शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

शहर बससेवेला ‘ब्रेक’ ठरलेलाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:12 IST

शहर बससेवेची ‘डबल बेल’ वाजविण्यास आता राज्याचे परिवहन महामंडळ इच्छुक राहिलेले नाही; कारण सर्वच बाजूंनी या बससेवेचे महामंडळाला ‘ओझे’ वाटू लागले आहे. तोट्याचे ओझे वाहायचे कशाला, या भूमिकेतून महामंडळाने नाशिककरांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या बससेवेला हळूहळू ‘ब्रेक’ लावण्यास सुरुवात केलीच आहे

नाशिक : शहर बससेवेची ‘डबल बेल’ वाजविण्यास आता राज्याचे परिवहन महामंडळ इच्छुक राहिलेले नाही; कारण सर्वच बाजूंनी या बससेवेचे महामंडळाला ‘ओझे’ वाटू लागले आहे. तोट्याचे ओझे वाहायचे कशाला, या भूमिकेतून महामंडळाने नाशिककरांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या बससेवेला हळूहळू ‘ब्रेक’ लावण्यास सुरुवात केलीच आहे. नवनियुक्त विभाग नियंत्रकही त्याच धोरणात्मक निर्णयावर ठाम असून, बसफेºयांमध्ये टप्प्याटप्प्याने कपात यापुढेही सुरूच राहणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.इंधन खर्च, दुरुस्ती खर्च, कामगारांना कि.मी.प्रमाणे दिले जाणारे वेतन अशा सर्वच बाजूंनी विचार करता शहराची बससेवा तोट्यात आहे. यामुळे महामंडळाच्या वरिष्ठ पातळीवरून बससेवा बंद करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी टप्प्याटप्प्याने बसफेºयांची कपात करावीच लागणार असल्याचे विभाग नियंत्रक नितीन मैंद यांनी स्पष्ट केले. पाच दिवसांपूर्वीच मैंद यांनी नाशिक परिवहन विभागाच्या विभाग नियंत्रकपदाची सूत्रे हाती घेतली असून, त्यांनी येथील कामकाजाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर मैंद यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपली भूमिका मांडली.  शहर बससेवा महापालिकेकडे हस्तांतरित केली जाणार असून, त्याबाबत महापालिका प्रशासनाकडे यापूर्वी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. महापालिकेने लवकरात लवकर बससेवा चालविण्याबाबतचा निर्णय घ्यावा यासाठी पुन्हा पत्र देणार आहे. बसफेºया कमी करणे महामंडळाला भाग आहे, कारण महामंडळाला बससेवा बंद करावयाची आहे. आर्थिकदृष्ट्या शहर बससेवेची चाके तोट्यात फिरत असल्यामुळे महामंडळाने हा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.  एकूणच महामंडळ आणि महापालिका या दोन संस्थांच्या प्रशासकीय कारभार आणि धोरणात्मक निर्णयांमुळे सर्वसामान्य नाशिककरांचा जीव टांगणीला लागला आहे. नाशिक कर ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थ्यांचे अपुºया बससेवेमुळे हाल होत आहेत. आगामी काळात शाळा-महाविद्यालयांना उन्हाळी सुट्या लागताच पुन्हा बसफेºया अधिक कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  शहराच्या लोकप्रतिनिधींनी याबाबत भूमिका घेऊन बससेवेविषयी ठोस तोडगा काढण्याची मागणीहोत आहे....म्हणे प्रवाशांच्या सेवेसाठीराज्य परिवहन महामंडळाकडून नाशिककरांवर सध्या अन्याय होत आहे. महामंडळाने तोट्याचे कारण पुढे करून शहर बससेवा थांबविण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्याचे अधिकारी सांगतात. महापालिके कडे बससेवा हस्तांतरित करण्यात येणार असून, बससेवा यापुढे पालिका प्रशासनाने चालवावी, असा महामंडळाचा अट्टाहास आहे. मात्र, अद्याप पालिका प्रशासनाने तशी तयारी दर्शविली नसून हालचालीदेखील केलेल्या नसताना केवळ अट्टाहासापोटी महामंडळाकडून शहर बससेवेच्या फेºया कमी केल्या जात आहेत. याचा फटका नागरिकांना बसत आहे.शहर बससेवेच्या फेºयांमध्ये कपात सुरू असून, २५० बसफेºयांवरून त्या केवळ १२० वर आल्या आहेत. यामुळे विद्यार्थिवर्ग, ज्येष्ठ नागरिक, महिलांचे हाल होत आहेत. बहुतांश भागातून बसेसची प्रतीक्षा करत ताटकळत उभे राहावे लागते. शहराच्या विविध भागांमधील मार्गांवर बसेसची संख्या अत्यल्प झाल्यामुळे बससेवा म्हणजे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. महामंडळाकाडून बसफेºयांमध्ये केली जाणारी कपात अलीकडे अधिक वाढण्याची चिन्हे आहेत, कारण शाळा-महाविद्यालयांना उन्हाळी सुट्या लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर बसफेºयांमध्ये अधिक कपात करण्याची संधी महामंडळाच्या नाशिक विभागाला मिळणार आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी