शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

शहराचे ‘आॅक्सिजन हब’ संकटात

By admin | Updated: April 10, 2016 23:58 IST

नेहरू वनोद्यान : विकासाकरिता वृक्षराजी धोक्यात; पावणे दोनशे झाडांवर कोसळणार कुऱ्हाड

नाशिक : शहराचे ‘आॅक्सिजन हब’ असलेले शासनाचे नेहरू वनोद्यान सध्या संकटात सापडले आहे. महापालिकेच्या सत्ताधारी पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांंनी या उद्यानाच्या ‘नवनिर्माण’चा ध्यास घेतला आहे. उद्यानातील नैसर्गिक बाज सुरक्षित ठेवून वनौषधी उद्यान साकारण्याचा त्यांचा मानस जरी असला तरी विकासाच्या नावाखाली येथील वृक्षसंपदेला धोका निर्माण झाला आहे. वनोद्यानामधून पांडवलेणी डोंगराच्या पायथ्याशी तयार केला जाणारा पदपथ हा विकासाचा नव्हे तर पर्यावरणाच्या ऱ्हासाला कारणीभूत असणारा मार्ग ठरू शकतो. कारण यासाठी १७५ झाडे तोडण्याचा प्रस्ताव पालिकेने मांडला आहे. त्यामुळे शहरातील पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त क रत या कामावर आक्षेप घेतला आहे.एकीकडे शासन पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभर कोट्यवधी रोपांच्या लागवडीची तयारी करत असताना दुसरीकडे शासनाच्याच वनोद्यानातील वृक्षराजी धोक्यात आल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वनोद्यानात महापालिका, वनविकास महामंडळ व टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने वनऔषधी उद्यानासह पर्यटकांच्या मनोरंजनासाठी विविध विकासकामे केली जाणार आहेत. सद्यस्थितीत मोठ्या संख्येने येथे भारतीय प्रजातीची वनौषधी असून डेरेदार वृक्षराजीमुळे शहराच्या एका दिशेने विकसित जंगलाचे अस्तित्व आहे. अंबड औद्योगिक वसाहत, पालिकेचे खतप्रकल्प केंद्र यामुळे जणू शहरात पसरणारी प्रदूषित हवा हे जंगल नैसर्गिकरीत्या शुद्ध करून पुढे पाठविण्याचे काम करत आहे. ताणतणावाच्या जीवनशैलीतून आल्हाददायक वातावरणाची अनुभूती घेण्यासाठी नाशिककरांना हे जवळचे हक्काचे ठिकाण आहे. ‘वीकेण्ड’ला नाशिककर ‘फ्रेश’ होण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात या ठिकाणी आवर्जून हजेरी लावतात. त्यामुळे पर्यटकांचा ओघ उद्यानाकडे कमी आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल. निसर्गाच्या सान्निध्यात वनभ्रमंतीची मजा आजही पर्यटक तितक्याच आनंदाने लुटत आहे; मात्र तरीदेखील या उद्यानामध्ये मातीच्या पायवाटांऐवजी जर पेव्हर ब्लॉक टाकून किंवा पदपथ, सायकल ट्रॅक तयार करून राज यांना ‘बॉटनिकल गार्डन’चे नवनिर्माण करायचे असल्याने या वनोद्यानात सध्या पर्यटकांना येणारा वनभ्रमंतीच्या अनुभवाला मुकावे लागण्याची शक्यता आहे.