शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
4
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
5
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
6
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
7
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
8
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
9
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
10
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
11
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
12
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
13
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
14
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
15
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
16
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
17
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
18
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
19
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
20
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?

आयुक्तांनी घेतला मनपा शिक्षकांचा वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 01:10 IST

नाशिक : महापालिका शाळेमधील शिक्षक अध्ययनच विसरले असल्याने शाळा आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. चांगले विद्यार्थी घडविण्यापेक्षा चांगला माणूस घडविण्यासाठी शिक्षकाने शिक्षक म्हणूनच आपली छाप सोडणे अपेक्षित आहे. मात्र शिकविण्याची साचेबद्ध पद्धतीमुळे सर्वांगीण शिक्षण हरवून बसल्याचे प्रतिपादन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दुपारच्या ...

ठळक मुद्देगुणवत्तेचे दिले धडे : गुरूजीच अभ्यास विसरल्याचा टोला

नाशिक : महापालिका शाळेमधील शिक्षक अध्ययनच विसरले असल्याने शाळा आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. चांगले विद्यार्थी घडविण्यापेक्षा चांगला माणूस घडविण्यासाठी शिक्षकाने शिक्षक म्हणूनच आपली छाप सोडणे अपेक्षित आहे. मात्र शिकविण्याची साचेबद्ध पद्धतीमुळे सर्वांगीण शिक्षण हरवून बसल्याचे प्रतिपादन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दुपारच्या सत्रात कालिदास कलामंदिरात महापालिका शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना गुणवत्ता आणि कौशल्यपूर्ण शिक्षणाचे धडे दिले. शिक्षणाच्या बाजारीकरणाला प्राथमिक शिक्षणातील उदासीनता आणि शिक्षकांची मानसिकता कारणीभूत असून, ही व्यवस्था बदलण्याची गरज आहे. शिक्षक म्हणजे काय आणि आपली भूमिका कशी असली पाहिजे हे अगोदर शिकण्याची गरज आहे. शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवसापासून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे नियोजन करून विद्यार्थ्यांना शिकविले पाहिजे. परंपरागत चालत आलेल्या पद्धतीप्रमाणे न जाता नावीन्यपूर्ण अध्ययन आणि अध्यापन कौशल्याचा वापर शिक्षकांनी केला तरच महापालिका शाळांमध्ये विद्यार्र्थी टिकतील. यासाठी शिक्षक, विद्यार्थी, पालक, संस्थाचालक यांच्यात समन्वय निर्माण होण्याची गरज आहे.गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आपल्याला सगळेच समजते हा गैरसमज काढून शिकण्याची प्रक्रिया स्वीकारली पाहिजे. केवळ पाठ्यपुस्तकांतून शैक्षणिक वर्ष पूर्ण होते; परंतु मुलांमध्ये शिकण्याची गुणवत्ता वाढविणे शिक्षकांच्या हाती आहे. स्वच्छतेचे धडे, वाहतूक नियमाची शिस्त, शाळेत-रस्त्यावर थुंकू नये, या नागरी जाणिवा विद्यार्थ्यांना शिक्षणातून शिकविता आल्या पाहिजेत. त्यासाठी तेवढी गुणवत्ता शिक्षकांमध्ये वाढणे अपेक्षित आहे. तुमची छाप विद्यार्थ्यांवर पडली पाहिजे. शिक्षकाच्या भूमिकेत एकरूप होऊन शिकविले तर तुम्ही लक्ष वेधून घेऊ शकता. हे केले नाही तर विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढणार नाही, कदाचित त्याचे गुण वाढतील, पण माणूस म्हणून तो प्रगल्भ होणार नाही, असे मुंढे म्हणाले.लर्निंग अ‍ॅबिलिटी वाढवाकेवळ शिकविणे एवढीच शिक्षकाची भूमिका मर्यादित नाही. विद्यार्थ्यांमधील लर्निंग अ‍ॅबिलिटी वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणिवा प्रगल्भ करण्याची भूमिका शिक्षकांनी बजविणे अपेक्षित आहे. इंग्रजी शाळांमध्ये मुलांसाठी जे उपक्रम राबविले जातात ते मनपा शाळेतही शक्य आहे. यासाठी शिक्षकांची भूमिका शिकविण्याची असली पाहिजे. मग आरोग्य असेल, एकाग्रता वाढविणे असेल, आरोग्याची काळजी असेल, संपर्ककला असेल या माध्यमातून मुलांमध्ये शिकण्याची गुणवत्ता वाढविणे अपेक्षित आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEducationशिक्षण