शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

चिमुकल्यांना लावली वाचनाची गोडी...‘

By admin | Updated: October 14, 2015 23:34 IST

चिमुकल्यांना लावली वाचनाची गोडी...‘

हल्लीची मुलं वाचतच नाही...’ अशी तक्रार घराघरातून ऐकू येते; पण खरोखर मुलांनी वाचावे, यासाठी मात्र कोणी पुढाकार घेत नाही. वाचनाचे अफाट वेड असलेल्या स्वाती गोरवाडकर यांचे मात्र तसे नाही. मुलांना वाचनाची गोडी लागावी, यासाठी गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून त्या जिद्दीने काम करीत आहेत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या योजनेत सहभागी झाल्यानंतर असा उपक्रम लहान मुलांसाठीही राबवण्याची कल्पना गोरवाडकर यांच्या डोक्यात आली. हा विचार त्यांनी ‘ग्रंथ तुमच्या दारी’चे प्रणेते विनायक रानडे यांच्याकडे बोलून दाखवला आणि त्यातूनच नवी योजना जन्माला आली, तिचं नाव ‘माझं ग्रंथालय - बालविभाग’! नाशिकमध्ये खास लहान मुलांसाठी वर्षभर चालणारा एकही उपक्रम नाही, घरात टीव्ही, इंटरनेटमुळे मुले वाचत नाहीत, हे लक्षात घेऊन गोरवाडकर यांनी ११० ग्रंथपेट्या तयार केल्या. प्रत्येक पेटीत लहान मुलांना भावतील अशी अकबर-बिरबल, पंचतंत्र, जातककथा यांसारखी १५ मराठी आणि १० इंग्रजी अशी मिळून २५ पुस्तके ठेवली. योजनेच्या सभासदांनी दर दीड महिन्याने एकत्र यायचे आणि पेटी बदलून घ्यायची. या दीड महिन्यात मुलांनी त्या पेटीतील जमतील तेवढी पुस्तके वाचायची, असे या उपक्रमाचे स्वरूप. वाचनालयातून एका वेळी एकच पुस्तक मिळते; पण अशी एकदम २५ पुस्तके हाती आल्यानंतर मुलांना हवी ती पुस्तके वाचण्याचा पर्याय मिळतो आणि त्यातून त्यांची वाचनाची आवडही वाढते, असे गोरवाडकर सांगतात. मूळ धुळ्याच्या असलेल्या स्वाती यांना लहानपणापासून वाचनाची प्रचंड आवड. त्यांना आई-वडिलांकडून हा वारसा मिळाला. वाचनातून मिळणाऱ्या आनंदाला हल्लीची मुले पारखी झाली आहेत, हे लक्षात घेऊन त्यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. सध्या या उपक्रमाचे ११० सभासद आहेत. दर दीड महिन्याने पुस्तके बदलण्यासाठी एकत्र जमणाऱ्या मुलांना निरनिराळ्या कलांचा परिचय करून द्यावा, असा विचार त्यांच्या डोक्यात आला. मग त्यातूनच शाडू मातीच्या गणेशमूर्ती, पर्यावरणपूरक आकाशकंदील बनवणे, विनातेल व विनागॅस स्वयंपाक करणे अशा निरनिराळ्या विषयांच्या कार्यशाळा घेण्यास सुरुवात झाली. आता नववी ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीही ग्रंथयोजना सुरू करण्याचा गोरवाडकर यांना मनोदय आहे.त्या सांगतात, पुस्तकांच्या वाचनातून मिळणाऱ्या आनंदाची दुसऱ्या कशाशी तुलनाच केली जाऊ शकत नाही. टीव्ही, इंटरनेटमुळे मुलांच्या सर्जनशीलतेला वाव मिळेनासा झाला आहे. बरीच मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात असल्याने त्यांना मराठीतले बरेचसे शब्द माहीतच नसतात. त्यामुळे काही मुले ‘अडीच’च्या ऐवजी चक्क ‘साडेदोन’ म्हणतात. अशा मुलांची भाषा सुधारण्यासाठी, त्यांच्यातली सर्जनशीलता, कल्पकता वाढवण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. ही फक्त पुस्तक देवाणघेवाण नाही, तर देशाचे उद्याचे नागरिक घडवण्याचा छोटासा प्रयत्न आहे... गोरवाडकर यांची ही धडपड म्हणूनच कौतुकास्पद ठरते !