शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

दावे-प्रतिदावे : ई-पीडीएस प्रणालीची सक्ती; ४० टक्के शिलकी धान्यावर प्रश्नचिन्ह फक्त ६० टक्के धान्याचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 01:43 IST

नाशिक : धान्याचा काळाबाजार रोखण्याबरोबर अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने एप्रिल महिन्यापासून ई-पीडीएस बायोमेट्रीक प्रणालीद्वारे धान्य वितरणाची सक्ती रेशन दुकानदारांना केल्यामुळे जिल्ह्यातील २६६० दुकानांमधून जेमतेम एप्रिल अखेर ६० टक्केच धान्याचे वितरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्देरेशन दुकानदारांनी खापर बायोमेट्रीक प्रणालीवर फोडले आधार क्रमांकाची नोंद पुरवठा विभागाच्या सॉफ्टवेअरमध्ये

नाशिक : सार्वजनिक वितरण प्रणालीत धान्याचा काळाबाजार रोखण्याबरोबरच पात्र शिधापत्रिकाधारकाला रेशनमधून स्वस्त दरात धान्य मिळावे यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने एप्रिल महिन्यापासून ई-पीडीएस बायोमेट्रीक प्रणालीद्वारे धान्य वितरणाची सक्ती रेशन दुकानदारांना केल्यामुळे जिल्ह्यातील २६६० दुकानांमधून जेमतेम एप्रिल अखेर ६० टक्केच धान्याचे वितरण करण्यात आले आहे. प्रणालीतील दोषामुळे लाभार्थ्यांना धान्य वितरणात अडचणी येत असतील असे समजून एप्रिलचे धान्य वितरणासाठी ४ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असली तरी, त्यालाही फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने ४० टक्के शिल्लक धान्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रेशन दुकानदारांनी याचे खापर बायोमेट्रीक प्रणालीवर फोडले असले तरी, लाभार्थी दाखवा व धान्य मिळवा असे प्रत्युत्तर पुरवठा विभागाने दिले आहे. वर्षानुवर्षे रेशनच्या धान्याचा काळाबाजार होत असल्याची केली जाणारी ओरड रोखण्यासाठी पुरवठा मंत्रालयाने सार्वजनिक वितरण प्रणालीत गेल्या काही वर्षांपासून सुधारणा करण्यासाठी एकेक पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक रेशन कार्डावर नाव असलेल्या व्यक्तीच्या आधार क्रमांकाची नोंद पुरवठा विभागाच्या सॉफ्टवेअरमध्ये घेण्यात आली आहे. त्यामुळे खरे लाभार्थी स्पष्ट होण्यास मदत होणार असल्याचे पुरवठा विभागाचे म्हणणे आहे. त्याचेच पुढचे पाऊल म्हणून प्रत्येक रेशन दुकानदाराला पुरवठा विभागाने मोफत ‘पॉस’ यंत्राचे वाटप करून त्यात रेशन दुकानदाराकडील पात्र लाभार्थ्यांचा डाटा संकलित करून देण्यात आला आहे. कुटुंबातील कोणाही एका व्यक्तीच्या बायोमेट्रीक अंगठ्याच्या ठशाने धान्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे. अर्थातच पुरवठा विभागाने रेशन कार्डधारकांची सर्वच माहिती निर्दाेषपणे संकलित केली असे नव्हे तर त्यातून अनेक त्रुटी वेळोवेळी दुकानदारांनी समोर आणून प्रणालीत दुरुस्ती करण्याची मागणी गेल्या काही महिन्यांपासून लावून धरली आहे. पात्र लाभार्थी धान्यापासून वंचित राहू नये असा हेतू पुरवठा विभागाचा व रेशन दुकानदाराचा असल्यामुळे दोघांनीही प्रणालीतील तांत्रिक दोष दूर करण्याला प्राधान्य दिले असल्यामुळे एप्रिल महिन्यात सर्वच धान्याचे वाटप ई-पीडीएस प्रणालीने करण्यात आले. ज्या दुकानदाराला प्रणालित तांत्रिक अडचणी येतील त्या दूर करण्यासाठी पुरवठा विभागाने ‘रूट’ अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. पात्र लाभार्थ्याची ओळख पटवून त्यांना रूट अधिकाºयासमोरच धान्याचे वितरण केले जात आहे. प्रणालीत येणारे संभाव्य दोष समजून पुरवठा विभागाने रेशन दुकानदारांना एप्रिल महिन्याचे धान्य ४ मे पर्यंत वितरित करण्याची मुभा देण्यात आली असून, ३० एप्रिलअखेर जिल्ह्यातील २६६० रेशन दुकानांमधून जेमतेम ६० टक्केच धान्याचे वितरण झाले आहेत, नाशिक शहरातील २३० रेशन दुकानातील हेच प्रमाण ५३ टक्क्यांवर आहे. रेशन दुकानातून धान्य वितरणात आलेल्या सुस्तपणाचे कारण समजू शकले नसले तरी, ४० टक्के धान्याचा प्रश्न निर्माण झाला. एका महिन्यात प्रणालीचा वापर सुरू केल्याने जर ४० टक्के धान्य वितरित होत नसेल तर यापूर्वी शंभर टक्के धान्य कुठे व कसे वितरण झाले असा प्रश्न उपस्थित होत आहे.