शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

भूमिगत गटारी, तुंबलेल्या शौचालयाने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:31 IST

सुमारे दहा हजार लोकसंख्या असलेल्या सातपूर विभागातील प्रबुद्धनगरात अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. गल्लीबोळातील रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे.

सातपूर : सुमारे दहा हजार लोकसंख्या असलेल्या सातपूर विभागातील प्रबुद्धनगरात अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. गल्लीबोळातील रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सांडपाण्यासाठी टाकलेल्या भूमिगत गटारी पूर्णपणे तुंबल्या असून, ढाप्यांमधून दुर्गंधीयुक्त सांडपाणी सर्रास रस्त्यावरून दिवसभर वाहत असते. या दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, साथीचे आजार पसरण्याची भीती असून, तुंबलेल्या शौचालयांमुळे महिलांची कुचंबणा होत आहे.सातपूर औद्योगिक वसाहतीतील महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून प्रबुद्धनगर (झोपडपट्टी) वसाहत असून, जवळपास १० हजाराच्या आसपास लोकसंख्या आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून रोजगारासाठी आलेले लोक या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत. हळूहळू वसाहत वाढत गेली. त्या प्रमाणात लोकप्रतिनिधींनी महापालिकेच्या माध्यमातून सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला, परंतु या सुविधा पुरविताना भविष्याचा विचार करण्यात आलेला नाही. याच सुविधा आता अडचणीच्या ठरत आहेत.रस्ते काँक्रीटचे केले, नंतर ते फोडण्यात आलेत. अशा अनेक अडचणी निर्माण झाल्या असून, नागरिक त्रस्त होत आहेत.प्रबुद्धनगरात सर्वात मोठी समस्या भूमिगत सांडपाणी गटारींची आहे. संत रोहिदास चौकात भूमिगत गटारी कायम तुंबत असून, मनपाकडे वारंवार तक्रारी करूनही लक्ष देत नसल्याचे शोभा कुरणे, कमलाबाई ढाले यांनी सांगितले. कधीतरी चेंबर साफ करायला कर्मचारी आले तर घाण तशीच ठेवतात. ती घाण आम्हाला उचलावी लागत असल्याचे रंजना राजवंशी यांनी सांगितले. घरोघरी शौचालय उभारण्याची योजना अर्धवट राबविल्याचे राधेकिसन ढोके, दत्तात्रय पवार यांनी सांगितले. दादासाहेब गायकवाड चौकातदेखील सांडपाणी दिवसभर रस्त्यावर वाहत असल्याचे हिराबाई लोखंडे, पद्मा गायकवाड यांनी सांगितले. महापालिकेकडे तक्रार करूनदेखील कोणीही कर्मचारी येत नसल्याचे रमेश जाधव, राजेंद्र पगारे यांनी सांगितले. दुर्गंधीयुक्त सांडपाणी वाहत असल्याने त्यातील किडे घरात येतात असे ताईबाई लोखंडे, मसाजी शिंदे यांचे म्हणणे आहे. आम्रपाली चौकातदेखील अशीच स्थिती आहे. शौचालयाचे भांडे तुटलेले आहे. दरवाजे मोडकळीस आलेले आहेत. साफसफाई होत नसल्याचे रुक्मिणी वाव्हळे यांनी सांगितले. पैसे देऊन शौचालयाची साफसफाई करावी लागत असल्याचे अनुसया रोकडे, रब्बानी शेख, तायरा शेख यांनी सांगितले. गौतम चौकात तुंबलेल्या गटारी आम्हालाच साफ करावी लागते, असे प्रियांका देवकर, शांताराम विटकर यांनी सांगितले. बुद्धविहार परिसर पथदीप नसल्याने अंधाराचे साम्राज्य पसरत असल्याचे राजू गोतीस  यांनी सांगितले.(उद्याच्या अंकात  ,एकलव्य वसाहत, भगूर)

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक