शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

पालखेडच्या आवर्तनाने दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 23:55 IST

पाटोदा : रब्बी हंगामासाठी पालखेड कालव्यास आवर्तन सोडण्यात आले आहे.सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची गरज असतांना आवर्तन सोडण्यात आल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.गेल्या काही दिवसांपासून पालखेड कालव्यास पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शेतकरी वर्गाने केली होती.

ठळक मुद्देकालव्यास पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शेतकरी वर्गाने केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : रब्बी हंगामासाठी पालखेड कालव्यास आवर्तन सोडण्यात आले आहे.सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची गरज असतांना आवर्तन सोडण्यात आल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.गेल्या काही दिवसांपासून पालखेड कालव्यास पाणी सोडण्यात यावे अशी मागणी शेतकरी वर्गाने केली होती.यावर्षी धरण लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने तीन मिहन्यापेक्षा जास्त दिवस ओव्हरफ्लो आवर्तन सोडण्यात आले होते.या आवर्तनातून तालुक्यातील सर्व लहान मोठे बंधारे भरण्यात आले होते .त्यामुळे या वर्षी पिकांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याने शेतकर्यांनी रब्बी हंगामातील कांद्याची मोठया प्रमाणात लागवड केली आहे. मागील मिहन्यात रब्बीसाठी आवर्तन दिल्याने शेतकरी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, व भाजीपाला पिकांना या आवर्तनाचा लाभ झाला होता.सध्या कडक उन्हाचे दिवस सुरु झाल्याने पिकांना पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून विहिरीतील पाण्याचा उपसा लवकर होत असल्याने पिकांना पाणी टंचाईचा फटका बसला असल्याने कालव्यास आवर्तन सोडावे अशी मागणी शेतकर्यांनी केली होती. त्याचप्रमाणे येवला तालुक्यात मोठया प्रमाणात द्राक्ष व डाळिंब बागा असून त्यांनाही पाणी टंचाईची झळ बसण्यास सुरु वात झाली होती.त्यामुळे शेतकरी वर्गातून आवर्तन सोडण्याची मागणी होत होती.या आवर्तनाने तालुक्यातील अडोतीस गाव पाणी पुरवठा योजना येवला तसेच मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारे तलाव व मनमाड रेल्वेला पाणी पुरवठा करणारा तलाव भरला जाणार असल्याने पाणी टंचाईची ओरड कमी होणार आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकDamधरण