शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
4
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
5
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
6
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
7
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
8
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
9
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
10
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
11
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
12
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
13
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
14
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
15
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
16
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
17
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात

नाशिक जिल्ह्यातील ८७ टक्के पाऊस शासकीय दप्तरात बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 16:16 IST

ब्रिटिश काळापासून १ जूनपासून पावसाळा सुरू होत असल्यामुळे शासकीय दप्तरात तेव्हापासून दैनंदिन पाऊस नोंदविला जातो व ३० सप्टेंबर हा पावसाळ्यातील सर्वात शेवटचा दिवस मानला जातो. त्यामुळे १ आॅक्टोबरनंतर पडणारा पाऊस हा अवकाळी मानला गेला आहे.

ठळक मुद्देपेठ, सुरगाण्यात शंभरी : निफाड, नांदगावला जेमतेम ५० टक्के यंदा अन्नधान्याच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची चिन्हे

नाशिक : पाऊस व धरणांचे माहेरघर असलेल्या नाशिक जिल्ह्यात यंदा १ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान जेमतेम ८७ टक्केच पाऊस झाला असून, ब्रिटिशकालीन पद्धतीनुसार हा जलसाठा शासकीय दप्तरात बंद करण्यात आला आहे. यंदा पावसाळ्यातच निर्माण झालेली पाण्याची टंचाई व धरणांमध्येही तशीच परिस्थिती असल्यामुळे यावर्षी डिसेंबरपासूनच जिल्हावासीयांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. संपूर्ण पावसाळ्यात फक्त पेठ व सुरगाणा या पावसाच्या माहेरघरीच शंभर टक्क्याहून अधिक पर्जन्यमानाची नोंद झाली, तर दोन तालुक्यांनी कशीबशी पन्नाशी गाठली आहे.ब्रिटिश काळापासून १ जूनपासून पावसाळा सुरू होत असल्यामुळे शासकीय दप्तरात तेव्हापासून दैनंदिन पाऊस नोंदविला जातो व ३० सप्टेंबर हा पावसाळ्यातील सर्वात शेवटचा दिवस मानला जातो. त्यामुळे १ आॅक्टोबरनंतर पडणारा पाऊस हा अवकाळी मानला गेला आहे. त्याची नोंद शासकीय दप्तरात केली जात नाही. त्यामुळे ३० सप्टेंबर अखेरच्या पावसावरच धरणाच्या पाण्याचे पुढील नियोजन केले जाते. गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास २७ टक्क्याने यंदा पर्जन्यमान घटले असून, गेल्यावर्षी ३० सप्टेंबर अखेर जिल्ह्यात ११४.७ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे मार्च महिन्यातच पिण्याच्या पाण्याची ग्रामीण भागात मागणी वाढली होती. यंदा मात्र जवळपास २७ टक्के पर्जन्यमान घटल्यामुळे शेतकरी व शासकीय यंत्रणा दोन्हीही काळजीत पडले आहे. यंदाच्या पावसाळ्याचे वैशिष्ट्ये म्हणजे पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर व इगतपुरी या दोन्ही तालुक्यांमध्येदेखील शंभर टक्के पाऊस पडलेला नाही. याठिकाणी अनुक्रमे ९७.२५ व ७२.८५ टक्के पावसाची नोंद करण्यात आल्याने त्यावरून अन्य तालुक्यांमध्ये पावसाची काय परिस्थिती असेल याची कल्पना येते. निफाड तालुक्यात ५० टक्के तर नांदगाव तालुक्यात ४९ टक्केच पाऊस पडल्याने तेथील खरीप पिके तर हातची गेलीच, परंतु यंदा रब्बी हंगाम पूर्ण कोरडा जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या अवकाळी पाऊस अधूनमधून हजेरी लावत असला तरी, त्याचा आता खरिपाच्या पिकांना काहीच फायदा नाही, मुळात खरीप पिके काढणीवर आली असून, काही पिके तर पावसाअभावी खुरडली गेली आहे. अशा परिस्थितीत यंदा अन्नधान्याच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

टॅग्स :RainपाऊसNashikनाशिक