शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

खटल्यांच्या तुलनेत न्यायाधीशांची संख्या तोकडी, जयंत जायभावे यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 13:48 IST

वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात फोफावत असून त्यामुळे अनेक खटल्यांची संख्याही मोठी झाली आहे. मात्र प्रलंबित खटल्यांची संख्या पाहता सद्यस्थितीत काम करणाऱ्या न्यायाधीशांची संख्या अत्यंत तोकडी असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष जयंत जायभावे यांनी केले आहे.

ठळक मुद्देवाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्तीतही वाढवाढत्या खटल्यांच्या तुलनेत न्यायाधीशांची संख्या अत्यल्प ‘कोर्टाची पायरी चढण्याआधी’ कार्यक्रमात जयंत जायभावे यांचे प्रतिपादन

नाशिक : भारतात वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात फोफावत असून त्यामुळे अनेक खटल्यांची संख्याही मोठी झाली आहे. मात्र प्रलंबित खटल्यांची संख्या पाहता सद्यस्थितीत काम करणाऱ्या न्यायाधीशांची संख्या अत्यंत तोकडी असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष जयंत जायभावे यांनी केले. उभय पक्षांमधील वाद समुपदेशनाने आणि सामंजस्याने सोडविण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.रोटरी क्लब ऑफ नाशिक आणि रोटरी क्लब नाशिक (पश्चिम) यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी हॉल गंजमाळ येथे एक ह्यकोर्टाची पायरी चढण्याआधीह्ण या आगळ्या वेगळ्या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा विधी सेवा आयोगाचे सचिव न्यायाधीश सुधीरकुमार बुक्के आणि ज्येष्ठ वकील इंद्रायणी पटणी उपस्थित होते.जयंत जायभावे म्हणाले, भारतीय दिवाणी प्रक्रिया संहितेचे मध्ये सन २००२ च्या दुरुस्त्यांचा गाभा हा कोर्टात प्रकरण दाखल करण्याच्या आधीपासून, प्रकरणाचे काम कोर्टात चालू असताना पक्षकारांमध्ये सामोपचाराने वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करणे हा महत्त्वाचा भाग आहे. याशिवाय उभय वकील आणि न्यायालये यांच्यावरील जबाबदारीचीही जायभावे यांनी याप्रसंगी जाणीव करून दिली. न्यायाधीश सुधीरकुमार बुक्के यांनी लोकन्यायालायचे महत्त्व विशद करून त्याबाबतच्या सर्व तरतुदींची माहिती दिली. न्याय मिळणे खर्चिक होत असताना, लोकन्यायालायच्या माध्यमातून खटले सामोपचाराने सोडवण्यावर समाजाने भर देण्याची काळाची गरज असल्याचे सांगितले. वरिष्ठ वकील इंद्रायणी पटणी यांनी कोटुंबिक वादाच्या वाढत्या तक्रारींबाबत चिंता व्यक्त करून कोटुंबिक न्यायालयातील वादाच्या निराकरणासाठी समुपदेशनाची गरज असल्याचे विशद केले. चर्चासत्रात राजेश्वरी बालाजीवाले आणि मनीष चिंधडे यांनी मान्यवरांची मुलाखत घेतली. या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष दिलीपसिंग बेनिवाल आणि रोटरी क्लब ऑफ वेस्टचे अध्यक्ष सीमा पछाडे यांच्यासह नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Courtन्यायालयNashikनाशिकadvocateवकिलRotary Clubरोटरी क्लब