शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
6
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
7
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
8
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
9
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
10
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
11
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
12
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
13
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
14
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
15
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
16
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
17
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
18
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
19
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
20
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा

कुलाबा वेधशाळा : ‘ओखी’अति तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात; तीव्रता होणार कमी; मध्यरात्री धडकणार सुरतेत

By azhar.sheikh | Updated: December 5, 2017 21:52 IST

मुंबई, नाशिकचे सरासरीपेक्षा कमाल तपमानात १० अंशाने घट झाली तर किमान तपमानात वाढ झाली. वादळ अती तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात पोहचल्याने तीव्रता काही प्रमाणात कमी झाली असून पुढील काही तासांमध्ये ती अजून कमी होणार असल्याची माहिती कुलाबा वेधशाळेने ‘लोकमत’ला दिली.

ठळक मुद्दे. यापुर्वी ‘ओखी’ वादळाचं नाव ‘मोरा’ असे होते ते थायलॅँडने दिले. शेतक-यांनी योग्य ती खबरदारी अवश्य घ्यावी; मात्र धास्ती घेऊ नयेमध्यरात्री चक्रीवादळ सुरतजवळ धडकणार

नाशिक : दक्षिण किनारपट्टीवरून सुरू झालेल्या ‘ओखी’ चक्रीवादळाचा तडाखा कमी होत जाणार आहे. कारण हे वादळ अति तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात पोहचले आहे. मध्यरात्री चक्रीवादळ सुरतजवळ धडकणार असून पुढे वादळाची तीव्रता कमी होत जाणार असल्याचे कुलाबा वेधशाळेच्या सुत्रांनी सांगितले.मागील चार ते पाच दिवसांपासून ओखी या चक्रीवादळाने भारताच्या दक्षिण किनारपट्टीवर थैमान घालत गुजरातकडे मोर्चा वळविला. या वादळाने दक्षिण भारतातील केरळ, तमिळनाडूसह आदि राज्यांना मोठा तडाखा दिला. ‘ओखी’च्या वाढत्या तीव्रतेमुळे सोमवारपासून मुंबईत संध्याकाळी पावसाला सुरूवात झाली. मंगळवारी पहाटेपासून उत्तर कोकणासह पालघर, ठाणे, रायगड, धुळे, नंदूरबार, नाशिक, जळगाव, अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी तुरळक, मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. वा-याचा वेगही सरासरीपेक्षा वाढल्याचे निरिक्षण हवामान खात्याकडून नोंदविले गेले. मुंबई, नाशिकचे सरासरीपेक्षा कमाल तपमानात १० अंशाने घट झाली तर किमान तपमानात वाढ झाली. वादळ अती तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात पोहचल्याने तीव्रता काही प्रमाणात कमी झाली असून पुढील काही तासांमध्ये ती अजून कमी होणार असल्याची माहिती कुलाबा वेधशाळेने ‘लोकमत’ला दिली.

--‘ओखी’ एक दृष्टिक्षेपात...बांग्लादेशाने या चक्रीवादळाला ‘ओखी’ हे नाव दिले. बंगाली भाषेत या शब्दाचा अर्थ डोळा होतो. हिंदी महासागर अर्थात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील वादळांना ‘उष्णकटिबंधीय वादळं’ असे म्हणतात. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन झालेल्या भौगोलिक स्थितीचे चक्रीवादळात रुपांतर झाले. भारतीय उपखंडातील वादळांसाठी भारत, बांग्लादेश, म्यानमार, मालदीवसह आठ देशांनी नावे ठरविली आहेत. भारताकडून चक्रीवादळाचा धोका ज्या-ज्या देशांना असतो ते सर्व देश एकत्र येऊन नावे सुुचवितात. यापुर्वी ‘ओखी’ वादळाचं नाव ‘मोरा’ असे होते ते थायलॅँडने दिले. ‘ओखी’चे पुढील नाव ‘सागर’ असेल व ते भारताकडून दिले जाईल.

--शेतक-यांसाठी दिलासा; खबरदारी गरजेचीओखी वादळामुळे निर्माण झालेल्या ढगाळ हवामानामुळे द्राक्षबागांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणारी नाही; मात्र नाशिक जिल्ह्यात पुढील काही तासांत सोसाट्याचा वारा किंवा गारपिटीची शक्यता अजिबात नसल्याचा, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने मंगळवारी वर्तविला. शेतक-यांनी योग्य ती खबरदारी अवश्य घ्यावी; मात्र धास्ती घेऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. 

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळNashikनाशिकagricultureशेती