शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

नाशिक जिल्ह्यातील ८७ टक्के पाऊस शासकीय दप्तरात बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 16:16 IST

ब्रिटिश काळापासून १ जूनपासून पावसाळा सुरू होत असल्यामुळे शासकीय दप्तरात तेव्हापासून दैनंदिन पाऊस नोंदविला जातो व ३० सप्टेंबर हा पावसाळ्यातील सर्वात शेवटचा दिवस मानला जातो. त्यामुळे १ आॅक्टोबरनंतर पडणारा पाऊस हा अवकाळी मानला गेला आहे.

ठळक मुद्देपेठ, सुरगाण्यात शंभरी : निफाड, नांदगावला जेमतेम ५० टक्के यंदा अन्नधान्याच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची चिन्हे

नाशिक : पाऊस व धरणांचे माहेरघर असलेल्या नाशिक जिल्ह्यात यंदा १ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान जेमतेम ८७ टक्केच पाऊस झाला असून, ब्रिटिशकालीन पद्धतीनुसार हा जलसाठा शासकीय दप्तरात बंद करण्यात आला आहे. यंदा पावसाळ्यातच निर्माण झालेली पाण्याची टंचाई व धरणांमध्येही तशीच परिस्थिती असल्यामुळे यावर्षी डिसेंबरपासूनच जिल्हावासीयांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. संपूर्ण पावसाळ्यात फक्त पेठ व सुरगाणा या पावसाच्या माहेरघरीच शंभर टक्क्याहून अधिक पर्जन्यमानाची नोंद झाली, तर दोन तालुक्यांनी कशीबशी पन्नाशी गाठली आहे.ब्रिटिश काळापासून १ जूनपासून पावसाळा सुरू होत असल्यामुळे शासकीय दप्तरात तेव्हापासून दैनंदिन पाऊस नोंदविला जातो व ३० सप्टेंबर हा पावसाळ्यातील सर्वात शेवटचा दिवस मानला जातो. त्यामुळे १ आॅक्टोबरनंतर पडणारा पाऊस हा अवकाळी मानला गेला आहे. त्याची नोंद शासकीय दप्तरात केली जात नाही. त्यामुळे ३० सप्टेंबर अखेरच्या पावसावरच धरणाच्या पाण्याचे पुढील नियोजन केले जाते. गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास २७ टक्क्याने यंदा पर्जन्यमान घटले असून, गेल्यावर्षी ३० सप्टेंबर अखेर जिल्ह्यात ११४.७ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे मार्च महिन्यातच पिण्याच्या पाण्याची ग्रामीण भागात मागणी वाढली होती. यंदा मात्र जवळपास २७ टक्के पर्जन्यमान घटल्यामुळे शेतकरी व शासकीय यंत्रणा दोन्हीही काळजीत पडले आहे. यंदाच्या पावसाळ्याचे वैशिष्ट्ये म्हणजे पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर व इगतपुरी या दोन्ही तालुक्यांमध्येदेखील शंभर टक्के पाऊस पडलेला नाही. याठिकाणी अनुक्रमे ९७.२५ व ७२.८५ टक्के पावसाची नोंद करण्यात आल्याने त्यावरून अन्य तालुक्यांमध्ये पावसाची काय परिस्थिती असेल याची कल्पना येते. निफाड तालुक्यात ५० टक्के तर नांदगाव तालुक्यात ४९ टक्केच पाऊस पडल्याने तेथील खरीप पिके तर हातची गेलीच, परंतु यंदा रब्बी हंगाम पूर्ण कोरडा जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या अवकाळी पाऊस अधूनमधून हजेरी लावत असला तरी, त्याचा आता खरिपाच्या पिकांना काहीच फायदा नाही, मुळात खरीप पिके काढणीवर आली असून, काही पिके तर पावसाअभावी खुरडली गेली आहे. अशा परिस्थितीत यंदा अन्नधान्याच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

टॅग्स :RainपाऊसNashikनाशिक