शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

मुलांच्या सुयोग्य जडणघडणीसाठी संवाद आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 01:14 IST

सिन्नर : आपल्या मुलांची सुयोग्य जडणघडण करण्यासाठी त्यांच्याशी संवाद केला पाहिजे. त्यांना वेळ दिला पाहिजे. चांगल्या वाईटातला फरक समजावून सांगितला पाहिजे. सात वर्षे वयापर्यंत मुलांवर असे संस्कार करण्याची नितांत गरज असून, त्यात कमतरता राहिल्यास मुलांच्या भवितव्यावर त्याचा प्रतिकूल परिणाम होतोे, असे प्रतिपादन राहुरी कृषी विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी व सामाजिक विषयांचे अभ्यासक जितेंद्र मेटकर यांनी केले.

ठळक मुद्देजितेंद्र मेटकर : सिन्नर येथे वाचनालयात ‘कुटुंब- एक संस्कार शाळा’ वर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : आपल्या मुलांची सुयोग्य जडणघडण करण्यासाठी त्यांच्याशी संवाद केला पाहिजे. त्यांना वेळ दिला पाहिजे. चांगल्या वाईटातला फरक समजावून सांगितला पाहिजे. सात वर्षे वयापर्यंत मुलांवर असे संस्कार करण्याची नितांत गरज असून, त्यात कमतरता राहिल्यास मुलांच्या भवितव्यावर त्याचा प्रतिकूल परिणाम होतोे, असे प्रतिपादन राहुरी कृषी विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी व सामाजिक विषयांचे अभ्यासक जितेंद्र मेटकर यांनी केले.सिन्नर वाचनालयाच्या ग्रंथालय सप्ताहात ‘कुटुंब- एक संस्कार शाळा’ या विषयावर मेटकर बोलत होते. स्व. अशोक वाजे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अनुराधा वाजे यांनी हा कार्यक्र म प्रायाोजित केला होता.कोणत्या गोष्टी केल्या म्हणजे भारतावर दीर्घकाळ राज्य करता येईल याचा ब्रिटिशांनी अभ्यास केला. ऐक्य, प्रामाणिकपणा, दिल्या शब्दाला जागण्याची वृत्ती, औदार्य हे सगळे भारतीयांच्या रक्तात भिनलेले गुण भेदले तरच आपल्याला राज्य करता येईल, असा निष्कर्ष लॉर्ड मेकॉले याने काढला. या गुणांचे मूळ भारतीय कुटुंब व्यवस्थेत असल्याने त्यावर आघात केला तरच हे शक्य असल्याने त्याने भारतीय शिक्षण पद्धतीच बदलून टाकली असे मेटकर यांनी सांगितले. या बाबत लॉर्ड मेकॉलेच्या बहिणीने त्यास पत्र पाठवून भारतावर राज्य करणे अशक्य असल्याचे सांगत आपल्यावरील संस्कारांचे दाखले दिले होते. मेकॉलेने बहिणीच्या पत्राला उत्तर देताना ‘तुझी भीती खरी आहे, मात्र मी शिक्षणपद्धतीच आमूलाग्र बदलून ऐक्यात फूट पाडून कुटुंब व्यवस्थाच उद्ध्वस्त करून टाकेन’ अशी ग्वाही बहिणीला दिली होती. ही दोन्ही पत्रे उपलब्ध असल्याचे मेटकर यांनी सांगितले.वडील घरापासून दूर असतानाही उत्तम संस्कार करून आपल्या मुलांना कर्तबगारीच्या शिखरावर जाण्याची प्रेरणा देणाऱ्या मातांची संख्या आपल्या देशात कमी नाही. पती जवळ नसताना मुलांना घडविणारी पांडवांची माता कुंती, प्रभू रामचंद्रांच्या विरहात लव-कुशांना चक्रवर्ती स्थानावर नेणारी माता सीता, वडील दुष्यंतांच्या अनुपस्थितीत जनतेसाठी राज्य करून अमर झालेल्या राजा भरताची माता शकुंतला, सम्राट अशोकाची माता शुभद्रांगी आणि शहाजी राजे सोबत नसताना मुलास मराठी साम्राज्य उभे करण्याची शिकवण देणाºया माता जिजाऊ. या पाच मातांच्या कथा प्रत्येक मातेसाठी आदर्श आहेत. याची आठवण आई-वडिलांनी ठेवली पाहिजे असे ते म्हणाले.कुत्र्यांना बिस्कीट व मुलांनाही बिस्कीट व ब्रेड दिले जाऊ लागल्याने मुले आजारांच्या गर्तेत जात आहेत. लहानपणीच अनेक समस्यांनी त्यांना घेरले जात असून, बालवयातच चष्मा लागतो आहे. त्याला त्यांचा आहार-विहार कारणीभूत आहे. त्यासाठी मुलांना चांगल्या सवयी लावा. मैदानी खेळ व वाचनाची गोडी लावा. पालक चांगली पुस्तके वाचतील तरच मुलेही वाचतील कारण मुले अनुकरणप्रिय असतात. मुलांच्या भवितव्यासाठी पालकांनी सद्वर्तन ठेवल्यास मुलेही सद्वर्तनी होतील असे ते म्हणाले.फोटो : सिन्नर सार्वजनिक वाचनालयात ‘कुटुंब- एक संस्कार शाळा’ या विषयावर बोलताना जितेंद्र मेटकर. कुत्र्यांना बिस्कीट व मुलांनाही बिस्कीट व ब्रेड दिले जाऊ लागल्याने मुले आजारांच्या गर्तेत जात आहेत. लहानपणीच अनेक समस्यांनी त्यांना घेरले जात असून, बालवयातच चष्मा लागतो आहे. त्याला त्यांचा आहार-विहार कारणीभूत आहे. त्यासाठी मुलांना चांगल्या सवयी लावा. मैदानी खेळ व वाचनाची गोडी लावा.

टॅग्स :sinnar-acसिन्नरStudentविद्यार्थी