शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

कळसूबाई शिखरावर स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:21 IST

नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनने शनिवारी महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेल्या कळसूबाई शिखरावर स्वच्छता मोहीम राबवली. आरोग्य संवर्धनाचा संदेश देण्याबरोेबरच सामाजिक उपक्रम म्हणून विविध उपक्रम राबविणाºया सायक्लिस्टच्या वतीने कळसूबाई शिखरावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

नाशिक : नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनने शनिवारी महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेल्या कळसूबाई शिखरावर स्वच्छता मोहीम राबवली. आरोग्य संवर्धनाचा संदेश देण्याबरोेबरच सामाजिक उपक्रम म्हणून विविध उपक्रम राबविणाºया सायक्लिस्टच्या वतीने कळसूबाई शिखरावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.  नेहमीच समाजाचे भान ठेवत सामाजिक उपक्रम राबविणाºया नाशिक सायकलिस्टच्या या उपक्र मात दहा लहान मुलांसह सुमारे १५० सभासद सहभागी झाले होते.  यावेळी कळसूबाई शिखर चढाईच्या संपूर्ण मार्गावर पर्यावरण व स्वच्छतेचे संदेश देणाºया १५ कचराकुंड्या लावण्यात आल्या. त्यावर विशेष असे संदेश असलेले फलक लावण्यात आले आहेत. यावेळी स्वच्छतेबाबत सर्वांनी शपथ घेतली. परिसर स्वच्छ राहावा, यासाठी वारंवार विविध ठिकाणी अशा मोहिमा राबविण्यात येणार आहेत. नाशिक सायकलिस्टचे मार्गदर्शक आयपीएस अधिकारी हरीश बैजल यांच्या संकल्पनेतून ही मोहीम राबविण्यात आली.  नाशिक सायकलिस्ट्सचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया, सचिव नितीन भोसले, शैलेश राजहंस आणि डॉ. मनीषा रौंदळ यांनी संपूर्ण मोहिमेचे अचूक नियोजन केले. योगेश शिंदे आणि त्यांच्या टीमने चढाई मार्गावर फलक लावण्यासाठी मेहनत घेतली. फलक लावण्यासाठी स्वामी समर्थ माध्यमिक व महाविद्यालय राजूर (अकोले) यांच्या हिवाळी शिबिरानिमित्त आलेले विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक भोर यांनी विशेष परिश्रम घेतले. ट्रेकर सुरेंद्र शेळके यांनी २३ तारखेला रात्री शिखरावर मुक्काम करत सायकलिस्ट्स सदस्यांकडून राहिलेला कचरा गोळा करत पुण्याला रवाना झाले.  हरीश बैजल सहकुटुंब या मोहिमेत सहभागी झाले होते. जळगावचे अनिल सोनवणे हे रात्रभर प्रवास करत या खास मोहिमेत सहभागी झाले. शिखरावरील मंदिराजवळ त्यांच्या चाळीस लोकांच्या टीमने साफसफाई केली. राजूरचे शांताराम काळे यांनी गावातील पंधरा मुलांना या मोहिमेत सहभागी करून घेतले. एस्पालिअर शाळेचे सचिन जोशी यांनी बसेस उपलब्ध करून दिल्या. गोळा केलेला कचरा पुनर्वापरासाठी पाठविला शनिवारी सकाळी ५ वाजता गोल्फ क्लब मैदान येथून १५० जणांच्या टीमने कळसूबाई शिखराकडे प्रस्थान केले. शिखरावर पोहचल्यानंतर सर्वांनी मिळून एकूण ५० गोणी कचरा गोळा केला. गोळा केलेला कचरा एका ट्रकमध्ये भरून तो पुनर्वापर करण्यासाठी नाशिकला पाठविण्यात आला.

टॅग्स :Nashikनाशिक