शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

नाटकांच्या रंगीत तालमींना वेग

By admin | Updated: November 15, 2015 22:58 IST

माहोल तयार : राज्य नाट्य स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात

नाशिक : येत्या मंगळवारपासून शहरात (दि. १७) रंगणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, रंगकर्मींच्या रंगीत तालमींना वेग आला आहे. विशेषत: पहिल्या आठवड्यात नाटके असलेल्या चमूंची सध्या युद्धपातळीवर धावपळ सुरू आहे. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात १७ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी होणार असून, स्पर्धेत एकूण २१ नाटके सादर होणार आहेत. त्यांत नाशिकच्या १९ नाटकांचा समावेश आहे. संचालनालयाकडून नाटकांना हिरवा कंदील मिळाल्यानंतर या संस्थांनी सुमारे दोन महिन्यांपासून कलावंतांच्या भूमिकांची निश्चिती, नेपथ्याची रचना, वेशभूषा-केशभूषा, त्यासाठी साहित्याची जमवाजमव सुरू केली होती. आता त्यांच्या तयारीवर अंतिम हात फिरवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे शहरातील संबंधित ठिकाणे युवा रंगकर्मींनी गजबजून जात असून, नाटकाविषयी चर्चा रंगू लागल्या आहेत. गेल्या वर्षी लोकहितवादी मंडळाच्या ‘न हि वैरेन वैराणि’ या नाटकाने अंतिम फेरीत प्रथम पारितोषिक पटकावल्याने शहरातील रंगकर्मींचा उत्साह वाढला असून, त्याचा परिणाम तालमींवरही दिसून येत आहे.