शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
2
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
5
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
6
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
7
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
8
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
9
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
10
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
11
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
12
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
14
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
15
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
16
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
17
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
18
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
19
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
20
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

कांदा लिलाव प्रश्नी तोडग्याची शक्यता

By admin | Updated: July 28, 2016 01:52 IST

आज निर्णय : पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे वेगवेगळ्या बैठका

 नाशिक : कांदा गोणीत भरून आणण्याला शेतकऱ्यांचा प्रखर विरोध होऊ लागला असून, बुधवारी (दि.२७) जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचा लिलाव त्यामुळे बंद होता. कांदाप्रश्नी तोडगा काढण्यासाठी उद्या गुरुवारी (दि.२८) पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे दोन वेगवेगळ्या बैठकांचे आयोजन करण्यात आले असून, त्यात तोडगा निघण्याची शक्यता आहे.दरम्यान, बाजार समिती नियमनमुक्त करण्याच्या अध्यादेशात सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने २० जणांची समिती नियुक्त केली असून, त्यात राष्ट्रवादीचे माजी खासदार व नाशिक बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांची नियुक्ती केली आहे. पिंगळे यांच्यासह बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र राऊत यांचाही (पान ५ वर)बाजार समिती प्रतिनिधी म्हणून समावेश करण्यात आला आहे. या २० जणांच्या समितीत माथाडी प्रतिनिधी म्हणून नरेंद्र पाटील, अडते प्रतिनिधी म्हणून सोहनलाल भंडारी व अशोक हांडे, आमदार शरद सोनवणे, व्यापारी प्रतिनिधी म्हणून बाळासाहेब बेंडे, शंकर पिंगळे यांचा समावेश आहे. तर शेतकरी म्हणून भाजपा नेते पाशा पटेल यांचा या २० जणांच्या समितीत समावेश करण्यात आला आहे. या समितीची बैठक गुरुवारी दुपारी चार वाजता पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत होणार आहे. या समितीने सुचविलेल्या शिफारशीनुसार बाजार समिती नियमनमुक्त अध्यादेशात सुधारणा करण्यात येणार आहे.कांदा गोणीत आणला तरच लिलाव पुकारण्याची घेतलेली व्यापाऱ्यांची भूमिका आडमुठी व शेतकरी विरोधी असल्यामुळे स्वाभिमान शेतकरी संघटनेने विरोध केला आहे. बुधवारी कळवणला या गोणी मार्केटला विरोध करण्यासाठी रास्ता रोको करण्यात आला. तर बागलाणला तहसीलदारांना कांद्या गोणीची भेट देण्यात आली. येवला तसेच मुंगसे उपबाजारही बंदच होता. पणनमंत्र्यांच्या उपस्थितीत दुपारी बारा वाजता होणारी व्यापारी प्रतिनिधींची बैठक व चार वाजता २० सदस्यांच्या समितीच्या बैठकीतूनच यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)