शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

मनपासह सर्व शाळांमध्ये सेंट्रल किचनचे भोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 01:52 IST

शहरातील बचत गटांचा रोजगार असलेले मध्यान्ह भोजनाचे काम आता सेंट्रल किचन अंतर्गत निवडलेल्या ठेकेदारांमार्फतच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात महापालिकेच्या जून महिन्यात झालेल्या महासभेत ठराव झाला असला तरी शिक्षण खात्याने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा, असे पत्र दिल्याने अखेर ठराव फेटाळला गेला आहे. आता येत्या १ आॅक्टोबरपासून शहरातील २७५ शाळांमध्ये सेंट्रल किचनव्दारे भोजन दिले जाणार आहे.

ठळक मुद्देमहासभेचा ठराव फेटाळला : १ आॅक्टोबरपासून शुभारंभ

नाशिक : शहरातील बचत गटांचा रोजगार असलेले मध्यान्ह भोजनाचे काम आता सेंट्रल किचन अंतर्गत निवडलेल्या ठेकेदारांमार्फतच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात महापालिकेच्या जून महिन्यात झालेल्या महासभेत ठराव झाला असला तरी शिक्षण खात्याने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा, असे पत्र दिल्याने अखेर ठराव फेटाळला गेला आहे. आता येत्या १ आॅक्टोबरपासून शहरातील २७५ शाळांमध्ये सेंट्रल किचनव्दारे भोजन दिले जाणार आहे.महापालिका हद्दीतील बहुतांशी शाळांना बचत गटामार्फतच पोषण आहार दिला जातो. परंतु यंदा उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेऊन राज्यातील सर्वच प्राथमिक शाळांमध्ये राज्य सरकारच्या वतीने मध्यान्ह भोजन देण्याची योजना आखण्यात आली. विशेष म्हणजे नव्या शैक्षणिक वर्षापासून ती सुरू करता यावी यासाठी राज्य शासनाने लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असताना निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन निविदा मागवण्यात आल्या होत्या. निवडणूक आचारसंहिता संपताच त्यावरून राजकीय पक्षांनी पुढाकार घेत सेंट्रल किचनला काम देण्यास विरोध केला होता. महापौर रंजना भानसी यांनीदेखील सेंट्रल किचनला विरोध दर्शवताना बचत गटांनाच काम देण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांकडे जाण्याची तयारी दर्शविली होती. २५ जून रोजी यासंदर्भात महापालिकेच्या महासभेत चर्चा झाल्यानंतर बचत गटांना काम देण्याचा ठराव करण्यात आला होता. यासंदर्भात राज्य शासनाच्या शिक्षण खात्याकडे मनपाचे शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी सर्व माहिती सादर केली.तथापि, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सेंट्रल किचन राबविण्याचे आदेश देण्यात आल्याने महासभेचा ठराव फेटाळण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.सव्वा लाख मुलांना मिळणार भोजननाशिक महापालिकेच्या ९० शाळांसह एकूण २७५ प्राथमिक अनुदानित शाळा असून, त्यातील १ लाख १८ हजार ७१० मुलांना आता शासनाच्या सेंट्रल किचनच्या माध्यमातून मध्यान्ह भोजन मिळू शकणार आहे. विशेष म्हणजे आदर्श आचारसंहिता सुरू असताना राज्य शासनाने योजना आखली आणि त्याचवेळी निविदा प्रक्रिया सुरू झाली. त्याचवेळी अनेक स्थानिक ठेकेदार आणि बचत गटांनी त्यात सहभाग घेतला आणि सध्या १३ जणांना हे काम देण्यात आले आहे.महिनाभराने अंमलबजावणीराज्य शासनाचा निधी असल्याने महापालिकेच्या स्थायी समितीवर कायदेशीरदृष्ट्या हा प्रस्ताव पाठविला गेला नाही. सध्या बचत गटांनी पोषण आहारासाठी तांदूळ खरेदी करून ठेवला असल्याने मनपा हद्दीत सप्टेंबर महिन्यापर्यंत बचत गटांनाच काम असेल त्यानंतर १ आॅक्टोबरपासून मध्यान्ह भोजन योजना सुरू होईल.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcommissionerआयुक्त