शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

भूमिगत गटारी, तुंबलेल्या शौचालयाने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:31 IST

सुमारे दहा हजार लोकसंख्या असलेल्या सातपूर विभागातील प्रबुद्धनगरात अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. गल्लीबोळातील रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे.

सातपूर : सुमारे दहा हजार लोकसंख्या असलेल्या सातपूर विभागातील प्रबुद्धनगरात अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. गल्लीबोळातील रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सांडपाण्यासाठी टाकलेल्या भूमिगत गटारी पूर्णपणे तुंबल्या असून, ढाप्यांमधून दुर्गंधीयुक्त सांडपाणी सर्रास रस्त्यावरून दिवसभर वाहत असते. या दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, साथीचे आजार पसरण्याची भीती असून, तुंबलेल्या शौचालयांमुळे महिलांची कुचंबणा होत आहे.सातपूर औद्योगिक वसाहतीतील महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून प्रबुद्धनगर (झोपडपट्टी) वसाहत असून, जवळपास १० हजाराच्या आसपास लोकसंख्या आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून रोजगारासाठी आलेले लोक या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत. हळूहळू वसाहत वाढत गेली. त्या प्रमाणात लोकप्रतिनिधींनी महापालिकेच्या माध्यमातून सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला, परंतु या सुविधा पुरविताना भविष्याचा विचार करण्यात आलेला नाही. याच सुविधा आता अडचणीच्या ठरत आहेत.रस्ते काँक्रीटचे केले, नंतर ते फोडण्यात आलेत. अशा अनेक अडचणी निर्माण झाल्या असून, नागरिक त्रस्त होत आहेत.प्रबुद्धनगरात सर्वात मोठी समस्या भूमिगत सांडपाणी गटारींची आहे. संत रोहिदास चौकात भूमिगत गटारी कायम तुंबत असून, मनपाकडे वारंवार तक्रारी करूनही लक्ष देत नसल्याचे शोभा कुरणे, कमलाबाई ढाले यांनी सांगितले. कधीतरी चेंबर साफ करायला कर्मचारी आले तर घाण तशीच ठेवतात. ती घाण आम्हाला उचलावी लागत असल्याचे रंजना राजवंशी यांनी सांगितले. घरोघरी शौचालय उभारण्याची योजना अर्धवट राबविल्याचे राधेकिसन ढोके, दत्तात्रय पवार यांनी सांगितले. दादासाहेब गायकवाड चौकातदेखील सांडपाणी दिवसभर रस्त्यावर वाहत असल्याचे हिराबाई लोखंडे, पद्मा गायकवाड यांनी सांगितले. महापालिकेकडे तक्रार करूनदेखील कोणीही कर्मचारी येत नसल्याचे रमेश जाधव, राजेंद्र पगारे यांनी सांगितले. दुर्गंधीयुक्त सांडपाणी वाहत असल्याने त्यातील किडे घरात येतात असे ताईबाई लोखंडे, मसाजी शिंदे यांचे म्हणणे आहे. आम्रपाली चौकातदेखील अशीच स्थिती आहे. शौचालयाचे भांडे तुटलेले आहे. दरवाजे मोडकळीस आलेले आहेत. साफसफाई होत नसल्याचे रुक्मिणी वाव्हळे यांनी सांगितले. पैसे देऊन शौचालयाची साफसफाई करावी लागत असल्याचे अनुसया रोकडे, रब्बानी शेख, तायरा शेख यांनी सांगितले. गौतम चौकात तुंबलेल्या गटारी आम्हालाच साफ करावी लागते, असे प्रियांका देवकर, शांताराम विटकर यांनी सांगितले. बुद्धविहार परिसर पथदीप नसल्याने अंधाराचे साम्राज्य पसरत असल्याचे राजू गोतीस  यांनी सांगितले.(उद्याच्या अंकात  ,एकलव्य वसाहत, भगूर)

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक