शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

शेतमाल प्रक्रिया उद्योग गरजेचे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 12:18 IST

संतोष गायधनी शेतकरी डिजिटल जरूर झाला. त्याच्या हाती मोबाइल आला. इंटरनेट क्रांतीने सगळंच एका ‘क्लिक’वर त्याला दृष्टीस पडू लागलं; पण या डिजिटल क्रांतीने शेतीची तांत्रिक प्रगती आजवर साधली गेली का? नेमक्या या काळात प्रगतीचा वेग का मंदावला, प्रगत तंत्रज्ञान व संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेनासे झाले का, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

शेतकरी डिजिटल जरूर झाला. त्याच्या हाती मोबाइल आला. इंटरनेट क्रांतीने सगळंच एका ‘क्लिक’वर त्याला दृष्टीस पडू लागलं; पण या डिजिटल क्रांतीने शेतीची तांत्रिक प्रगती आजवर साधली गेली का? नेमक्या या काळात प्रगतीचा वेग का मंदावला, प्रगत तंत्रज्ञान व संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेनासे झाले का, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. तंत्रज्ञान व खर्च यांचा ताळमेळ न घालता येणे हेच याचे एकमेव कारण म्हणता येईल जागतिकीकरणानंतर काही दशकांनंतरही कृषिक्षेत्रवगळता इतर सर्वच क्षेत्रात आपण जोरदार मुसंडी मारली आहे. नाशिक जिल्हा भौगोलिकदृष्ट्या सधन असणारा भूभाग. जिल्ह्याचे सर्वाधिक क्षेत्रफळ असणारी पळसे, शिंदे, देवळाली, भगूर, एकलहरे, सामनगाव व पंचक्रोशीतील गावांचा मुख्यत: शेती हाच दैनंदिन अर्थव्यवस्थेचा कणा आहे. येथील शेतकऱ्यांना अद्यापही हव्या त्या सोयी सुविधा मिळत नाहीत . आपल्याला शेतात कुठले पीक घ्यायचे, त्याला कुठले खत द्यायचे, त्या पिकाची मशागत कशी करायची याची आस शेतकºयांना गेल्या काही दशकांपासून नक्कीच आहे. मात्र त्यासाठी माती परीक्षण व त्यासारखे पाणी परीक्षण करून घेणे हा केवळ एक उपचार ठरला आहे. कारण माती व पाणी परीक्षणाचा अहवाल व प्रत्यक्ष शेतातील अनुभव याची सांगड शेतकरी घालत असतो. यात निरीक्षण करून आकडे नोंदवणे हे निरीक्षकावर अवलंबून असल्याने खात्रीशीर माहिती मिळत नाही. या क्षेत्रात तरी आपले तंत्रज्ञान व प्रयोगशाळांत त्याचा होणारा वापर खूपच मागे आहे.जागतिकीकरणाबरोबरच ‘फूड प्रोसेसिंग’ म्हणजेच अन्नप्रक्रिया उद्योग हे गाजर दाखविण्यात आले; परंतु हे अन्नप्रक्रिया उद्योग महिला बचतगटांमध्येच घुटमळले. त्याबाहेर हा उद्योग येऊच शकला नाही. थोड्या अधिक प्रमाणात महिलांचे सक्षमीकरण यातून साधले गेले मात्र सर्वदूर ज्या उद्देशाकरिता ही प्रक्रिया अपेक्षित होती, ती मात्र साधली गेली नाही. जिथे वीज नसल्याने गहू दळता येत नाहीत, तिथे अन्नप्रक्रिया उद्योग करण्याचा विचार शेतकरी कसा करू शकेल. यातही साखर कारखाने व दूध भुकटी हेच सर्वाधिक मोठे अन्नप्रक्रिया उद्योग होते. मात्र तोट्यात असलेले साखर कारखाने बंद पडले आणि संलग्न उद्योगही परिणामी बंद करावे लागले.हवामानाचा अंदाज घेण्यासाठी इंटरनेट आले. हवामानाचा अंदाज सरकारी हवामान खात्यापेक्षा इंटरनेटवर अचूक मिळतो. मात्र बाजार समितीतील भावफलक मात्र इंटरनेटवर येऊ शकले नाहीत. याही पलीकडे ‘आॅनलाइन शॉपिंग’ सर्रास करणारा शेतकरी मात्र इंटरनेटवरून आपला माल आजही विकू शकत नाही हा विरोधाभास लक्षात घेता तंत्रज्ञानही कुठे, कसे कधी वापरावे, या अज्ञानामुळे खुजे ठरले हे जळजळीत वास्तव आहे. इथे दोष केवळ अंमलबजावणीच्या यंत्रणेला देण्याचाहेतू नाही. शेतकºयांच्या वाढत्या अपेक्षा लक्षात घेतल्या जात नाहीत. उलट वीज, पाणी याबाबत शेतीला अखेरचा क्रम दिला जातो.आजही नाशिक तालुक्याला अधूनमधून दुष्काळाशी सामना करावा लागतो. त्यामुळे जिरायती क्षेत्रात पिकांची उत्पादकता फारच कमी आहे. म्हणूनच पिकांच्या सुधारित जाती आणि लागवड तंत्राचा वापर अत्यावश्यक ठरतो. त्याकरिता गट शेती पद्धती, हवामान व पाऊसमानानुसार काटेकोर उपाययोजना आवश्यक ठरतील. ‘ठिबक सिंचन’ सुविधा ही पाण्याच्या नियोजनास्तव सर्वदूर पोहोचविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे व त्यासाठी सरकारी यंत्रणेने व सामान्य शेतकºयानेही रूची दाखवणे गरजेचे आहे.शेतमालाच्या विक्रीसाठी बाजारपेठा असल्या तरी शेतकºयांना चांगले बाजारभाव मिळत नाहीत. यासाठी शेतमालाची योग्यवेळेत काढणी, साठवणूक आणि त्यावरील प्रक्रियेवर भर दिला पाहिजे. तरच शेतकºयांना शाश्वत उत्पन्न मिळेल. शासनाने शेतीसंबंधी कृषी उद्योग उभे करून अधिक दर देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. शेतकºयांनीही पिकांच्या फेरबदलावर लक्ष दिले पाहिजे. पडीक जमिनीत शेततळे उभारणीसाठी प्रयत्न झाले पाहिजे. त्यासाठी सरकारने चालना देणे आवश्यक आहे.शाश्वत एकात्मिक शेती, कृषी यांत्रिकीकरण, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, बदलत्या हवामानावर आधारित अधिक जनजागृती, सेंद्रीय शेती, थेट विक्री,संरक्षित शेती यावर भर देऊन शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योगपूरक उद्योगांमध्ये शेतकºयांनी उतरण्याची मानसिकता दाखवणे काळाची गरज आहे, हीच नव्या युगाची नांदी ठरेल.

 

टॅग्स :Nashikनाशिक