शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

मनमाड शहराला चार महिने पुरेल एवढा पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2021 00:35 IST

मनमाड : शहराचा पाणीप्रश्न हा सर्वदूर परिचित आहे. मात्र, पावसाळ्यात झालेल्या वरुणराजाची कृपा आणि अवकाळी पावसामुळे पाणीटंचाईचा प्रश्न मिटला आहे. सध्या मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणात चार महिने पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध असून, पालखेड धरणाचे दोन आवर्तन बाकी असल्याने उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांची पायपीट होणार नाही.

ठळक मुद्देउन्हाळा होणार सुसह्य : पालखेड धरणाचे दोन आवर्तन शिल्लक

मनमाड : शहराचा पाणीप्रश्न हा सर्वदूर परिचित आहे. मात्र, पावसाळ्यात झालेल्या वरुणराजाची कृपा आणि अवकाळी पावसामुळे पाणीटंचाईचा प्रश्न मिटला आहे. सध्या मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणात चार महिने पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध असून, पालखेड धरणाचे दोन आवर्तन बाकी असल्याने उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांची पायपीट होणार नाही.गेल्या काही वर्षांपासून पाणीटंचाईमुळे मनमाड पुरते हैराण झाले होते. चांगला पाऊस न झाल्यामुळे धरण भरले जात नव्हते. त्यामुळे पंधरा, पंचवीस तर एकावर्षी पंचावन्न दिवसाआड पाणीपुरवठा झाला होता. यंदाही तशीच परिस्थिती होती. पाऊस पाहिजे तसा झाला नाही. मात्र, शहराला आवर्तन देणाऱ्या धरणसमूहात चांगला पाऊस झाल्याने आणि शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघदर्डी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अवकाळी पाऊस चांगला झाल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होऊन धरण ओव्हर फ्लो झाले होते. तर बाकी असलेले पालखेड धरणाचे आवर्तनही उचलण्यात आल्याने पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे आजच्या घडीला धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे.शहराला एकवेळा पाणीपुरवठा करण्यासाठी चार दशलक्ष घनफूट पाणी लागते. यावर्षी मनमाडकरांना पाण्यासाठी वणवण भटकत पायपीट करावी लागली नाही की पाणी विकत घेण्याची वेळ आली नाही. पाणीपुरवठ्याचे दिवसदेखील कमी करण्यात आले आहेत. मागील काही वर्षांच्या पाणीटंचाईवेळी होणारी पाणीटंचाई यंदा जाणवली नाही.इन्फोवागदर्डीत ७० दलघक्ष पाणीसाठाशहरात रेल्वे इंजिन कारखाना, खाद्य निगमचे गोडाऊन, जंक्शन स्थानक आणि शीख बांधवांच्या तिसऱ्या क्रमांकाच्या गुरुद्वारामुळे देशभरात मनमाड शहर प्रसिद्ध असून, दुष्काळग्रस्त तालुका आणि पाणीटंचाईचे गाव म्हणून मनमाड शहराची ओळखदेखील आहे. मात्र, यंदा झालेल्या पावसामुळे धरणात मुबलक पाणी असल्याने मनमाडकर समाधानी आहेत. सध्या पाटोदा येथील साठवण तलावात १०.५ फूट अर्थात १० दशलक्ष घनफूट पाणी, तर वागदर्डी धरणात ६५.५ फूट अर्थात ७० दशलक्ष पाणीसाठा उपलब्ध आहे.सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा आणि चार महिने अर्थात मार्चपर्यंत पुरेल तर त्यानंतर जानेवारी आणि एप्रिल या महिन्यात शहरासाठी राखीव असलेले पिण्याच्या पाण्याचे आवर्तन मिळणार आहे. यामुळे उपलब्ध पाणीसाठा आणि मिळणारे आवर्तन यामुळे उन्हाळा पार होऊ शकतो. त्यामुळे पाणीटंचाईचे सावट सध्या तरी नाही.- डॉ. विजयकुमार मुंढे, मुख्याधिकारी.(२७ मनमाड वॉटर १, विजय मुंढे)शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणात असलेला पाणीसाठा.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणी