शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

कुलाबा वेधशाळा : ‘ओखी’अति तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात; तीव्रता होणार कमी; मध्यरात्री धडकणार सुरतेत

By azhar.sheikh | Updated: December 5, 2017 21:52 IST

मुंबई, नाशिकचे सरासरीपेक्षा कमाल तपमानात १० अंशाने घट झाली तर किमान तपमानात वाढ झाली. वादळ अती तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात पोहचल्याने तीव्रता काही प्रमाणात कमी झाली असून पुढील काही तासांमध्ये ती अजून कमी होणार असल्याची माहिती कुलाबा वेधशाळेने ‘लोकमत’ला दिली.

ठळक मुद्दे. यापुर्वी ‘ओखी’ वादळाचं नाव ‘मोरा’ असे होते ते थायलॅँडने दिले. शेतक-यांनी योग्य ती खबरदारी अवश्य घ्यावी; मात्र धास्ती घेऊ नयेमध्यरात्री चक्रीवादळ सुरतजवळ धडकणार

नाशिक : दक्षिण किनारपट्टीवरून सुरू झालेल्या ‘ओखी’ चक्रीवादळाचा तडाखा कमी होत जाणार आहे. कारण हे वादळ अति तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात पोहचले आहे. मध्यरात्री चक्रीवादळ सुरतजवळ धडकणार असून पुढे वादळाची तीव्रता कमी होत जाणार असल्याचे कुलाबा वेधशाळेच्या सुत्रांनी सांगितले.मागील चार ते पाच दिवसांपासून ओखी या चक्रीवादळाने भारताच्या दक्षिण किनारपट्टीवर थैमान घालत गुजरातकडे मोर्चा वळविला. या वादळाने दक्षिण भारतातील केरळ, तमिळनाडूसह आदि राज्यांना मोठा तडाखा दिला. ‘ओखी’च्या वाढत्या तीव्रतेमुळे सोमवारपासून मुंबईत संध्याकाळी पावसाला सुरूवात झाली. मंगळवारी पहाटेपासून उत्तर कोकणासह पालघर, ठाणे, रायगड, धुळे, नंदूरबार, नाशिक, जळगाव, अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी तुरळक, मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. वा-याचा वेगही सरासरीपेक्षा वाढल्याचे निरिक्षण हवामान खात्याकडून नोंदविले गेले. मुंबई, नाशिकचे सरासरीपेक्षा कमाल तपमानात १० अंशाने घट झाली तर किमान तपमानात वाढ झाली. वादळ अती तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात पोहचल्याने तीव्रता काही प्रमाणात कमी झाली असून पुढील काही तासांमध्ये ती अजून कमी होणार असल्याची माहिती कुलाबा वेधशाळेने ‘लोकमत’ला दिली.

--‘ओखी’ एक दृष्टिक्षेपात...बांग्लादेशाने या चक्रीवादळाला ‘ओखी’ हे नाव दिले. बंगाली भाषेत या शब्दाचा अर्थ डोळा होतो. हिंदी महासागर अर्थात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील वादळांना ‘उष्णकटिबंधीय वादळं’ असे म्हणतात. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन झालेल्या भौगोलिक स्थितीचे चक्रीवादळात रुपांतर झाले. भारतीय उपखंडातील वादळांसाठी भारत, बांग्लादेश, म्यानमार, मालदीवसह आठ देशांनी नावे ठरविली आहेत. भारताकडून चक्रीवादळाचा धोका ज्या-ज्या देशांना असतो ते सर्व देश एकत्र येऊन नावे सुुचवितात. यापुर्वी ‘ओखी’ वादळाचं नाव ‘मोरा’ असे होते ते थायलॅँडने दिले. ‘ओखी’चे पुढील नाव ‘सागर’ असेल व ते भारताकडून दिले जाईल.

--शेतक-यांसाठी दिलासा; खबरदारी गरजेचीओखी वादळामुळे निर्माण झालेल्या ढगाळ हवामानामुळे द्राक्षबागांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणारी नाही; मात्र नाशिक जिल्ह्यात पुढील काही तासांत सोसाट्याचा वारा किंवा गारपिटीची शक्यता अजिबात नसल्याचा, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने मंगळवारी वर्तविला. शेतक-यांनी योग्य ती खबरदारी अवश्य घ्यावी; मात्र धास्ती घेऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. 

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळNashikनाशिकagricultureशेती