शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

चांदवडला कांदा, भुसार लिलाव बंदमुळे दीड कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 22:23 IST

चांदवड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा व भुसार मालाचे लिलाव बंद आहेत. तर भाजीपाला, नागवेली पाने, झेंडूची फुले , जनावरे बाजार सुरु आहे. कांदा व भुसार लिलाव बंदमुळे बाजार समितीचे साधारणत: एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान होईल अशी माहिती बाजार समितीचे सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे यांनी दिली.

ठळक मुद्देबाजार समितीचे लिलाव लवकरच सुरू करण्याचे प्रयत्न !

चांदवड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा व भुसार मालाचे लिलाव बंद आहेत. तर भाजीपाला, नागवेली पाने, झेंडूची फुले , जनावरे बाजार सुरु आहे. कांदा व भुसार लिलाव बंदमुळे बाजार समितीचे साधारणत: एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान होईल अशी माहिती बाजार समितीचे सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे यांनी दिली.बाजार समितीने व्यापारी बैठक घेऊन कांदा लिलाव सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कांदा व भुसार शेती माल व्यापारी बैठक घेऊन सुट्ट्याचे दिवस वगळता इतर दिवशी लिलाव सुरु ठेवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. दरम्यान, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत दि. २९ ऑक्टोबर पर्यंत भुसार मालाचे लिलाव सुरु होते तर कांदा शेतीमालाचे लिलाव दि. ३० ऑक्टोबर रोजी सुरु असल्याने त्यादिवशी इतर बाजार समितीमधील लिलाव बंद असल्याने चांदवड बाजार समितीतील एक दिवसाची आवक साडेतीनशे नगावरुन एकदम सातशे नग झाल्याचे दिसून येते. दरम्यान, सर्वच बाजार समितीने दिवाळी सण हा भारतीयांचा सर्वात मोठा सण असल्याने हा सण साजरा करण्यासाठी सर्वच मजूर आपापल्या गावी दिवाळी सण साजरा करण्यासाठी जातात. त्यामुळे मजूर उपलब्ध नसल्याने यापूर्वी बाजार समितीमध्ये दिवाळी कारणाने सुट्ट्या राहत होत्या. त्यानुसार यंदाही सुट्ट्या घेतल्याचे बोलले जात असले तरी जिल्हा उपनिबंधकानी बाजार समिती फक्त दिवाळीत केवळ तीन दिवस बंद ठेवावी असा आदेश दिल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, बाजार समितीत दिवाळी सणानिमित्त झेंडू फुलांचे लिलाव सुरु राहतील तर दि. ४ नोव्हेंबर रोजी सकाळीच लिलाव राहतील असे सभापती डॉ. कुंभार्डे यांनी सांगितले.सलग जर दहा दिवस बाजार समिती दिवाळीच्या कारणाने बंद राहिली तर सर्वच शेतकऱ्यांचे हाल होतील. ऐन दिवाळीत शेतकऱ्यांची गैरसोय होऊन सर्वच अर्थव्यवस्था कोलमडेल एकतर शेतकरी सर्वच कारणाने त्रस्त आहे. त्यात बाजार समिती बंदमुळे शेतकऱ्यांची दिवाळी आनंदाची होण्याऐवजी दु:खाची होईल याकरिता भुसार व कांदा लिलाव दोन-तीन दिवसच बंद ठेवावेत म्हणजे शेतकऱ्यांची अडचण होणार नाही.- कैलास गांगुर्डे, शेतकरी चांदवडशेतकरी हितासाठी जास्तीत जास्त दिवस शेतीमालाचे लिलाव सुरु ठेवावेत याबाबत बाजार समिती व्यापारी वर्गाची बैठक घेऊन त्याबाबत निर्णय घेत आहेत. कारण जास्त दिवस बाजार समिती बंद राहिल्यास बाजार समितीच्या उत्पन्नावर परिणाम होईल याकरिता बाजार समिती कमीत कमी दिवस लिलाव बंद राहतील असे बघत आहे.- डॉ. आत्माराम कुंभार्डे, सभापती, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती, चांदवड

टॅग्स :onionकांदाMarket Yardमार्केट यार्ड