शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनांमध्ये परिवर्तन आवश्यक

By admin | Updated: December 21, 2015 00:22 IST

वाहरू सोनवणे : लोकलढा सांस्कृतिक चळवळ संमेलनप्रसंगी प्रतिपादन

नाशिक : देशातील जाती-धर्मामध्ये स्वतंत्र अस्तित्वाची लढाई सुरू आहे़ समाजमनावर ठसा उमटविण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या या साहित्य संमेलनांमध्ये समाजाचा इतिहास, परंपरा व संस्कृती समाजासमोर ठेवली जाते़त्यामुळे या साहित्य संमेलनांना परंपरावादी स्वरूप प्राप्त होत असून, ते बदलून परिवर्तनवादी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक वाहरू सोनवणे यांनी केले़लोकलढा सांस्कृतिक चळवळीतर्फे पंचवटीतील पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर सभागृहात आयोजित करण्यात आलेले पहिले दलित, आदिवासी, भटके, ओबीसी संयुक्त साहित्य संमेलन रविवारी (दि़२०) पार पडले. यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना संमेलनाध्यक्ष सोनवणे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, पूर्वी केवळ हिंदी साहित्य संमेलने होत असत मात्र कालपरत्वे विविध समाज, जाती व भाषिकांचीही संमेलने सुरू झाली. माणसाला माणसासारखी वागणूक मिळावी असा सूर या साहित्य संमेलनामधून व्यक्त होतो़ दलित, आदिवासी वा भटके आहोत यापेक्षा आपण सर्व मानव आहोत ही भावना प्रत्येकामध्ये रुजावी असा या संमेलनापाठीमागचा उद्देश असतो़ संघर्ष व सहकार्य ही मानवी जीवनपद्धती आजही आदिवासींमध्ये असल्याने ते आम्हीच मूळ असल्याचे सांगतात़ मात्र काळानुसार त्यांची जीवन व कार्यपद्धती यामध्येही बदल झाले आहेत़ आदिवासी स्त्रियांचा विचार केला तर त्यांच्यावर आजही अनेक बंधने पुरुषप्रधान संस्कृतीने घातलेली आहेत़ विलासी व भोगवादी वृत्ती, संपत्तीचा हव्यास यामुळे प्रेमावर आधारित आदिवासी व्यवस्थेचा ऱ्हास झाला़स्त्रियांना गुलाम म्हणून नव्हे तर माणूस म्हणून वागणूक देण्यातच आदिवासींचा विकास व हित आहे़ यासाठी दलित साहित्य अत्यंत उपयोगी असते तरी त्यात परिवर्तन गरजेचे, असे सोनवणे यांनी सांगितले़ यावेळी व्यासपीठावर बार्टीचे महासंचालक डॉ. डी. आर. परिहार, मंत्रालयातील अपर सचिव चंदनशिवे, नगरसेवक दामोदर मानकर, विक्र ीकर सह.आयुक्त कैलास चतूर, प्रा. अनिल सिरसाठ उपस्थित होते़ दुसऱ्या सत्रात आजचा सांस्कृतिक दहशतवाद आणि दलित, आदिवासी, भटके, कष्टकऱ्यांच्या एकजुटीसमोरील आव्हाने या विषयावर परिसंवाद झाला. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत कुमार शिराळकर होते. प्रा. राजेंद्र ढवळे, प्रा. डी. ए. दळवी यांनी परिसंवादात सहभाग घेतला. यानंतर तिसऱ्या सत्रात पार पडलेल्या कविसंमेलनात जिल्हातील निमंत्रित व नवोदित कवींनी सहभाग घेतला होता़ (प्रतिनिधी)