शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
९ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी अन्... विजयच्या रॅलीत ३६ जणांचा मृत्यू, पाण्याच्या बाटल्या फेकत होता अभिनेता
3
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
4
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
5
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
6
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
7
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
8
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
9
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
10
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
11
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
12
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
13
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
14
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
15
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
16
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
17
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
18
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
19
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
20
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद

संमेलनाचा अध्यक्ष हिंडता-फिरता असावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2021 01:43 IST

साहित्य महामंडळाच्या घटनेत तीन वर्षांपूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर गतवर्षीच्या संमेलनावेळी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी प्रकृती बरी नसतानाही व्हीलचेअरवर येऊन किमान उद्घाटनाच्या सोहळ्याला उपस्थिती लावून १ तास भाषण केले होते. मात्र, या संमेलनास ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर प्रकृतीच्या कारणास्तव येऊच शकले नाहीत. ते असते तर रसिकांना अधिक आनंद मिळाला असता. या दोन संमेलनांचा अनुभव पाहता महामंडळाला आपल्या घटनेत केलेल्या दुरुस्तीत पुन्हा दुरुस्ती करण्याची वेळ येते की काय, असे आता वाटू लागले आहे. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हा किमान हिंडता, फिरता असावा, अशा शब्दांत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर यांच्या गैरहजेरीविषयी अप्रत्यक्ष नाराजी महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देकौतिकराव ठाले पाटील : तर साहित्य महामंडळाची घटना बदलावी लागेल

नाशिक : साहित्य महामंडळाच्या घटनेत तीन वर्षांपूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर गतवर्षीच्या संमेलनावेळी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी प्रकृती बरी नसतानाही व्हीलचेअरवर येऊन किमान उद्घाटनाच्या सोहळ्याला उपस्थिती लावून १ तास भाषण केले होते. मात्र, या संमेलनास ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर प्रकृतीच्या कारणास्तव येऊच शकले नाहीत. ते असते तर रसिकांना अधिक आनंद मिळाला असता. या दोन संमेलनांचा अनुभव पाहता महामंडळाला आपल्या घटनेत केलेल्या दुरुस्तीत पुन्हा दुरुस्ती करण्याची वेळ येते की काय, असे आता वाटू लागले आहे. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हा किमान हिंडता, फिरता असावा, अशा शब्दांत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर यांच्या गैरहजेरीविषयी अप्रत्यक्ष नाराजी महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी व्यक्त केली. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनपर भाषणात बोलताना कौतिकराव ठाले पाटील यांनी गेल्या वर्षापासून साहित्य संमेलन घेण्याचे ठरले होते, परंतु वर्षभरात गोदावरीच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. परंतु, उशिरा का होईना संमेलन पार पडत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, अखिल भारतीय साहित्य महामंडळाने तीन वर्षांपूर्वी घटनेत दुरुस्ती केली. संहितेत बदल केले. परंतु दुसऱ्या व तिसऱ्या साहित्य संमेलनात ऐन वेळी अडचणी उभ्या राहिल्या. पहिले साहित्य संमेलन पार पडले. उस्मानाबाद येथील दुसऱ्या साहित्य संमेलनासाठी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. राज्यभर त्यांनी सत्कार स्वीकारले, परंतु संमेलन दोन-तीन दिवसांवर आले असतानाच त्यांच्या पाठीच्या मणक्याचा त्रास सुरू झाल्याने त्यांना डॉक्टरांनी प्रवासास मनाई केली. मात्र, उस्मानाबादकरांची अडचण लक्षात घेऊन दिब्रिटो यांनी विमानाऐवजी रेल्वेने प्रवास करून व्हीलचेअरवर संमेलन गाठले व तीन तास संमेलनात हजर राहून मार्गदर्शनही केले. साहित्य संमेलनात होणारा लाखोंचा खर्च वाया जाऊ नये व महामंडळाची अडचण होऊ नये, अशी त्यांची त्यामागची भूमिका होती, असे सांगून ठाले पाटील यांनी मला जयंत नारळीकरांना दोष द्यायचा नाही, परंतु नारळीकरांची सर्व व्यवस्था करायला संयोजक तयार असताना त्यांनी एक किंवा अर्ध्या तासासाठी तरी हजेरी लावली असती, तर साऱ्यांना आनंद झाला असता, असे सांगितले.

साहित्य महामंडळाकडून अध्यक्ष निवडण्यासाठी केलेल्या घटना दुरुस्तीत पुन्हा बदल करावा लागतो की काय, याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपल्याचे सांगतानाच ठाले पाटील यांनी, ऐन वेळी कधी काय घडेल, हे सांगता येत नाही, त्यामुळे यापुढे जागरूकपणे अध्यक्ष निवडण्याची आवश्यकता असून, यापुढे तरी अध्यक्ष हा हिंडता, फिरता असावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली. तीनदिवसीय या संमेलनात भरगच्च कार्यक्रम आहेत. हल्ली संमेलनाचे स्वरूप बदलत चालले असून, हे बदल नेहमी संथगतीने होत असतात, असे सांगून ठाले पाटील यांनी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांनी एका लेखात केलेल्या टीकेचा समाचार घेतला. ते म्हणाले, मराठीतील थाेर साहित्यिकांना यापूर्वी अनेक मोठमोठे पुरस्कार मिळाले. वृत्तपत्रांनी त्यांची दखल घेऊन पुरवण्या काढल्या, महिनोन् महिने त्यावर चर्चा झाली, साहित्यिकांचे सत्कार झाले. परंतु सरस्वती पुरस्कार मिळालेल्या लिंबाळे यांनी साहित्य संमेलनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित करून त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. गालबोट लावले. मला स्वत:ला बेशरम म्हटले तर या साहित्य संमेलनाला जातपातीत अडकून ठेवण्याचा प्रयत्न केला. मुळात संमेलनात लिंबाळे यांचा सत्कार करण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु, त्यापूर्वीच त्यांनी संमेलनाविषयी भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सत्कार हा कोणाला मागून मिळत नसतो, तो लोकांनी करायचा असतो, त्यामुळे शरणकुमार लिंबाळे यांनी त्याचे आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही शेवटी ठाले पाटील यांनी दिला.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिकKautikrao Thale Patilकौतिकराव ठाले-पाटील