शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

सीबीएसई, आयसीएसईसोबत राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 01:10 IST

राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांची तुलना नेहमी सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची तुलना केली जाते. परंतु गेल्या काही वर्षांपासून राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच अधिक असल्याने विद्यार्थ्यांना विविध विद्याशाखांना सहज प्रवेश मिळत होते.

नाशिक : राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांची तुलना नेहमी सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची तुलना केली जाते. परंतु गेल्या काही वर्षांपासून राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच अधिक असल्याने विद्यार्थ्यांना विविध विद्याशाखांना सहज प्रवेश मिळत होते. मात्र यावर्षी दहावीच्या निकालाचा टक्का घसरला असून, विद्यार्थ्यांच्या एकूण गुणांवर यावर्षी परिणाम झाला असल्याने राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासोबच विविध तंत्रशिक्षण पदविका प्रवेशासाठीही अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करावी लागणार आहे.दहावीचा निकाल लागण्यापूर्वीच अकरावी प्रवेशाची तयारी सुरू झाली असून, आतापर्यंत सुमारे २८ हजार विद्यार्थ्यांनी त्याच्या माध्यमिक शाला अथवा मार्गदर्शन केंद्रांमधून माहिती पुस्तिकांची खरेदी केली आहे. त्यापैकी सुमारे १६ हजार विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्जाचा भाग एक भरला असून, १४ हजार ७०० विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्जाची पडताळणी पूर्ण केली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर या आॅनलाइन अर्जभरून प्रक्रियेला वेग आला आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत नाशिकमधून ९० टक्क्यांपासून ते १०० टक्के गुण मिळविणारे विद्यार्थी होते.मात्र यावर्षी निकालात मोठी घसरण झाली असल्याने अकरावी प्रवेशासाठी राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करावी लागणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सीबीएसई, आयसीएसई बोर्डांच्या निकालापेक्षा घसरला असल्याने इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. त्यातच शहरातील अकरावीच्या २३ हजार जागांसाठी २८ हजार माहिती पुस्तिकांची विक्री झाली आहे. अशा स्थितीत दहावी उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याला शहरातील नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळावा, अशी अपेक्षा असल्याने शहरातील प्रमुख नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस दिसून येणार आहे.आॅनलाइन अर्जाची पडताळणीअकरावी प्रवेशाची तयारी सुरू झाली असून, आतापर्यंत सुमारे २८ हजार विद्यार्थ्यांनी माहिती पुस्तिकांची खरेदी केली आहे. त्यापैकी सुमारे १६ हजार विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्जाचा भाग एक भरला असून, १४ हजार ७०० विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्जाची पडताळणी पूर्ण केली आहे.

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षाStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय