शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

राज्यात कडक लॉकडाऊन करा, सरकारमधील ज्येष्ठ मंत्र्याची मागणी; अजितदादांशी चर्चा, मुख्यमंत्र्यांशीही बोलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 08:28 IST

जीवनावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिक गैरफायदा घेत मोकाट फिरत असून परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे.

नाशिक : जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे, रेमडेसिविर पुरेसे मिळत नाहीत, बेड प्रचंड वाढवूनही अपुरे पडत आहेत ही परिस्थिती आहे. तरीदेखील नागरिक जीवनावश्यकच्या नावाखाली बाहेर फिरत असून कुठेही ब्रेक द चेन होताना दिसत नाही. एकूणच परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. त्यामुळे यापेक्षाही अधिक कठोर पाऊल म्हणजे कदाचित पूर्ण लॉकडाऊनचे पाऊलही उचलावे लागणार आहे. मात्र, त्याबाबत मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना कळवले असून तो निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

नाशिकमधील कोरोना परिस्थितीचा शनिवारी (दि.१७) आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जीवनावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिक गैरफायदा घेत मोकाट फिरत असून परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन करून परिस्थितीची कल्पना दिली असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे नाशिकमध्ये पूर्णपणे लाॅकडाऊनची मागणी करणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यातील भाजपा आमदार, आमच्या आघाडीतील आमदारांनीदेखील लॉकडाऊन लावा अशीच मागणी केली असून व्यापारी, किराणा दुकानदार यांनीदेखील लाॅकडाऊनला पाठिंबा दर्शवला असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले. मात्र, त्याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घेतील, असे सांगत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी लाॅकडाऊनचे स्पष्ट संकेत दिले.

इन्फो

ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा

शहरात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा असल्याचे नाकारता येत नाही. सद्यस्थितीत १३९ मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी असून फक्त ८७ टन ऑक्सिजन उपलब्ध होत आहे. तसेच वाढती रुग्णसंख्या पाहता हा तुटवडा वाढतच जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनीच संयम बाळगून स्वत:ची काळजी घेण्याची गरज असल्याचे भुजबळ म्हणाले.

 मागणी १० हजारांची मिळतात ५००

रेमडेसिविरसारख्या औषधाची मागणी जिल्ह्यात सध्या १० हजार असून इथे दिवसाला ५०० किंवा ६०० मिळत असल्याने त्या औषधांचादेखील तुटवडा आहे. मात्र, ते औषध असेल तरच जीव वाचतो, असे नसून त्या औषधाने केवळ लवकर बरे होता येते. त्याशिवायची अन्य औषधे वापरुनही रुग्ण बरे होत आहेत. रेमडिसिविर तयार करणाऱ्या कंपन्यांशी संवाद साधून मागणी नोंदविली असून २० एप्रिलनंतरच रेमडेसिविर त्यांच्याकडून अधिक प्रमाणात उपलब्ध होऊ शकणार असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले.

 वेगाने प्रसारात नाशिक तिसऱ्या स्थानी

अत्यंत वेगाने कोरोना फैलावत असलेल्या देशातील शहरांमध्ये नाशिक पहिल्या नव्हे, तर तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानी आहे. मात्र, ही परिस्थितीदेखील वाईटच असून त्यामुळेच गत १५ दिवसांत आपण २ हजार बेड वाढविले आहेत. त्यामुळे आता आणखी प्रसार व्हायला नको, असल्याने कुंभमेळ्यावरून आलेल्या नागरिकांनी त्वरित टेस्ट करून घ्यावी असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसChhagan Bhujbalछगन भुजबळNashikनाशिक