कोणते निकष लावले हे कळायला मार्ग नाही. पन्नास टक्केपेक्षाही कमी पीक आले आहे त्यामुळे आणेवारी पन्नास पैसांपेक्षा कमी जाहीर करून सरकारला कळवावी, अशी सूचना त्यांनी केली.आढावा बैठकीत मनखेड, पोहाळी, गारमाळ, दुर्गापूर, खुंटविहीर या अपूर्ण व रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार करणाºयांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सुरेश थवील व आनंदा झिरवाळ यांनी केली. काठीपाडा, पळसन येथील ग्रामपंचायतींत झालेल्या भष्टाचाराची चौकशी करून तत्काळ गुन्हे दाखल करण्याच्या सूचना खासदार चव्हाण यांनी दिल्या. सुरगाणा शहरातील बसस्थानकाजवळील पिण्याच्या पाण्याची विहीरच चोरीला गेली आहे तिचा तपास करावा, बसस्थानकातील अतिक्र मण हटवावे आदी मागण्या माजी नगराध्यक्ष रंजना लहरे यांनी केल्या. बैठकीदरम्यान शिक्षण, पाटबंधारे, महसूल, कृषी विभागाचा आढावा घेण्यात आला. यावेळी तालुक्यातील शेतकरी मोठ्याा संख्येने उपस्थित होते.तालुक्यातील वैद्यकीय सेवेचा बोजवारा उडाला आहे. बुबळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी घांघळे सतत गैरहजर राहात असल्याचे भास्कर चौधरी यांनी तक्र ार केली. पळसन येथे एकही वैद्यकीय अधिकारी नाही. तेथे कर्मचारीच गोळ्याऔषधे देतात. रात्री उपचारासाठी गेल्यावर रात्री दवाखान्यात येण्याची वेळ आहे का अशी विचारणा परिचारिकाकडून केली जाते, अशी तक्रार आमदाचे रामचंद्र जाधव यांनी केली. अंबाठा ते पिंपळसोंड, गुजरात सीमेलगतच्या रस्त्यावर गुडघाभर खड्डे पडले आहेत. तालुक्यात सीमेलगतच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यांची त्वरित दुरुस्ती करावी, तसेच गॅसधारकांचे रॉकेल बंद करू नये. वीज नसल्याने चिमणी पेटविण्याकरिता रॉकेल लागते, याबाबत रतन चौधरी यांनी तक्र ार केली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आदिवासी सेवक मोतीराम गावित होते. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, कळवणचे प्रकल्प अधिकारी आशियाना, गटविकास अधिकारी केशव गड्डापोड, गटशिक्षणाधिकारी संजय कुसाळकर, तालुका कृषी अधिकारी डमाले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता राऊत, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता जाधव, भाजपा आदिवासी विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष एन.डी. गावित, शिवसेना तालुकाध्यक्ष मोहन गांगुर्डे, जिल्हा परिषद सदस्य कलावती चव्हाण, भरत वाघमारे, भावडू चौधरी, रमेश थोरात, ललित चव्हाण, चिंतामण कामडी, हरिभाऊ भोये, विजय कानडे, आदिवासी बचाव कृती समितीचे तालुकाप्रमुख रतन चौधरी, माजी सरपंच भास्कर चौधरी, जाहुलेचे सरपंच सुनील भोये आदींसह शेकडो कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Harishchandra Chavanहरिश्चंद्र चव्हाणdroughtदुष्काळ