शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

चांदवडला कांदा, भुसार लिलाव बंदमुळे दीड कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 22:23 IST

चांदवड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा व भुसार मालाचे लिलाव बंद आहेत. तर भाजीपाला, नागवेली पाने, झेंडूची फुले , जनावरे बाजार सुरु आहे. कांदा व भुसार लिलाव बंदमुळे बाजार समितीचे साधारणत: एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान होईल अशी माहिती बाजार समितीचे सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे यांनी दिली.

ठळक मुद्देबाजार समितीचे लिलाव लवकरच सुरू करण्याचे प्रयत्न !

चांदवड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा व भुसार मालाचे लिलाव बंद आहेत. तर भाजीपाला, नागवेली पाने, झेंडूची फुले , जनावरे बाजार सुरु आहे. कांदा व भुसार लिलाव बंदमुळे बाजार समितीचे साधारणत: एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान होईल अशी माहिती बाजार समितीचे सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे यांनी दिली.बाजार समितीने व्यापारी बैठक घेऊन कांदा लिलाव सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कांदा व भुसार शेती माल व्यापारी बैठक घेऊन सुट्ट्याचे दिवस वगळता इतर दिवशी लिलाव सुरु ठेवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. दरम्यान, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत दि. २९ ऑक्टोबर पर्यंत भुसार मालाचे लिलाव सुरु होते तर कांदा शेतीमालाचे लिलाव दि. ३० ऑक्टोबर रोजी सुरु असल्याने त्यादिवशी इतर बाजार समितीमधील लिलाव बंद असल्याने चांदवड बाजार समितीतील एक दिवसाची आवक साडेतीनशे नगावरुन एकदम सातशे नग झाल्याचे दिसून येते. दरम्यान, सर्वच बाजार समितीने दिवाळी सण हा भारतीयांचा सर्वात मोठा सण असल्याने हा सण साजरा करण्यासाठी सर्वच मजूर आपापल्या गावी दिवाळी सण साजरा करण्यासाठी जातात. त्यामुळे मजूर उपलब्ध नसल्याने यापूर्वी बाजार समितीमध्ये दिवाळी कारणाने सुट्ट्या राहत होत्या. त्यानुसार यंदाही सुट्ट्या घेतल्याचे बोलले जात असले तरी जिल्हा उपनिबंधकानी बाजार समिती फक्त दिवाळीत केवळ तीन दिवस बंद ठेवावी असा आदेश दिल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, बाजार समितीत दिवाळी सणानिमित्त झेंडू फुलांचे लिलाव सुरु राहतील तर दि. ४ नोव्हेंबर रोजी सकाळीच लिलाव राहतील असे सभापती डॉ. कुंभार्डे यांनी सांगितले.सलग जर दहा दिवस बाजार समिती दिवाळीच्या कारणाने बंद राहिली तर सर्वच शेतकऱ्यांचे हाल होतील. ऐन दिवाळीत शेतकऱ्यांची गैरसोय होऊन सर्वच अर्थव्यवस्था कोलमडेल एकतर शेतकरी सर्वच कारणाने त्रस्त आहे. त्यात बाजार समिती बंदमुळे शेतकऱ्यांची दिवाळी आनंदाची होण्याऐवजी दु:खाची होईल याकरिता भुसार व कांदा लिलाव दोन-तीन दिवसच बंद ठेवावेत म्हणजे शेतकऱ्यांची अडचण होणार नाही.- कैलास गांगुर्डे, शेतकरी चांदवडशेतकरी हितासाठी जास्तीत जास्त दिवस शेतीमालाचे लिलाव सुरु ठेवावेत याबाबत बाजार समिती व्यापारी वर्गाची बैठक घेऊन त्याबाबत निर्णय घेत आहेत. कारण जास्त दिवस बाजार समिती बंद राहिल्यास बाजार समितीच्या उत्पन्नावर परिणाम होईल याकरिता बाजार समिती कमीत कमी दिवस लिलाव बंद राहतील असे बघत आहे.- डॉ. आत्माराम कुंभार्डे, सभापती, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती, चांदवड

टॅग्स :onionकांदाMarket Yardमार्केट यार्ड