शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’
2
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
3
लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
4
Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
5
राज्यात सरासरी ६७.६३% मतदान; तळेगाव दाभाडे तळात, तर कोल्हापुरातील मुरगूड अव्वल 
6
नवी मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
7
मुंबईसह देशभर विमानतळांवर गोंधळ, २०० विमाने झाली रद्द; बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची आली वेळ 
8
महामुंबईतील १९ आरएमसी प्लांट बंद, तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाखांची बँकहमी जप्त
9
महाडमध्ये दोन गटांतील राड्याप्रकरणी विकास गोगावलेंसह २० जणांवर गुन्हा, परस्परविरोधी तक्रारी दाखल
10
इंडिगोची दोन्ही विमाने रद्द; १२ तास ताटकळले संभाजीनगरकर
11
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
12
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
13
IND vs SA Turning Point Of The Match : ती एक चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
14
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
15
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
16
IND vs SA : पंचांनी चेंडू बदलून दिला, पण... KL राहुलनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?   
17
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
18
"हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे...!" जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी यांचं विधान
19
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
20
अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!
Daily Top 2Weekly Top 5

भूमिगत गटारी, तुंबलेल्या शौचालयाने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:31 IST

सुमारे दहा हजार लोकसंख्या असलेल्या सातपूर विभागातील प्रबुद्धनगरात अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. गल्लीबोळातील रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे.

सातपूर : सुमारे दहा हजार लोकसंख्या असलेल्या सातपूर विभागातील प्रबुद्धनगरात अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. गल्लीबोळातील रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सांडपाण्यासाठी टाकलेल्या भूमिगत गटारी पूर्णपणे तुंबल्या असून, ढाप्यांमधून दुर्गंधीयुक्त सांडपाणी सर्रास रस्त्यावरून दिवसभर वाहत असते. या दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, साथीचे आजार पसरण्याची भीती असून, तुंबलेल्या शौचालयांमुळे महिलांची कुचंबणा होत आहे.सातपूर औद्योगिक वसाहतीतील महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून प्रबुद्धनगर (झोपडपट्टी) वसाहत असून, जवळपास १० हजाराच्या आसपास लोकसंख्या आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून रोजगारासाठी आलेले लोक या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत. हळूहळू वसाहत वाढत गेली. त्या प्रमाणात लोकप्रतिनिधींनी महापालिकेच्या माध्यमातून सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला, परंतु या सुविधा पुरविताना भविष्याचा विचार करण्यात आलेला नाही. याच सुविधा आता अडचणीच्या ठरत आहेत.रस्ते काँक्रीटचे केले, नंतर ते फोडण्यात आलेत. अशा अनेक अडचणी निर्माण झाल्या असून, नागरिक त्रस्त होत आहेत.प्रबुद्धनगरात सर्वात मोठी समस्या भूमिगत सांडपाणी गटारींची आहे. संत रोहिदास चौकात भूमिगत गटारी कायम तुंबत असून, मनपाकडे वारंवार तक्रारी करूनही लक्ष देत नसल्याचे शोभा कुरणे, कमलाबाई ढाले यांनी सांगितले. कधीतरी चेंबर साफ करायला कर्मचारी आले तर घाण तशीच ठेवतात. ती घाण आम्हाला उचलावी लागत असल्याचे रंजना राजवंशी यांनी सांगितले. घरोघरी शौचालय उभारण्याची योजना अर्धवट राबविल्याचे राधेकिसन ढोके, दत्तात्रय पवार यांनी सांगितले. दादासाहेब गायकवाड चौकातदेखील सांडपाणी दिवसभर रस्त्यावर वाहत असल्याचे हिराबाई लोखंडे, पद्मा गायकवाड यांनी सांगितले. महापालिकेकडे तक्रार करूनदेखील कोणीही कर्मचारी येत नसल्याचे रमेश जाधव, राजेंद्र पगारे यांनी सांगितले. दुर्गंधीयुक्त सांडपाणी वाहत असल्याने त्यातील किडे घरात येतात असे ताईबाई लोखंडे, मसाजी शिंदे यांचे म्हणणे आहे. आम्रपाली चौकातदेखील अशीच स्थिती आहे. शौचालयाचे भांडे तुटलेले आहे. दरवाजे मोडकळीस आलेले आहेत. साफसफाई होत नसल्याचे रुक्मिणी वाव्हळे यांनी सांगितले. पैसे देऊन शौचालयाची साफसफाई करावी लागत असल्याचे अनुसया रोकडे, रब्बानी शेख, तायरा शेख यांनी सांगितले. गौतम चौकात तुंबलेल्या गटारी आम्हालाच साफ करावी लागते, असे प्रियांका देवकर, शांताराम विटकर यांनी सांगितले. बुद्धविहार परिसर पथदीप नसल्याने अंधाराचे साम्राज्य पसरत असल्याचे राजू गोतीस  यांनी सांगितले.(उद्याच्या अंकात  ,एकलव्य वसाहत, भगूर)

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक