शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

दुष्काळी आढावा बैठकीत तक्र ारीचा पाढा

By admin | Updated: September 8, 2015 00:07 IST

येवला : उपाययोजना करण्याचे प्रशासनाला आदेश

येवला : दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी येथील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात आयोजित बैठकीत शेतकर्‍यांनी आमदार छगन भुजबळ यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचला. तालुक्यात ९0 टक्के खरीप पिके जळाली असून, जनावरांना चारा नाही तसेच पिण्यासाठी पाणी नाही, टँकर मागूनही वेळेवर मिळत नाही, जनावरे वाचवण्यासाठी किमान चारा-पाणी तरी द्या, अशी आर्त हाक शेतकर्‍यांनी यावेळी दिली.बैठकीत ३८ गाव पाणीपुरवठा समितीचे मोहन शेलार यांनी योजनेच्या साठवण तलावात केवळ महिनाभर पुरेल इतकेच पाणी असल्याची माहिती दिली. ३८ गावांसह इतर गावांना पाणी देण्याचे त्यांनी मान्य केले. २२४ गावांतील ४५0 विहिरी पिण्याच्या पाण्यासाठी अधिग्रहित कराव्यात, अशी सूचना जि.प. सदस्य प्रवीण गायकवाड यांनी मंडली. या योजनेस तत्काळ हिरवा कंदील आमदार भुजबळ यांनी दिला.नगरसूलच्या १५ वस्त्यांवर केवळ एक टॅँकर पाणी वाटप करीत फिरतो. किमान दोन टॅँकरची आवश्यकता असल्याचे संजय पाटील यांनी सांगितले. पंजाबराव कृषी विद्यापीठ अंतर्गत जिल्हा बँक व राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत तालुक्यातील शेतकर्‍यांचे नऊ कोटींचे थकीत अनुदान गेल्या तीन वर्षांपासून मिळाले नसल्याची तक्रार अँड. माणिकराव शिंदे यांनी केली. यावर सह. निबंधक जितेंद्र शेळके यांनी शासनाकडे गेल्या तीन वर्षापासून अनुदान रखडले असल्याचे सांगितले. फळबाग अनुदानदेखील केवळ १0 टक्के मिळाले असून, ९0 टक्के अनुदान अद्याप मिळाले नसल्याची तक्रार शेतकर्‍यांनी केली. चोरीचे प्रमाण खूप वाढले आहे. घरात आणि गावात अखंडित वीज देण्याची मागणी वसंत पवार यांनी केली. या बैठकीत राष्ट्रवादीचे पदाधिकारी व विविध खात्याचे शासकीय अधिकारी उपस्थित होते. शिवसेनेचे दिलीप मेंगळ यांनी बाळापूर गावासाठी १५ दिवसांपूर्वी टॅँकर मागणी करूनही पाणी अद्याप मिळाले नाही अशी तक्र ार केली. याला मकरंद सोनवणे यांनी दुजोराही दिला. दरम्यान, अँड. माणिकराव शिंदे म्हणाले, सरकार तुमचे आहे. त्यासाठी तुम्ही पुढे व्हा, आंदोलन करा नाहीतर आम्ही १५ सप्टेंबरला रस्त्यावर उतरणार आहोत. या बैठकीस अँड. माणिकराव शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे, राधाकिसन सोनवणे, पंचायत समिती सभापती प्रकाश वाघ, नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे, प्रांताधिकारी वासंती माळी, तहसीलदार शरद मंडलिक, मुख्याधिकारी राहुल वाघ, जिल्हा परिषद सदस्य कृष्णराव गुंड, नवनाथ काळे, मकरंद सोनवणे, किशोर सोनवणे, सचिन कळमकर, गटविकास अधिकारी सुनील आहिरे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. सध्या चालू असलेल्या पालखेडच्या पाणी आवर्तनानंतर धरणात पाणीसाठा नसल्याने पुन्हा पाणी आवर्तन मिळण्याची शक्यता नाही. यामुळे आहे त्या पाण्यात केवळ पिण्यासाठीच पाण्याचा उपयोग करावा. शेतीसाठी पाण्याचा उपसा होणार नाही याची दाखल घ्यावी, येसगाव पाणी योजना पुनर्जीवित करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव तत्काळ पाठवावा. पाणी वाया जाणार नाही यासाठी योजनांची काही दुरु स्ती असल्यास ती करावी. मराठवाडा १४ सप्टेंबरला, तर उत्तर महाराष्ट्र १५ सप्टेंबरला दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य सरकारला कळावे म्हणून रस्त्यावर उतरणार आहे. धरणाच्या भिंतीचे काम नंतर करू किमान मांजरपाड्याचा बोगदा मोकळा करा, यावर मुख्यमंत्र्यांनी होकार दिला असला तरी झारीतील शुक्राचार्य झारीत अडकले तर वेळप्रसंगी आंदोलनही करू, असा इशारा आमदार भुजबळ यांनी दिला. (वार्ताहर)