शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

निवडणूक प्रक्रिया सुरू असताना आयोगाचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 14:36 IST

मुदत संपणा-या ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच थेट सरपंच निवडणूकी बरोबरच रिक्तपदांसाठी २५ फेब्रुवारी रोजी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करणा-या राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकीची अधिसूचना जानेवारी महिन्यातच प्रसिद्ध केली होती.

ठळक मुद्देग्रामपंचायतीसाठी सोमवारी मुदत : छाननीही लांबणीवरछाननीही लांबणीवर टाकली

नाशिक : मार्च ते मे महिन्यात मुदत संपणा-या राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होऊन प्रत्यक्षात नामांकन दाखल करण्याची अंतीम मुदत समीप आलेली असताना राज्य निवडणूक आयोगाने आपल्या ‘गोंधळी’ कारभाराची पुन: प्रचिती दिली असून, निवडणूकीचे नामांकनास मुदतवाढ देतानाच छाननीही लांबणीवर टाकल्यामुळे राज्यभरातील उमेदवार व निवडणूक अधिका-यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.मुदत संपणा-या ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच थेट सरपंच निवडणूकी बरोबरच रिक्तपदांसाठी २५ फेब्रुवारी रोजी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करणा-या राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकीची अधिसूचना जानेवारी महिन्यातच प्रसिद्ध केली होती. आयोगाने घोषीत केलेल्या कार्यक्रमानुसार ५ ते १० फेब्रुवारी दरम्यान सकाळी अकरा ते दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान उमेदवारांनी आॅनलाईन नामांकन दाखल करण्याची मुदत दिली होती. १२ फेब्रुवारी रोजी छाननी तर माघारीसाठी १५ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अंतीम मुदत होती. मतदानासाठी २५ फेब्रुवारी व दुस-याच दिवशी मतमोजणी करून निवडणूक निकाल असा कार्यक्रम आयोगाने जाहीर करताना या निवडणुकीत राखीव जागांवर उमदेवारी करणा-या उमेदवारांनी नामांकनासोबत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य केले होते. आयोगाच्या या निर्णयामुळे राखीव जागांवर निवडणूक लढवू इच्छिणा-या उमेदवारांमध्ये चलबिचल निर्माण झाली होती, त्याचा परिणाम निवडणुकीचे नामांकन दाखल करण्यात झाला होता. आयोगाच्या या लहरी फतव्यामुळे उमेदवार निवडणुकीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाल्याने राज्य सरकारला त्यात हस्तक्षेप करावा लागला व मंत्रीमंडळ बैठकीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली. राज्य सरकारचा हा निर्णय जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाने आपल्या निवडणूक अधिसुचनेत बदल केला. हे कमी की काय शनिवार दि. १० रोजी ग्रामपंचायतींचे नामांकन स्विकारण्याची अंतीम मुदत असताना आयोगाने शुक्रवारी रात्री आपल्या निवडणूक कार्यक्रमातच आश्चर्यकारकरित्या बदल केला.नवीन निवडणूक कार्यक्रमानुसार आता सोमवार दि. १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत उमेदवारांना नामांकन दाखल करण्याची मुभा देण्यात आली असून, दि. १४ रोजी छाननी, १६ रोजी माघार व २७ फेब्रुवारी रोजी मतदान होऊन दुस-या दिवशी मतमोजणी केली जाणार आहे. आयोगाच्या या ऐनवेळच्या फतव्यामुळे निवडणूक अधिका-यांची धावपळ उडाली असून, शनिवार, रविवारी सुटी आल्याने ग्रामपंचायतींपर्यंत आयोगाचा कार्यक्रम कसा पोहोचवायचा असा प्रश्न पडला आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकNashikनाशिक