शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

मनमाड शहराला चार महिने पुरेल एवढा पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2021 00:35 IST

मनमाड : शहराचा पाणीप्रश्न हा सर्वदूर परिचित आहे. मात्र, पावसाळ्यात झालेल्या वरुणराजाची कृपा आणि अवकाळी पावसामुळे पाणीटंचाईचा प्रश्न मिटला आहे. सध्या मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणात चार महिने पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध असून, पालखेड धरणाचे दोन आवर्तन बाकी असल्याने उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांची पायपीट होणार नाही.

ठळक मुद्देउन्हाळा होणार सुसह्य : पालखेड धरणाचे दोन आवर्तन शिल्लक

मनमाड : शहराचा पाणीप्रश्न हा सर्वदूर परिचित आहे. मात्र, पावसाळ्यात झालेल्या वरुणराजाची कृपा आणि अवकाळी पावसामुळे पाणीटंचाईचा प्रश्न मिटला आहे. सध्या मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणात चार महिने पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध असून, पालखेड धरणाचे दोन आवर्तन बाकी असल्याने उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांची पायपीट होणार नाही.गेल्या काही वर्षांपासून पाणीटंचाईमुळे मनमाड पुरते हैराण झाले होते. चांगला पाऊस न झाल्यामुळे धरण भरले जात नव्हते. त्यामुळे पंधरा, पंचवीस तर एकावर्षी पंचावन्न दिवसाआड पाणीपुरवठा झाला होता. यंदाही तशीच परिस्थिती होती. पाऊस पाहिजे तसा झाला नाही. मात्र, शहराला आवर्तन देणाऱ्या धरणसमूहात चांगला पाऊस झाल्याने आणि शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघदर्डी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अवकाळी पाऊस चांगला झाल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होऊन धरण ओव्हर फ्लो झाले होते. तर बाकी असलेले पालखेड धरणाचे आवर्तनही उचलण्यात आल्याने पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे आजच्या घडीला धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे.शहराला एकवेळा पाणीपुरवठा करण्यासाठी चार दशलक्ष घनफूट पाणी लागते. यावर्षी मनमाडकरांना पाण्यासाठी वणवण भटकत पायपीट करावी लागली नाही की पाणी विकत घेण्याची वेळ आली नाही. पाणीपुरवठ्याचे दिवसदेखील कमी करण्यात आले आहेत. मागील काही वर्षांच्या पाणीटंचाईवेळी होणारी पाणीटंचाई यंदा जाणवली नाही.इन्फोवागदर्डीत ७० दलघक्ष पाणीसाठाशहरात रेल्वे इंजिन कारखाना, खाद्य निगमचे गोडाऊन, जंक्शन स्थानक आणि शीख बांधवांच्या तिसऱ्या क्रमांकाच्या गुरुद्वारामुळे देशभरात मनमाड शहर प्रसिद्ध असून, दुष्काळग्रस्त तालुका आणि पाणीटंचाईचे गाव म्हणून मनमाड शहराची ओळखदेखील आहे. मात्र, यंदा झालेल्या पावसामुळे धरणात मुबलक पाणी असल्याने मनमाडकर समाधानी आहेत. सध्या पाटोदा येथील साठवण तलावात १०.५ फूट अर्थात १० दशलक्ष घनफूट पाणी, तर वागदर्डी धरणात ६५.५ फूट अर्थात ७० दशलक्ष पाणीसाठा उपलब्ध आहे.सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा आणि चार महिने अर्थात मार्चपर्यंत पुरेल तर त्यानंतर जानेवारी आणि एप्रिल या महिन्यात शहरासाठी राखीव असलेले पिण्याच्या पाण्याचे आवर्तन मिळणार आहे. यामुळे उपलब्ध पाणीसाठा आणि मिळणारे आवर्तन यामुळे उन्हाळा पार होऊ शकतो. त्यामुळे पाणीटंचाईचे सावट सध्या तरी नाही.- डॉ. विजयकुमार मुंढे, मुख्याधिकारी.(२७ मनमाड वॉटर १, विजय मुंढे)शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणात असलेला पाणीसाठा.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणी