शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

साहित्य संमेलनांमध्ये परिवर्तन आवश्यक

By admin | Updated: December 21, 2015 00:22 IST

वाहरू सोनवणे : लोकलढा सांस्कृतिक चळवळ संमेलनप्रसंगी प्रतिपादन

नाशिक : देशातील जाती-धर्मामध्ये स्वतंत्र अस्तित्वाची लढाई सुरू आहे़ समाजमनावर ठसा उमटविण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या या साहित्य संमेलनांमध्ये समाजाचा इतिहास, परंपरा व संस्कृती समाजासमोर ठेवली जाते़त्यामुळे या साहित्य संमेलनांना परंपरावादी स्वरूप प्राप्त होत असून, ते बदलून परिवर्तनवादी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक वाहरू सोनवणे यांनी केले़लोकलढा सांस्कृतिक चळवळीतर्फे पंचवटीतील पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर सभागृहात आयोजित करण्यात आलेले पहिले दलित, आदिवासी, भटके, ओबीसी संयुक्त साहित्य संमेलन रविवारी (दि़२०) पार पडले. यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना संमेलनाध्यक्ष सोनवणे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, पूर्वी केवळ हिंदी साहित्य संमेलने होत असत मात्र कालपरत्वे विविध समाज, जाती व भाषिकांचीही संमेलने सुरू झाली. माणसाला माणसासारखी वागणूक मिळावी असा सूर या साहित्य संमेलनामधून व्यक्त होतो़ दलित, आदिवासी वा भटके आहोत यापेक्षा आपण सर्व मानव आहोत ही भावना प्रत्येकामध्ये रुजावी असा या संमेलनापाठीमागचा उद्देश असतो़ संघर्ष व सहकार्य ही मानवी जीवनपद्धती आजही आदिवासींमध्ये असल्याने ते आम्हीच मूळ असल्याचे सांगतात़ मात्र काळानुसार त्यांची जीवन व कार्यपद्धती यामध्येही बदल झाले आहेत़ आदिवासी स्त्रियांचा विचार केला तर त्यांच्यावर आजही अनेक बंधने पुरुषप्रधान संस्कृतीने घातलेली आहेत़ विलासी व भोगवादी वृत्ती, संपत्तीचा हव्यास यामुळे प्रेमावर आधारित आदिवासी व्यवस्थेचा ऱ्हास झाला़स्त्रियांना गुलाम म्हणून नव्हे तर माणूस म्हणून वागणूक देण्यातच आदिवासींचा विकास व हित आहे़ यासाठी दलित साहित्य अत्यंत उपयोगी असते तरी त्यात परिवर्तन गरजेचे, असे सोनवणे यांनी सांगितले़ यावेळी व्यासपीठावर बार्टीचे महासंचालक डॉ. डी. आर. परिहार, मंत्रालयातील अपर सचिव चंदनशिवे, नगरसेवक दामोदर मानकर, विक्र ीकर सह.आयुक्त कैलास चतूर, प्रा. अनिल सिरसाठ उपस्थित होते़ दुसऱ्या सत्रात आजचा सांस्कृतिक दहशतवाद आणि दलित, आदिवासी, भटके, कष्टकऱ्यांच्या एकजुटीसमोरील आव्हाने या विषयावर परिसंवाद झाला. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत कुमार शिराळकर होते. प्रा. राजेंद्र ढवळे, प्रा. डी. ए. दळवी यांनी परिसंवादात सहभाग घेतला. यानंतर तिसऱ्या सत्रात पार पडलेल्या कविसंमेलनात जिल्हातील निमंत्रित व नवोदित कवींनी सहभाग घेतला होता़ (प्रतिनिधी)