शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

चांदवडला कांदा, भुसार लिलाव बंदमुळे दीड कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 22:23 IST

चांदवड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा व भुसार मालाचे लिलाव बंद आहेत. तर भाजीपाला, नागवेली पाने, झेंडूची फुले , जनावरे बाजार सुरु आहे. कांदा व भुसार लिलाव बंदमुळे बाजार समितीचे साधारणत: एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान होईल अशी माहिती बाजार समितीचे सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे यांनी दिली.

ठळक मुद्देबाजार समितीचे लिलाव लवकरच सुरू करण्याचे प्रयत्न !

चांदवड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा व भुसार मालाचे लिलाव बंद आहेत. तर भाजीपाला, नागवेली पाने, झेंडूची फुले , जनावरे बाजार सुरु आहे. कांदा व भुसार लिलाव बंदमुळे बाजार समितीचे साधारणत: एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान होईल अशी माहिती बाजार समितीचे सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे यांनी दिली.बाजार समितीने व्यापारी बैठक घेऊन कांदा लिलाव सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कांदा व भुसार शेती माल व्यापारी बैठक घेऊन सुट्ट्याचे दिवस वगळता इतर दिवशी लिलाव सुरु ठेवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. दरम्यान, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत दि. २९ ऑक्टोबर पर्यंत भुसार मालाचे लिलाव सुरु होते तर कांदा शेतीमालाचे लिलाव दि. ३० ऑक्टोबर रोजी सुरु असल्याने त्यादिवशी इतर बाजार समितीमधील लिलाव बंद असल्याने चांदवड बाजार समितीतील एक दिवसाची आवक साडेतीनशे नगावरुन एकदम सातशे नग झाल्याचे दिसून येते. दरम्यान, सर्वच बाजार समितीने दिवाळी सण हा भारतीयांचा सर्वात मोठा सण असल्याने हा सण साजरा करण्यासाठी सर्वच मजूर आपापल्या गावी दिवाळी सण साजरा करण्यासाठी जातात. त्यामुळे मजूर उपलब्ध नसल्याने यापूर्वी बाजार समितीमध्ये दिवाळी कारणाने सुट्ट्या राहत होत्या. त्यानुसार यंदाही सुट्ट्या घेतल्याचे बोलले जात असले तरी जिल्हा उपनिबंधकानी बाजार समिती फक्त दिवाळीत केवळ तीन दिवस बंद ठेवावी असा आदेश दिल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, बाजार समितीत दिवाळी सणानिमित्त झेंडू फुलांचे लिलाव सुरु राहतील तर दि. ४ नोव्हेंबर रोजी सकाळीच लिलाव राहतील असे सभापती डॉ. कुंभार्डे यांनी सांगितले.सलग जर दहा दिवस बाजार समिती दिवाळीच्या कारणाने बंद राहिली तर सर्वच शेतकऱ्यांचे हाल होतील. ऐन दिवाळीत शेतकऱ्यांची गैरसोय होऊन सर्वच अर्थव्यवस्था कोलमडेल एकतर शेतकरी सर्वच कारणाने त्रस्त आहे. त्यात बाजार समिती बंदमुळे शेतकऱ्यांची दिवाळी आनंदाची होण्याऐवजी दु:खाची होईल याकरिता भुसार व कांदा लिलाव दोन-तीन दिवसच बंद ठेवावेत म्हणजे शेतकऱ्यांची अडचण होणार नाही.- कैलास गांगुर्डे, शेतकरी चांदवडशेतकरी हितासाठी जास्तीत जास्त दिवस शेतीमालाचे लिलाव सुरु ठेवावेत याबाबत बाजार समिती व्यापारी वर्गाची बैठक घेऊन त्याबाबत निर्णय घेत आहेत. कारण जास्त दिवस बाजार समिती बंद राहिल्यास बाजार समितीच्या उत्पन्नावर परिणाम होईल याकरिता बाजार समिती कमीत कमी दिवस लिलाव बंद राहतील असे बघत आहे.- डॉ. आत्माराम कुंभार्डे, सभापती, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती, चांदवड

टॅग्स :onionकांदाMarket Yardमार्केट यार्ड