शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांना लावली वाचनाची गोडी...‘

By admin | Updated: October 14, 2015 23:34 IST

चिमुकल्यांना लावली वाचनाची गोडी...‘

हल्लीची मुलं वाचतच नाही...’ अशी तक्रार घराघरातून ऐकू येते; पण खरोखर मुलांनी वाचावे, यासाठी मात्र कोणी पुढाकार घेत नाही. वाचनाचे अफाट वेड असलेल्या स्वाती गोरवाडकर यांचे मात्र तसे नाही. मुलांना वाचनाची गोडी लागावी, यासाठी गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून त्या जिद्दीने काम करीत आहेत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या योजनेत सहभागी झाल्यानंतर असा उपक्रम लहान मुलांसाठीही राबवण्याची कल्पना गोरवाडकर यांच्या डोक्यात आली. हा विचार त्यांनी ‘ग्रंथ तुमच्या दारी’चे प्रणेते विनायक रानडे यांच्याकडे बोलून दाखवला आणि त्यातूनच नवी योजना जन्माला आली, तिचं नाव ‘माझं ग्रंथालय - बालविभाग’! नाशिकमध्ये खास लहान मुलांसाठी वर्षभर चालणारा एकही उपक्रम नाही, घरात टीव्ही, इंटरनेटमुळे मुले वाचत नाहीत, हे लक्षात घेऊन गोरवाडकर यांनी ११० ग्रंथपेट्या तयार केल्या. प्रत्येक पेटीत लहान मुलांना भावतील अशी अकबर-बिरबल, पंचतंत्र, जातककथा यांसारखी १५ मराठी आणि १० इंग्रजी अशी मिळून २५ पुस्तके ठेवली. योजनेच्या सभासदांनी दर दीड महिन्याने एकत्र यायचे आणि पेटी बदलून घ्यायची. या दीड महिन्यात मुलांनी त्या पेटीतील जमतील तेवढी पुस्तके वाचायची, असे या उपक्रमाचे स्वरूप. वाचनालयातून एका वेळी एकच पुस्तक मिळते; पण अशी एकदम २५ पुस्तके हाती आल्यानंतर मुलांना हवी ती पुस्तके वाचण्याचा पर्याय मिळतो आणि त्यातून त्यांची वाचनाची आवडही वाढते, असे गोरवाडकर सांगतात. मूळ धुळ्याच्या असलेल्या स्वाती यांना लहानपणापासून वाचनाची प्रचंड आवड. त्यांना आई-वडिलांकडून हा वारसा मिळाला. वाचनातून मिळणाऱ्या आनंदाला हल्लीची मुले पारखी झाली आहेत, हे लक्षात घेऊन त्यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. सध्या या उपक्रमाचे ११० सभासद आहेत. दर दीड महिन्याने पुस्तके बदलण्यासाठी एकत्र जमणाऱ्या मुलांना निरनिराळ्या कलांचा परिचय करून द्यावा, असा विचार त्यांच्या डोक्यात आला. मग त्यातूनच शाडू मातीच्या गणेशमूर्ती, पर्यावरणपूरक आकाशकंदील बनवणे, विनातेल व विनागॅस स्वयंपाक करणे अशा निरनिराळ्या विषयांच्या कार्यशाळा घेण्यास सुरुवात झाली. आता नववी ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीही ग्रंथयोजना सुरू करण्याचा गोरवाडकर यांना मनोदय आहे.त्या सांगतात, पुस्तकांच्या वाचनातून मिळणाऱ्या आनंदाची दुसऱ्या कशाशी तुलनाच केली जाऊ शकत नाही. टीव्ही, इंटरनेटमुळे मुलांच्या सर्जनशीलतेला वाव मिळेनासा झाला आहे. बरीच मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात असल्याने त्यांना मराठीतले बरेचसे शब्द माहीतच नसतात. त्यामुळे काही मुले ‘अडीच’च्या ऐवजी चक्क ‘साडेदोन’ म्हणतात. अशा मुलांची भाषा सुधारण्यासाठी, त्यांच्यातली सर्जनशीलता, कल्पकता वाढवण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. ही फक्त पुस्तक देवाणघेवाण नाही, तर देशाचे उद्याचे नागरिक घडवण्याचा छोटासा प्रयत्न आहे... गोरवाडकर यांची ही धडपड म्हणूनच कौतुकास्पद ठरते !