शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

मुख्यमंत्र्यांबाबत तक्रार नाही : पतंगराव कदम

By admin | Updated: May 31, 2014 00:22 IST

नाशिक : देशासह राज्यात कॉँग्रेस आघाडीच्या झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर आपण पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना दिल्लीत जाऊन भेटलो़ मुख्यमंत्र्यांबाबत आपली कसलीही तक्रार नसल्याचा निर्वाळा वनमंत्री पतंगराव कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिला़

नाशिक : देशासह राज्यात कॉँग्रेस आघाडीच्या झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर आपण पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना दिल्लीत जाऊन भेटलो़ मुख्यमंत्र्यांबाबत आपली कसलीही तक्रार नसल्याचा निर्वाळा वनमंत्री पतंगराव कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिला़ नाशिक येथील शासकीय विश्रामगृहात वन विभागाच्या अधिकार्‍यांच्या आढावा बैठकीनंतर कदम पत्रकारांशी बोलत होते़ कदम म्हणाले, निवडणुकीतील पराभव व आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यनेतृत्वात बदल संभवत नाही़ मंत्रिमंडळ बदलाचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे, तो त्यांनी वापरावा़ जे काही होईल ते हायकमांडच्या आदेशाने होईल़ आपण काल दिल्लीला गेलो होतो; परंतु त्यापूर्वी राधाकृष्ण विखेपाटील, नारायण राणे, हर्षवर्धन पाटील यांनी सोनिया गांधींची भेट घेतली आहे़ त्यांच्या बैठकीत काय ठरले ते आपणास माहीत नाही़ मुळात दिवस थोडे असल्याने परिणामकारक व गतिमान कामे करण्याचा प्रयत्न आता होणे अपेक्षित आहे़ आपला निवडणुकीबद्दल कोणावरही रोष नाही़ जर निवडणुकीत कोणी काय केले असेल तर याची तपासणी नक्की होईल़ राज्य सहकारी बँकेच्या ऑडिट रिपोर्टबाबत विचारले असता, त्याबाबत आपणास काहीच माहिती नाही़ सहकार कायदा फ ार सक्षम. काही चुकीचे निर्णय घेतले गेले तर संपूर्ण संचालक मंडळ यास जबाबदार धरले जाते़ त्यात कोणी दोषी असतील तर त्यांची चौकशी होईल़कदम यांनी जिल्हाधिकारी, विभागीय अधिकारी तसेच वन विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून पुनर्वसन व वन विभागाच्या १०० कोटी वृक्ष लागवडीचा आढावा घेतला़ जे देशात घडले तेच पुण्यात चिरंजीव विश्वजित कदम यांच्या पराभवाबद्दल पतंगराव कदम यांना विचारले असता ते म्हणाले, जे संपूर्ण देशात झाले तेच पुण्यात झाले़ यामुळे कोणावर रोषही नाही़ विश्वजित कदम यांची उमेदवारी ऐनवेळी जाहीर झाली. आमची तयारी होऊ शकली नाही़ काही चुकीचे आरोपही झाले़ विश्वजित तरुणच असल्याने अजून त्यास खूप दिवस आहेत. त्यामुळे कसलीही चिंता वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले़