शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

थेट लढतीने घोलप यांच्यापुढे आव्हान

By sandeep.bhalerao | Updated: October 12, 2019 00:23 IST

शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या देवळाली मतदारसंघात इतर कोणत्याही पक्षाला वर्चस्व निर्माण करता आलेले नसल्याने माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कुटुंबीयांभोवतीच येथील राजकारण कायम फिरत राहिले. गेल्या तीस वर्षांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या घोलप कुटुंबीयांसाठी यंंदाची निवडणूक मात्र अस्तित्वाची लढाई ठरणारी आहे. मतदारसंघातील पहिल्या महिला उमेदवार आणि घोलप यांना आव्हान देण्याची त्यांनी दाखविलेली जिद्द यामुळे घोलप यांना यंदाची निवडणूक गांभीर्यानेच घ्यावी लागणार आहे.

ठळक मुद्दे देवळालीत तीस वर्षानंतर बदलत्या समीकरणाने चुरस

शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या देवळाली मतदारसंघात इतर कोणत्याही पक्षाला वर्चस्व निर्माण करता आलेले नसल्याने माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कुटुंबीयांभोवतीच येथील राजकारण कायम फिरत राहिले. गेल्या तीस वर्षांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या घोलप कुटुंबीयांसाठी यंंदाची निवडणूक मात्र अस्तित्वाची लढाई ठरणारी आहे. मतदारसंघातील पहिल्या महिला उमेदवार आणि घोलप यांना आव्हान देण्याची त्यांनी दाखविलेली जिद्द यामुळे घोलप यांना यंदाची निवडणूक गांभीर्यानेच घ्यावी लागणार आहे.अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात घोलप यांना नेहमीच मतविभागणीचा फायदा झालेला आहे किंबहुना त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये अनेकांना रिंगणात उतरवून तशी राजकीय खेळी यशस्वी करूनही दाखविलेली आहे. त्यांचे हे काम यंदा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीमुळे आपसूकच घडून येईल, असे मनसुबे आखले गेले मात्र वंचित आघाडी मतदारसंघात किती मुसंडी मारणार यावरही बरेचकाही अवलंबून असणार आहे.घोलप यांच्यासमोर उभे राहण्याचा चंग बांधलेल्या सरोज अहिरे यांनी युतीच्या घोषणेनंतर भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्टÑवादीकडून उमेदवारी मिळवून लक्ष वेधून घेतले आहे. अहिरे यांची उमेदवारी देवळालीतील समीकरण बदलवणारी ठरू शकते. अर्थात घोलप यांच्या पारंपरिक मतदारसंघात मतदारांपर्यंत पोहोचणे आणि आपली भूमिका त्यांच्यात रुजविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे.बहुतांश ग्रामीण भाग या मतदारसंघाला जोडला असल्यामुळे त्या किती लोकांपर्यंत पोहोचू शकतात हाही मुद्दा महत्त्वाचा ठरणारा आहे. लक्ष्मण मंडाले यांना राष्टÑवादीची उमेदवारी मिळाली नसली तरी त्यांनी केलेल्या तयारीमुळे मनसेकडून रिंगणात असलेल्या त्यांच्या मुलाच्या पारड्यात पडणारे मतदानही राष्टÑवादीचे समीकरण बिघडवू शकतात.बहुतांश ग्रामीण भाग असलेल्या या मतदारसंघात अन्य उमेदवारांची दमछाक होऊ शकते. अर्थात मतदारांची भूमिकाही महत्त्वाची ठरणारी आहे.मतदारसंघातीलकळीचे मुद्देनासाका आणि एकलहरे प्रकल्पाचा प्रलंबिंत प्रश्न.४बेरोजगारी नष्ट करण्यासाठी रोजगाराची साधने निर्माण करण्यास अपयश.४ग्रामीण भागाला तीस वर्षांपासून शाश्वत विकासाची प्रतीक्षा.४पर्यटन, शिक्षण आणि उद्योग प्रकल्प नाही.४व्यक्तिकेंद्रित राजकारणाचा मुद्दा.मतविभागणी होण्याची शक्यता कमीचदेवळाली मतदारसंघात नेहमीच बंडखोर आणि अपक्षांच्या मतविभागणीचा लाभ शिवसेनेला झालेला आहे. यंदा केवळ चारच अपक्ष आहेत तर वंचितच्या प्रभावाची चर्चा नसल्याने त्याचा फटका सेनेला बसण्याची शक्यता आहे.४घोलप यांच्याविरुद्ध यापूर्वी उमेदवारी करणारे तेच ते चेहरे पक्ष आलटून-पालटून उभे राहिले, त्याचा लाभ घोलप यांनाच होत गेला. अनुसूचित जातीसाठी राखीव असा हा मतदारसंघ असताना समाजाच्या राजकारणामुळे अन्य उमेदवारांना अपेक्षित मते मिळत नाहीत. यंदा सरोज अहिरे-घोलप यांची पारंपरिक मते खेचण्याची शक्यता आहे.बदललेली समीकरणेसर्वसाधारण ते राखीव मतदारसंघ असा या मतदारसंघाचा प्रवास आहे. १९७४ पर्यंत नाशिक-देवळाली हा सर्वसाधारण मतदारसंघ होता. १९७८ मध्ये हा मतदारसंघ राखीव झाला आणि बाबुलाल अहिरे यांनी या मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले.या मतदारसंघाने विधानसभा आणि लोकसभेतही शिवसेनेला भक्कम साथ दिली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला येथून ४२ हजार मतांची आघाडी मिळालेली आहे. बबनराव घोलप यांच्या रूपाने मतदारसंघाला मंत्रिपदही मिळाले.१९८५ मध्ये पुलोद आघाडीमध्ये या मतदारसंघातून भाजपाचे भिकचंद दोंदे यांनी प्रथमच कमळ फुलविले आहे. १९९० मध्ये युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला आणि शिवसेनेचे उत्तर महाराष्टÑातील पहिले आमदार म्हणून बबनराव घोलप निवडून आले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019devlali-acदेवळालीYogesh Gholapयोगेश घोलप