शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

चक्रीबससेवा अवघ्या दहा दिवसांतच बंद

By admin | Updated: July 3, 2015 23:26 IST

चक्रीबससेवा अवघ्या दहा दिवसांतच बंद

नाशिक : नागरिकांच्या आग्रहास्तव सुरू करण्यात आलेली चक्रीबससेवा अवघ्या दहा दिवसांतच बंद करण्यात आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महामंडळाकडून या संदर्भात कोणतेही कारण देण्यात आले नसले तरी उत्पन्नाचे कारण पुढे केले जाण्याची शक्यता आहे. मात्र उत्पन्न वाढीबाबत विचार करण्याऐवजी बसच बंद करण्याच्या प्रकाराने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इंदिरानगरसारख्या दाट लोकवस्तीच्या ठिकाणी खासगी प्रवासी वाहनांना चांगला प्रतिसाद मिळत असताना एस.टीच्या बससेवेला मात्र घरघर लागलअवघ्या दहा दिवसांत झाली बससेवा बंदेली आहे. या परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी वर्गाकडून नेहमीच बससेवेची मागणी केली जाते, परंतु बससेवेचा शुभारंभ झाल्यानंतर काही दिवसांतच बस बंद होते. यंदाही असाच प्रकार घडला. निमाणी-राणेनगर व्हाया गजानन महाराज चक्री बससेवा गेल्या दहा दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आली होती. शुभारंभाचा कार्यक्रमही या ठिकाणी घेण्यात आला. मात्र सध्या ही बस बंद झाली आहे. बस बंद करताना महामंडळाने कोणतेही कारण न देता अचानकच सेवा बंद केली. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे. आता पुन्हा बस सुरू करण्यासाठी महामंडळाच्या पायऱ्या झिजवाव्या लागणार असल्याने ज्येष्ठांनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे. वास्तविक बससेवा सुरू करण्यात आल्यानंतर या बसचा मार्ग आणि वेळ प्रवाशांना माहित होत नाही तोपर्यंत काहीप्रमाणात प्रतिसाद कमी होऊ शकतो. शिवाय ज्या थांब्यावर बसेस थांबल्या जातात तेथे कोणतेही वेळापत्रक नसल्याने बस येण्या-जाण्याची नक्कीवेळ नागरिकांना माहित होत नाही. त्यामुळे बसेसला प्रतिसाद कमी मिळू शकतो, परंतु त्यातून लागलीच प्रतिसाद मिळत नसल्याचाच निष्कर्ष काढणे चुकीचे असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)