शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

मनमाड शहराला चार महिने पुरेल एवढा पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2021 00:35 IST

मनमाड : शहराचा पाणीप्रश्न हा सर्वदूर परिचित आहे. मात्र, पावसाळ्यात झालेल्या वरुणराजाची कृपा आणि अवकाळी पावसामुळे पाणीटंचाईचा प्रश्न मिटला आहे. सध्या मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणात चार महिने पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध असून, पालखेड धरणाचे दोन आवर्तन बाकी असल्याने उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांची पायपीट होणार नाही.

ठळक मुद्देउन्हाळा होणार सुसह्य : पालखेड धरणाचे दोन आवर्तन शिल्लक

मनमाड : शहराचा पाणीप्रश्न हा सर्वदूर परिचित आहे. मात्र, पावसाळ्यात झालेल्या वरुणराजाची कृपा आणि अवकाळी पावसामुळे पाणीटंचाईचा प्रश्न मिटला आहे. सध्या मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणात चार महिने पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध असून, पालखेड धरणाचे दोन आवर्तन बाकी असल्याने उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांची पायपीट होणार नाही.गेल्या काही वर्षांपासून पाणीटंचाईमुळे मनमाड पुरते हैराण झाले होते. चांगला पाऊस न झाल्यामुळे धरण भरले जात नव्हते. त्यामुळे पंधरा, पंचवीस तर एकावर्षी पंचावन्न दिवसाआड पाणीपुरवठा झाला होता. यंदाही तशीच परिस्थिती होती. पाऊस पाहिजे तसा झाला नाही. मात्र, शहराला आवर्तन देणाऱ्या धरणसमूहात चांगला पाऊस झाल्याने आणि शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघदर्डी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अवकाळी पाऊस चांगला झाल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होऊन धरण ओव्हर फ्लो झाले होते. तर बाकी असलेले पालखेड धरणाचे आवर्तनही उचलण्यात आल्याने पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे आजच्या घडीला धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे.शहराला एकवेळा पाणीपुरवठा करण्यासाठी चार दशलक्ष घनफूट पाणी लागते. यावर्षी मनमाडकरांना पाण्यासाठी वणवण भटकत पायपीट करावी लागली नाही की पाणी विकत घेण्याची वेळ आली नाही. पाणीपुरवठ्याचे दिवसदेखील कमी करण्यात आले आहेत. मागील काही वर्षांच्या पाणीटंचाईवेळी होणारी पाणीटंचाई यंदा जाणवली नाही.इन्फोवागदर्डीत ७० दलघक्ष पाणीसाठाशहरात रेल्वे इंजिन कारखाना, खाद्य निगमचे गोडाऊन, जंक्शन स्थानक आणि शीख बांधवांच्या तिसऱ्या क्रमांकाच्या गुरुद्वारामुळे देशभरात मनमाड शहर प्रसिद्ध असून, दुष्काळग्रस्त तालुका आणि पाणीटंचाईचे गाव म्हणून मनमाड शहराची ओळखदेखील आहे. मात्र, यंदा झालेल्या पावसामुळे धरणात मुबलक पाणी असल्याने मनमाडकर समाधानी आहेत. सध्या पाटोदा येथील साठवण तलावात १०.५ फूट अर्थात १० दशलक्ष घनफूट पाणी, तर वागदर्डी धरणात ६५.५ फूट अर्थात ७० दशलक्ष पाणीसाठा उपलब्ध आहे.सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा आणि चार महिने अर्थात मार्चपर्यंत पुरेल तर त्यानंतर जानेवारी आणि एप्रिल या महिन्यात शहरासाठी राखीव असलेले पिण्याच्या पाण्याचे आवर्तन मिळणार आहे. यामुळे उपलब्ध पाणीसाठा आणि मिळणारे आवर्तन यामुळे उन्हाळा पार होऊ शकतो. त्यामुळे पाणीटंचाईचे सावट सध्या तरी नाही.- डॉ. विजयकुमार मुंढे, मुख्याधिकारी.(२७ मनमाड वॉटर १, विजय मुंढे)शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणात असलेला पाणीसाठा.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणी