शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

गरजू कुटुंबीयांच्या मुला-मुलींचा सामुदायिक विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 01:08 IST

आत्महत्त्याग्रस्त शेतकरी कुटुंबे, गोरगरीब, अनाथ, निराधार कुटुंबातील मुला-मुलींचा सामुदायिक विवाह सोहळा राज्याचे धर्मादाय आयुक्त यांच्या पुढाकाराने राज्यभर आयोजित करण्यात आला आहे. नाशिकमध्ये जिल्हास्तरीय विवाह सोहळा १७ मे रोजी पार पडणार असल्याची माहिती प्रभारी धर्मादाय उपआयुक्त वैशाली पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नाशिक : आत्महत्त्याग्रस्त शेतकरी कुटुंबे, गोरगरीब, अनाथ, निराधार कुटुंबातील मुला-मुलींचा सामुदायिक विवाह सोहळा राज्याचे धर्मादाय आयुक्त यांच्या पुढाकाराने राज्यभर आयोजित करण्यात आला आहे. नाशिकमध्ये जिल्हास्तरीय विवाह सोहळा १७ मे रोजी पार पडणार असल्याची माहिती प्रभारी धर्मादाय उपआयुक्त वैशाली पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी ६ मार्च रोजी काढलेल्या परिपत्रक क्रमांक ५३३नुसार सामुदायिक विवाह सोहळा समिती नाशिक जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये शहर व जिल्ह्यामधील नोंदणीकृत धार्मिक, सामाजिक सेवा संस्थांच्या २१ पंचांचा समितीत समावेश करण्यात आला आहे. यावेळी सहायक आयुक्त दीप्ती कोळपकर, के. एम. सोनवणे, समितीचे केशवअण्णा पाटील, श्रीकांत बेणी, अ‍ॅड. भाऊसाहेब गंभिरे उपस्थित होते. राज्यात आत्महत्त्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची संख्या अधिक असून, त्यांच्या वयात आलेल्या मुला-मुलींच्या विवाहाचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे धर्मादाय आयुक्तांच्या पुढाकाराने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सामुदायिक विवाह सोहळा समिती स्थापन करण्यात येऊन या समितीद्वारे विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १७ मे रोजी होणाऱ्या विवाह सोहळ्यासाठी १०१ तरुण-तरुणींचे प्रस्ताव अपेक्षित असल्याचे यावेळी सांगण्यात आले. एका जोडप्याच्या विवाहाला सुमारे ४० ते ५० हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असून, अद्याप दहा लाखांचा निधी संकलित झाल्याची माहिती बेणी यांनी दिली. या विवाह सोहळ्यासाठी गरजू, गोरगरीब सर्वधर्मीय कुटुंबातील व्यक्ती कायद्यानुसार मुला-मुलींचे वय पूर्ण असल्यास नोंदणी करू शकतात, असे पंडित यांनी स्पष्ट केले. हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, मुस्लीम अशा सर्वच धर्मांच्या परंपरेनुसार विवाह लावला जाणार असल्याचे त्या म्हणाल्या.प्रत्येक जोडप्याला अर्धा तोळे सोन्याचे मणी-मंगळसूत्र व संसारोपयोगी वस्तू व किमान १०० वºहाडींची भोजनव्यवस्था करून दिली जाणार आहे. गंगापूररोडवरील चोपडा लॉन्स येथे सामुदायिक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. एका जोडप्याच्या विवाहाला सुमारे ४० ते ५० हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक