शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुलांच्या सुयोग्य जडणघडणीसाठी संवाद आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 01:14 IST

सिन्नर : आपल्या मुलांची सुयोग्य जडणघडण करण्यासाठी त्यांच्याशी संवाद केला पाहिजे. त्यांना वेळ दिला पाहिजे. चांगल्या वाईटातला फरक समजावून सांगितला पाहिजे. सात वर्षे वयापर्यंत मुलांवर असे संस्कार करण्याची नितांत गरज असून, त्यात कमतरता राहिल्यास मुलांच्या भवितव्यावर त्याचा प्रतिकूल परिणाम होतोे, असे प्रतिपादन राहुरी कृषी विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी व सामाजिक विषयांचे अभ्यासक जितेंद्र मेटकर यांनी केले.

ठळक मुद्देजितेंद्र मेटकर : सिन्नर येथे वाचनालयात ‘कुटुंब- एक संस्कार शाळा’ वर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : आपल्या मुलांची सुयोग्य जडणघडण करण्यासाठी त्यांच्याशी संवाद केला पाहिजे. त्यांना वेळ दिला पाहिजे. चांगल्या वाईटातला फरक समजावून सांगितला पाहिजे. सात वर्षे वयापर्यंत मुलांवर असे संस्कार करण्याची नितांत गरज असून, त्यात कमतरता राहिल्यास मुलांच्या भवितव्यावर त्याचा प्रतिकूल परिणाम होतोे, असे प्रतिपादन राहुरी कृषी विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी व सामाजिक विषयांचे अभ्यासक जितेंद्र मेटकर यांनी केले.सिन्नर वाचनालयाच्या ग्रंथालय सप्ताहात ‘कुटुंब- एक संस्कार शाळा’ या विषयावर मेटकर बोलत होते. स्व. अशोक वाजे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अनुराधा वाजे यांनी हा कार्यक्र म प्रायाोजित केला होता.कोणत्या गोष्टी केल्या म्हणजे भारतावर दीर्घकाळ राज्य करता येईल याचा ब्रिटिशांनी अभ्यास केला. ऐक्य, प्रामाणिकपणा, दिल्या शब्दाला जागण्याची वृत्ती, औदार्य हे सगळे भारतीयांच्या रक्तात भिनलेले गुण भेदले तरच आपल्याला राज्य करता येईल, असा निष्कर्ष लॉर्ड मेकॉले याने काढला. या गुणांचे मूळ भारतीय कुटुंब व्यवस्थेत असल्याने त्यावर आघात केला तरच हे शक्य असल्याने त्याने भारतीय शिक्षण पद्धतीच बदलून टाकली असे मेटकर यांनी सांगितले. या बाबत लॉर्ड मेकॉलेच्या बहिणीने त्यास पत्र पाठवून भारतावर राज्य करणे अशक्य असल्याचे सांगत आपल्यावरील संस्कारांचे दाखले दिले होते. मेकॉलेने बहिणीच्या पत्राला उत्तर देताना ‘तुझी भीती खरी आहे, मात्र मी शिक्षणपद्धतीच आमूलाग्र बदलून ऐक्यात फूट पाडून कुटुंब व्यवस्थाच उद्ध्वस्त करून टाकेन’ अशी ग्वाही बहिणीला दिली होती. ही दोन्ही पत्रे उपलब्ध असल्याचे मेटकर यांनी सांगितले.वडील घरापासून दूर असतानाही उत्तम संस्कार करून आपल्या मुलांना कर्तबगारीच्या शिखरावर जाण्याची प्रेरणा देणाऱ्या मातांची संख्या आपल्या देशात कमी नाही. पती जवळ नसताना मुलांना घडविणारी पांडवांची माता कुंती, प्रभू रामचंद्रांच्या विरहात लव-कुशांना चक्रवर्ती स्थानावर नेणारी माता सीता, वडील दुष्यंतांच्या अनुपस्थितीत जनतेसाठी राज्य करून अमर झालेल्या राजा भरताची माता शकुंतला, सम्राट अशोकाची माता शुभद्रांगी आणि शहाजी राजे सोबत नसताना मुलास मराठी साम्राज्य उभे करण्याची शिकवण देणाºया माता जिजाऊ. या पाच मातांच्या कथा प्रत्येक मातेसाठी आदर्श आहेत. याची आठवण आई-वडिलांनी ठेवली पाहिजे असे ते म्हणाले.कुत्र्यांना बिस्कीट व मुलांनाही बिस्कीट व ब्रेड दिले जाऊ लागल्याने मुले आजारांच्या गर्तेत जात आहेत. लहानपणीच अनेक समस्यांनी त्यांना घेरले जात असून, बालवयातच चष्मा लागतो आहे. त्याला त्यांचा आहार-विहार कारणीभूत आहे. त्यासाठी मुलांना चांगल्या सवयी लावा. मैदानी खेळ व वाचनाची गोडी लावा. पालक चांगली पुस्तके वाचतील तरच मुलेही वाचतील कारण मुले अनुकरणप्रिय असतात. मुलांच्या भवितव्यासाठी पालकांनी सद्वर्तन ठेवल्यास मुलेही सद्वर्तनी होतील असे ते म्हणाले.फोटो : सिन्नर सार्वजनिक वाचनालयात ‘कुटुंब- एक संस्कार शाळा’ या विषयावर बोलताना जितेंद्र मेटकर. कुत्र्यांना बिस्कीट व मुलांनाही बिस्कीट व ब्रेड दिले जाऊ लागल्याने मुले आजारांच्या गर्तेत जात आहेत. लहानपणीच अनेक समस्यांनी त्यांना घेरले जात असून, बालवयातच चष्मा लागतो आहे. त्याला त्यांचा आहार-विहार कारणीभूत आहे. त्यासाठी मुलांना चांगल्या सवयी लावा. मैदानी खेळ व वाचनाची गोडी लावा.

टॅग्स :sinnar-acसिन्नरStudentविद्यार्थी