शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

विखे, क्षीरसागर यांना मंत्रीपदे देणे मुख्यमंत्र्यांचा राजकीय भ्रष्टाचार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 17:16 IST

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रीपदे देवून राजकीय भ्रष्टचार केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ते नाशिकमध्ये रविवारी (दि.२३) पत्रकार परिषदेत बोलत होते. 

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय भ्रष्टाचारमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप विखे, क्षीरसागर यांची मंत्रीपदे घटना बाह्य असल्याचा दावा

नाशिक : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रीपदे देवून राजकीय भ्रष्टचार केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ते नाशिकमध्ये रविवारी (दि.२३) पत्रकार परिषदेत बोलत होते. काग्रेससोडून भाजपाते गेलेले राधाकृष्ण विखे पाटील व जयदत्त क्षीरसागर यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेली मंत्रिपदे ही घटनाविरोधी आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने पक्षांतर संदर्भात २००३ मध्ये केलेल्या घटना दुरुस्तीचे उल्लंघन झाले असून या संदर्भात  उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्यात कोणतीही अपवादात्मक परिस्थिती नसताना  काँग्रेसतून भाजापात आलेले  विखे  व राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले क्षीरसागर यांना मंत्रिपदे देण्यात आली. त्यांना अशाप्रकारे पक्षांतर करून मंत्रीपदे देणे हा लाच देण्याचा प्रकार असून हा राजकीय भ्रष्टाचार खुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केल्याचा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.  याप्रकरणी सोमवारी (दि.२४) उच्च न्यायालायत सुनावणी होणार असून त्यानंतर हे प्रकरण अधिक स्पष्ट होईल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्ते केले.दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्शभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडीविषयी चर्चा सुरु असून वंचित बहूजन आघाडीला सोबत घेण्याविषयी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरु असल्याचे चव्हाण म्हणाले. यावेळी माजी मंत्री डॉ.शोभा बच्छाव, आमदार सुधीर तांबे, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, माजी जिल्हा राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद अहेर, नगरसेवक हेमलता पाटील. डॉ. प्रतापराव वाघ आदि उपस्थित होते. 

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील