शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शेतमाल प्रक्रिया उद्योग गरजेचे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 12:18 IST

संतोष गायधनी शेतकरी डिजिटल जरूर झाला. त्याच्या हाती मोबाइल आला. इंटरनेट क्रांतीने सगळंच एका ‘क्लिक’वर त्याला दृष्टीस पडू लागलं; पण या डिजिटल क्रांतीने शेतीची तांत्रिक प्रगती आजवर साधली गेली का? नेमक्या या काळात प्रगतीचा वेग का मंदावला, प्रगत तंत्रज्ञान व संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेनासे झाले का, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

शेतकरी डिजिटल जरूर झाला. त्याच्या हाती मोबाइल आला. इंटरनेट क्रांतीने सगळंच एका ‘क्लिक’वर त्याला दृष्टीस पडू लागलं; पण या डिजिटल क्रांतीने शेतीची तांत्रिक प्रगती आजवर साधली गेली का? नेमक्या या काळात प्रगतीचा वेग का मंदावला, प्रगत तंत्रज्ञान व संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेनासे झाले का, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. तंत्रज्ञान व खर्च यांचा ताळमेळ न घालता येणे हेच याचे एकमेव कारण म्हणता येईल जागतिकीकरणानंतर काही दशकांनंतरही कृषिक्षेत्रवगळता इतर सर्वच क्षेत्रात आपण जोरदार मुसंडी मारली आहे. नाशिक जिल्हा भौगोलिकदृष्ट्या सधन असणारा भूभाग. जिल्ह्याचे सर्वाधिक क्षेत्रफळ असणारी पळसे, शिंदे, देवळाली, भगूर, एकलहरे, सामनगाव व पंचक्रोशीतील गावांचा मुख्यत: शेती हाच दैनंदिन अर्थव्यवस्थेचा कणा आहे. येथील शेतकऱ्यांना अद्यापही हव्या त्या सोयी सुविधा मिळत नाहीत . आपल्याला शेतात कुठले पीक घ्यायचे, त्याला कुठले खत द्यायचे, त्या पिकाची मशागत कशी करायची याची आस शेतकºयांना गेल्या काही दशकांपासून नक्कीच आहे. मात्र त्यासाठी माती परीक्षण व त्यासारखे पाणी परीक्षण करून घेणे हा केवळ एक उपचार ठरला आहे. कारण माती व पाणी परीक्षणाचा अहवाल व प्रत्यक्ष शेतातील अनुभव याची सांगड शेतकरी घालत असतो. यात निरीक्षण करून आकडे नोंदवणे हे निरीक्षकावर अवलंबून असल्याने खात्रीशीर माहिती मिळत नाही. या क्षेत्रात तरी आपले तंत्रज्ञान व प्रयोगशाळांत त्याचा होणारा वापर खूपच मागे आहे.जागतिकीकरणाबरोबरच ‘फूड प्रोसेसिंग’ म्हणजेच अन्नप्रक्रिया उद्योग हे गाजर दाखविण्यात आले; परंतु हे अन्नप्रक्रिया उद्योग महिला बचतगटांमध्येच घुटमळले. त्याबाहेर हा उद्योग येऊच शकला नाही. थोड्या अधिक प्रमाणात महिलांचे सक्षमीकरण यातून साधले गेले मात्र सर्वदूर ज्या उद्देशाकरिता ही प्रक्रिया अपेक्षित होती, ती मात्र साधली गेली नाही. जिथे वीज नसल्याने गहू दळता येत नाहीत, तिथे अन्नप्रक्रिया उद्योग करण्याचा विचार शेतकरी कसा करू शकेल. यातही साखर कारखाने व दूध भुकटी हेच सर्वाधिक मोठे अन्नप्रक्रिया उद्योग होते. मात्र तोट्यात असलेले साखर कारखाने बंद पडले आणि संलग्न उद्योगही परिणामी बंद करावे लागले.हवामानाचा अंदाज घेण्यासाठी इंटरनेट आले. हवामानाचा अंदाज सरकारी हवामान खात्यापेक्षा इंटरनेटवर अचूक मिळतो. मात्र बाजार समितीतील भावफलक मात्र इंटरनेटवर येऊ शकले नाहीत. याही पलीकडे ‘आॅनलाइन शॉपिंग’ सर्रास करणारा शेतकरी मात्र इंटरनेटवरून आपला माल आजही विकू शकत नाही हा विरोधाभास लक्षात घेता तंत्रज्ञानही कुठे, कसे कधी वापरावे, या अज्ञानामुळे खुजे ठरले हे जळजळीत वास्तव आहे. इथे दोष केवळ अंमलबजावणीच्या यंत्रणेला देण्याचाहेतू नाही. शेतकºयांच्या वाढत्या अपेक्षा लक्षात घेतल्या जात नाहीत. उलट वीज, पाणी याबाबत शेतीला अखेरचा क्रम दिला जातो.आजही नाशिक तालुक्याला अधूनमधून दुष्काळाशी सामना करावा लागतो. त्यामुळे जिरायती क्षेत्रात पिकांची उत्पादकता फारच कमी आहे. म्हणूनच पिकांच्या सुधारित जाती आणि लागवड तंत्राचा वापर अत्यावश्यक ठरतो. त्याकरिता गट शेती पद्धती, हवामान व पाऊसमानानुसार काटेकोर उपाययोजना आवश्यक ठरतील. ‘ठिबक सिंचन’ सुविधा ही पाण्याच्या नियोजनास्तव सर्वदूर पोहोचविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे व त्यासाठी सरकारी यंत्रणेने व सामान्य शेतकºयानेही रूची दाखवणे गरजेचे आहे.शेतमालाच्या विक्रीसाठी बाजारपेठा असल्या तरी शेतकºयांना चांगले बाजारभाव मिळत नाहीत. यासाठी शेतमालाची योग्यवेळेत काढणी, साठवणूक आणि त्यावरील प्रक्रियेवर भर दिला पाहिजे. तरच शेतकºयांना शाश्वत उत्पन्न मिळेल. शासनाने शेतीसंबंधी कृषी उद्योग उभे करून अधिक दर देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. शेतकºयांनीही पिकांच्या फेरबदलावर लक्ष दिले पाहिजे. पडीक जमिनीत शेततळे उभारणीसाठी प्रयत्न झाले पाहिजे. त्यासाठी सरकारने चालना देणे आवश्यक आहे.शाश्वत एकात्मिक शेती, कृषी यांत्रिकीकरण, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, बदलत्या हवामानावर आधारित अधिक जनजागृती, सेंद्रीय शेती, थेट विक्री,संरक्षित शेती यावर भर देऊन शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योगपूरक उद्योगांमध्ये शेतकºयांनी उतरण्याची मानसिकता दाखवणे काळाची गरज आहे, हीच नव्या युगाची नांदी ठरेल.

 

टॅग्स :Nashikनाशिक