शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
3
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
4
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
5
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
6
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
7
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
8
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
9
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
10
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
11
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
12
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
13
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
14
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
15
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
16
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
17
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
18
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
19
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
20
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम

सीबीएसई, आयसीएसईसोबत राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 01:10 IST

राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांची तुलना नेहमी सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची तुलना केली जाते. परंतु गेल्या काही वर्षांपासून राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच अधिक असल्याने विद्यार्थ्यांना विविध विद्याशाखांना सहज प्रवेश मिळत होते.

नाशिक : राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांची तुलना नेहमी सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची तुलना केली जाते. परंतु गेल्या काही वर्षांपासून राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच अधिक असल्याने विद्यार्थ्यांना विविध विद्याशाखांना सहज प्रवेश मिळत होते. मात्र यावर्षी दहावीच्या निकालाचा टक्का घसरला असून, विद्यार्थ्यांच्या एकूण गुणांवर यावर्षी परिणाम झाला असल्याने राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासोबच विविध तंत्रशिक्षण पदविका प्रवेशासाठीही अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करावी लागणार आहे.दहावीचा निकाल लागण्यापूर्वीच अकरावी प्रवेशाची तयारी सुरू झाली असून, आतापर्यंत सुमारे २८ हजार विद्यार्थ्यांनी त्याच्या माध्यमिक शाला अथवा मार्गदर्शन केंद्रांमधून माहिती पुस्तिकांची खरेदी केली आहे. त्यापैकी सुमारे १६ हजार विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्जाचा भाग एक भरला असून, १४ हजार ७०० विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्जाची पडताळणी पूर्ण केली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर या आॅनलाइन अर्जभरून प्रक्रियेला वेग आला आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत नाशिकमधून ९० टक्क्यांपासून ते १०० टक्के गुण मिळविणारे विद्यार्थी होते.मात्र यावर्षी निकालात मोठी घसरण झाली असल्याने अकरावी प्रवेशासाठी राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करावी लागणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सीबीएसई, आयसीएसई बोर्डांच्या निकालापेक्षा घसरला असल्याने इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. त्यातच शहरातील अकरावीच्या २३ हजार जागांसाठी २८ हजार माहिती पुस्तिकांची विक्री झाली आहे. अशा स्थितीत दहावी उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याला शहरातील नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळावा, अशी अपेक्षा असल्याने शहरातील प्रमुख नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस दिसून येणार आहे.आॅनलाइन अर्जाची पडताळणीअकरावी प्रवेशाची तयारी सुरू झाली असून, आतापर्यंत सुमारे २८ हजार विद्यार्थ्यांनी माहिती पुस्तिकांची खरेदी केली आहे. त्यापैकी सुमारे १६ हजार विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्जाचा भाग एक भरला असून, १४ हजार ७०० विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्जाची पडताळणी पूर्ण केली आहे.

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षाStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय