शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

शेतमाल विक्रीची सहकारी  गृह निर्माण सोसायट्यांना मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 01:33 IST

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कृषी मालाला शहरी भागात बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबरोबरच शहरी नागरिकांना ताजा व स्वस्त दरात भाजीपाला, कृषी उत्पादने मिळण्यासाठी राज्याच्या सहकार व पणन विभागाने सहकारी गृह निर्माण संस्थांमध्ये अशा प्रकारचा माल विकण्यास परवानगी दिली आहे. गृह निर्माण संस्थेने आपल्या आवारातच यासाठी शॉप उभारून सदस्यांसाठी स्वस्त दरात माल विक्रीची मुभा देण्यात आली आहे.

नाशिक : शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कृषी मालाला शहरी भागात बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबरोबरच शहरी नागरिकांना ताजा व स्वस्त दरात भाजीपाला, कृषी उत्पादने मिळण्यासाठी राज्याच्या सहकार व पणन विभागाने सहकारी गृह निर्माण संस्थांमध्ये अशा प्रकारचा माल विकण्यास परवानगी दिली आहे. गृह निर्माण संस्थेने आपल्या आवारातच यासाठी शॉप उभारून सदस्यांसाठी स्वस्त दरात माल विक्रीची मुभा देण्यात आली आहे.अटल महापणन विकास अभियानांतर्गत हा निर्णय घेण्यात आला असून, यापूर्वीही शासनाने खरेदी-विक्री संघ, विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून हा प्रयोग करून पाहिला होता. परंतु त्याला ग्राहकांअभावी प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या योजनेत थोडा बदल करून त्यात सहकारी गृह निर्माण संस्थांना प्राधान्य देण्यात आले आहे. या योजनेमागचा हेतू म्हणजे कृषी उत्पादनांची विक्री व्यवस्था उभारणे, शेतकरी व ग्राहक यांच्यातील मध्यस्थ दूर करणे, कृषी मालाला रास्त दर मिळवून देण्याचा आहे. सध्या शेतकºयाचा माल बाजार समितीशिवाय अन्य ठिकाणी विकला जात नाही किंबहुना त्याने उत्पादित केलेला सर्वच माल बाजार समिती वगळता कोणी घेतही नाही. अशा परिस्थितीत व्यापाºयांकडून शेतकºयांची अडवणूक केली जात असल्याने त्यावर सहकारी गृह निर्माण सोसायट्यांमध्येच शेतकºयांच्या मालाची विक्री व्यवस्थेची साखळी उभारून दोन्ही घटकांचा त्यात लाभ होणार असल्याचे पणन महामंडळाचे म्हणणे आहे. त्यासाठी शेतमाल तयार करणारे घटक, शेतकरी गट, उत्पादक कंपन्या, महिला बचत गट अशा सर्वांना या योजनेत सहभागी होता येणार आहे.वेळ, खर्चाची बचत होणारसोसायटीच्या आवारातच शॉप उभारून स्वस्त दरात सभासद सदस्यांना ताजा माल उपलब्ध करून त्यातून मिळणाºया उत्पादनातून शॉपचा खर्च भागविणे शक्य आहे. त्यासाठी सोसायटीत किमान शंभर स्क्वेअर फूट शॉप उभारणे गरजेचे असून, संस्थेने आॅर्डर दिल्याप्रमाणे संबंधित उत्पादक घरपोहोच माल पुरवतील व तो स्वस्त दरात उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. त्यामुळे उत्पादकाला हक्काचा ग्राहक मिळेल व ग्राहकालाही दाराशीच स्वस्त दरात ताजा माल मिळून वेळ व खर्चात बचत होणार आहे.

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजार