शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कामकाजात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 00:15 IST

नाशिक : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती मुख्यालयाच्या कामकाजात ३१ मार्चपर्यंत बदल करण्यात आला असून, या कालावधीत काही विभाग पूर्णत: बंद ठेवून अन्य कार्यालयांमध्ये केवळ ५ टक्केच कर्मचारी उपस्थित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : आरोग्य विभाग सुरू; पाच विभागांचे कामकाज बंद

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती मुख्यालयाच्या कामकाजात ३१ मार्चपर्यंत बदल करण्यात आला असून, या कालावधीत काही विभाग पूर्णत: बंद ठेवून अन्य कार्यालयांमध्ये केवळ ५ टक्केच कर्मचारी उपस्थित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, लोकप्रतिनिधींनी जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती, ग्रामपंचायत कार्यालय येथे जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केले आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३१ मार्चपर्यंत कार्यालयात ५ टक्केच उपस्थिती ठेवण्याचे निर्देश दिले असून, अभ्यागतांना प्रतिबंध करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हा परिषद मुख्यालय व पंचायत समिती स्तरावर ५ टक्के उपस्थितीबाबतचे निर्देश देतानाच सार्वजनिक प्रशासन विभाग, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग, समाज कल्याण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा हे विभाग ३१ मार्चपर्यंत पूर्ण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत अत्यावश्यक आरोग्य सेवा व प्रशासनाने आदेशीत केलेल्या अत्यावश्यक सेवा कार्यरत राहणार असून, अत्यावश्यक सेवेचे काम असल्यास लोकप्रतिनिधी व सरकारी अधिकाऱ्यांनी दूरध्वनी, भ्रमणध्वनी व ई-मेलद्वारे संदेश वहन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.नाशिक जिल्हा परिषद, मुख्यालयात जिल्हा परिषद पदाधिकाºयासह सर्व लोकप्रतिनिधी व अभ्यागतांना भेटीसाठी येण्यास टाळण्याचे आवाहन करण्यात आले असून, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी नाशिक जिल्हा मुख्यालय, पंचायत समिती मुख्यालय व ग्रामपंचायत कार्यालय येथे जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.ग्रामपंचायततर्फे जनजागृतीकोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक ग्रामपंचायतीत जनजागृतीपर फलक लावण्यात येत आहेत, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत यांच्यामार्फत नागरिकांना विविध सूचना दिल्या जात आहेत. यात प्रामुख्याने हात धुण्याविषयी व गर्दी न करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात येत असून, ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. शासकीय रुग्णालय स्तरावर आवश्यक औषधी व साधनसामग्री उपलब्ध करण्यात आलेली असून, वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी प्रशासन स्तरावरून आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांनी दिली.

टॅग्स :Healthआरोग्यzpजिल्हा परिषद