शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

कळसूबाई शिखरावर स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:21 IST

नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनने शनिवारी महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेल्या कळसूबाई शिखरावर स्वच्छता मोहीम राबवली. आरोग्य संवर्धनाचा संदेश देण्याबरोेबरच सामाजिक उपक्रम म्हणून विविध उपक्रम राबविणाºया सायक्लिस्टच्या वतीने कळसूबाई शिखरावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

नाशिक : नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनने शनिवारी महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेल्या कळसूबाई शिखरावर स्वच्छता मोहीम राबवली. आरोग्य संवर्धनाचा संदेश देण्याबरोेबरच सामाजिक उपक्रम म्हणून विविध उपक्रम राबविणाºया सायक्लिस्टच्या वतीने कळसूबाई शिखरावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.  नेहमीच समाजाचे भान ठेवत सामाजिक उपक्रम राबविणाºया नाशिक सायकलिस्टच्या या उपक्र मात दहा लहान मुलांसह सुमारे १५० सभासद सहभागी झाले होते.  यावेळी कळसूबाई शिखर चढाईच्या संपूर्ण मार्गावर पर्यावरण व स्वच्छतेचे संदेश देणाºया १५ कचराकुंड्या लावण्यात आल्या. त्यावर विशेष असे संदेश असलेले फलक लावण्यात आले आहेत. यावेळी स्वच्छतेबाबत सर्वांनी शपथ घेतली. परिसर स्वच्छ राहावा, यासाठी वारंवार विविध ठिकाणी अशा मोहिमा राबविण्यात येणार आहेत. नाशिक सायकलिस्टचे मार्गदर्शक आयपीएस अधिकारी हरीश बैजल यांच्या संकल्पनेतून ही मोहीम राबविण्यात आली.  नाशिक सायकलिस्ट्सचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया, सचिव नितीन भोसले, शैलेश राजहंस आणि डॉ. मनीषा रौंदळ यांनी संपूर्ण मोहिमेचे अचूक नियोजन केले. योगेश शिंदे आणि त्यांच्या टीमने चढाई मार्गावर फलक लावण्यासाठी मेहनत घेतली. फलक लावण्यासाठी स्वामी समर्थ माध्यमिक व महाविद्यालय राजूर (अकोले) यांच्या हिवाळी शिबिरानिमित्त आलेले विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक भोर यांनी विशेष परिश्रम घेतले. ट्रेकर सुरेंद्र शेळके यांनी २३ तारखेला रात्री शिखरावर मुक्काम करत सायकलिस्ट्स सदस्यांकडून राहिलेला कचरा गोळा करत पुण्याला रवाना झाले.  हरीश बैजल सहकुटुंब या मोहिमेत सहभागी झाले होते. जळगावचे अनिल सोनवणे हे रात्रभर प्रवास करत या खास मोहिमेत सहभागी झाले. शिखरावरील मंदिराजवळ त्यांच्या चाळीस लोकांच्या टीमने साफसफाई केली. राजूरचे शांताराम काळे यांनी गावातील पंधरा मुलांना या मोहिमेत सहभागी करून घेतले. एस्पालिअर शाळेचे सचिन जोशी यांनी बसेस उपलब्ध करून दिल्या. गोळा केलेला कचरा पुनर्वापरासाठी पाठविला शनिवारी सकाळी ५ वाजता गोल्फ क्लब मैदान येथून १५० जणांच्या टीमने कळसूबाई शिखराकडे प्रस्थान केले. शिखरावर पोहचल्यानंतर सर्वांनी मिळून एकूण ५० गोणी कचरा गोळा केला. गोळा केलेला कचरा एका ट्रकमध्ये भरून तो पुनर्वापर करण्यासाठी नाशिकला पाठविण्यात आला.

टॅग्स :Nashikनाशिक