शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

छत्रपती शिवाजी महाराजांची ‘जाणता राजा’ उपमा अजरामर :  सचिन कानिटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 01:08 IST

शिवस्मृती समर्थ रामदास महाराजांनी लिहिले आहे. छत्रपती शिवराय म्हणजे रामदासांनी गौरविलेले तिसरे रूप असून, राजे देवांचे देव आहे.

पंचवटी : शिवस्मृती समर्थ रामदास महाराजांनी लिहिले आहे. छत्रपती शिवराय म्हणजे रामदासांनी गौरविलेले तिसरे रूप असून, राजे देवांचे देव आहे. शिवस्मृतीत रामदासस्वामींनी दिलेल्या उपमा अमर राहिल्या आहेत. त्यातील ‘जाणता राजा’ ही उपमा अजरामर ठरली. समर्थांनी शिवरायांना समर्थ कल्याण म्हटले आहे, असे प्रतिपादन प्रा. सचिन कानिटकर यांनी केले.श्री काळाराम संस्थानच्या वतीने आयोजित रामजन्मोत्सवानिमित्त वासंतिक नवरात्र महोत्सवात कानेटकर यांनी सोमवारी (दि.८) ‘शिवरायांचे आठवावे रूप’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफले. यावेळी कानिटकर पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची अप्रतिम स्तुती जशी समर्थ रामदासांनी केली तशी स्तुती कविराज भूषण यांनी केली आहे. कविराज भूषण यांनी एक कविता लिहिली त्यात राजांचा उल्लेख केला आणि प्रत्येक राजाला फुलांची उपमा दिली. असेही त्यांनी सांगितले़यावेळी विश्वस्त मंदार जानोरकर, नगरसेवक शाहू खैरे, गणेश भोरे आदींसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्र माच्या प्रारंभी मीना परु ळेकर निकम यांनी निश्चयाचा महामेरू शिवस्मृती सादर केली. दैनंदिन कार्यक्र मात रात्री विवेक केळकर, संजय गावकर यांचा गीतरामायण सांस्कृतिक कार्यक्र म संपन्न झाला. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवस्मृती म्हणजे आठवण होय त्यातून कोणत्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो देशप्रेम क्षितिजापलीकडचे प्रेम आहे आणि हेच प्रेम निर्माण करण्याचे सामर्थ्य शिवाजीराजामध्ये होते. शिवरायांनी धनुष्यधारण केले होते. प्रभूरामाने सातासमुद्रापलीकडे जाऊन लंकेवर आक्र मण केले हा प्रताप आहे. जननी आणि मातृभूमी ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे हिंदू संस्कृती कधीही दुसऱ्यावर आक्र मण करत नाही. रामाने चांगले राज्य तयार केले हे वैशिष्ट्ये आहे. असे ही कानिटकर यांनी सांगितले़

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजkalaram templeकाळाराम मंदीर