शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

बनावट ई-मेलद्वारे चिनी सायबर हल्ल्याचा धोका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 23:20 IST

नाशिक : भारतात चिनी सायबर हल्ले केले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमकडूनदेखील सतर्कतेचा इशारा नुकताच देण्यात आला आहे. यानंतर देशभरातील बॅँकिंग क्षेत्र ‘फिशिंग’ या प्रकारच्या सायबर हल्ल्यापासून सावध होत आपल्या ग्राहकांनाही सावध राहण्याचे आवाहन करत आहेत.

ठळक मुद्दे‘फ्री कोविड टेस्ट’चे आमिष : ‘सीईआरटी’कडून इशारा; बॅँकांकडून खबरदारी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : भारतात चिनी सायबर हल्ले केले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमकडूनदेखील सतर्कतेचा इशारा नुकताच देण्यात आला आहे. यानंतर देशभरातील बॅँकिंग क्षेत्र ‘फिशिंग’ या प्रकारच्या सायबर हल्ल्यापासून सावध होत आपल्या ग्राहकांनाही सावध राहण्याचे आवाहन करत आहेत.कोरोना विषाणूच्या संक्रमणाने देश हादरला असून, जनसामान्यांच्या मनात कोरोनाविषयीची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, पूर्व लडाखच्या भारत-चीनच्या गलवान खोऱ्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरसुद्धा तणावाचे वातावरण चीनच्या कुरघोडीमुळे निर्माण झाले. त्यामुळे चीनने आता भारतातील नागरिकांच्या मनात असलेल्या कोरोना आजाराच्या भीतीचा गैरफायदा घेत ‘फ्री कोविड टेस्ट’च्या नावाखाली सरकारच्या नावाखाली बनावट ई-मेल पाठवून ‘फिशिंग’प्रकारचा सायबर हल्ल्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमकडून वर्तविली गेली. यानंतर भारतातील बॅँकिंग क्षेत्राकडूनही ग्राहकांना सावध करणारा इशारा ट्विटरसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. चिनी हॅकर्सकडून बनावट ई-मेल पाठवून त्या ई-मेलमध्ये ‘फ्री कोविड टेस्ट’चे आमीष दाखवून एका लिंकद्वारे आर्थिक फसवणुकीचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी माहितीवर डल्ला मारण्याचाही प्रयत्न चिनी हॅकर्सकडून चालविला जात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.चिनी सायबर हल्ला म्हणजे नेमके काय?चीनकडून संभाव्य सायबर हल्ला शासकीय नावाने बनावट ई-मेल पाठवून सायबर गुन्हेगारांकडून केला जाण्याची शक्यता आहे. या ई-मेलमध्ये वेगवेगळे प्रलोभनेदेखील दाखविले जाऊ शकतात किंवा कोविडबाबतचा औषधोपचार किंवा एखाद्या ई-मेलमध्ये वैयक्तिक कागदपत्रे किंवा बॅँक खात्याची मागणीही केलेली असू शकते. बनावट ई-मेलचा वापर करून हॅकर्स क्रिमिनलद्वारे ‘फिशिंग अ‍ॅटेक’ केला जातो. यामुळे नागरिकांनी अशा बनावट ई-मेलपासून सावध रहावे. सरकारच्या नावाने आलेल्या ई-मेलला प्रतिसाद देऊ नये, असे म्हटले आहे.चिनी सायबर हल्ल्याचा धोका सर्वाधिक बनावट ई-मेलद्वारे भारतीयांना पोहोचविला जाऊ शकतो. बनावट ई-मेलमध्ये कुठलीही प्रलोभने किंवा कोरोनासंदर्भातील औषधोपचाराची माहिती, डब्ल्यूएचओच्या नावाने काही कागदपत्रांची फोटो, बनावट व्हिडिओ आदी प्रकारे आकर्षित केले जाऊ शकते. फसव्या ई-मेलमधील लिंकवर क्लिक करू नये, तर तत्काळ डिलिट करावे. नागरिकांनी सायबर सुरक्षाविषयी जागरूक राहून चीनचा हा प्रयत्न हाणून पाडावा.- तन्मय दीक्षित, सायबर तज्ज्ञ

टॅग्स :MobileमोबाइलInternetइंटरनेट