शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

नव्या पिढीसमोर विकृत गुन्हेगारीचे आव्हान - तेलंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:44 IST

बदलणाऱ्या काळानुसार समाजासमोरील आव्हानेही बदलत असतात. त्याचप्रमाणे १९८० पूर्वीची पिढी आणि १०८० नंतरच्या पिढीत मोठ्या प्रमाणात बदल झाले असून, नव्या पिढीसमोर विकृत गुन्हेगारीचे आव्हान उभे असल्याचे प्रतिपादन जेष्ठ व्याख्याते अजितकुमार तेलंग यानी केले.

नाशिक : बदलणाऱ्या काळानुसार समाजासमोरील आव्हानेही बदलत असतात. त्याचप्रमाणे १९८० पूर्वीची पिढी आणि १०८० नंतरच्या पिढीत मोठ्या प्रमाणात बदल झाले असून, नव्या पिढीसमोर विकृत गुन्हेगारीचे आव्हान उभे असल्याचे प्रतिपादन जेष्ठ व्याख्याते अजितकुमार तेलंग यानी केले.  गोदाघाटावरील नाशिक वसंत व्याख्यानमालेत बुधवारी (दि.२३) तेविसावे पुष्प गुंफताना ते बोलत होते. कांतिबेन शाह यांच्या स्मृतीत ‘नव्या पिढीच्या, नव्या दमाच्या समाजापुढील आव्हाने’ विषयावर बोलताना अजित कुमार यांनी मानवाच्या आदीमानवापासून ते आतापर्यंतच्या पिढ्यांमध्ये घडून आलेले विविध बदल सांगितले. ते म्हणाले, रामायण, महाभारताच्या काळापासून गुन्हेगारीचे अस्तित्व असले तरी सध्याच्या पिढीमधील गुन्हेगारीने अतिशय विकृत स्वरूप प्राप्त केले आहे. खून, बलात्कारांच्या वाढत्या भयानक घटनांसोबतच अ‍ॅसिड हल्ले आणि ब्लेड हल्ल्यातून या विकृत गुन्हेगारी दिसून येत आहे. मृतदेहाची विटंबना करण्याचे प्रकारही सर्रास घडत आहेत. ही नव्या पिढीसमोरील आव्हाने असून, याचा नव्या पिढीच्या समाजालाही सामना करावा लागणार आहे.  १९८० नंतरच्या पिढीत गुणसूत्रातील तिसरा धागा जागृत झाला असून, त्याचा प्रभाव मानवी जिवनावरही दिसून येऊ लागल्याने तरुण पिढीचे एकावेळी केवळ एकच ज्ञानेंद्रिय पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याने या पिढीकडून तुलनेत अधिक प्रयत्नांनंतर प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.  आजचे व्याख्यान,  विषय : मायबाप : एक कृतज्ञता ,  वक्ते : कवी राजेंद्र उगले

टॅग्स :Nashikनाशिक