शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
4
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
5
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
6
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
7
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
8
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
9
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
10
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
11
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
12
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
13
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
14
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
15
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
16
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
17
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
18
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
19
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
20
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?

केंद्र सरकार, भांडवलदारांविरोधात हा श्रमिकांचा लढा : ढवळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 02:01 IST

नवीन कृषी कायदे शेतकरीविरोधी असून, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळण्याऐवजी त्याची लूट होईल, त्याचप्रमाणे करार शेती कायद्यामुळे भांडवलदारांना अपेक्षित उत्पादन मिळू शकले नाही, तर शेतकऱ्यांच्या जमिनीही भांडवलदार कंपन्यांच्या घशात जातील, अशा तरतुदी केंद्र सरकारने भाजप, आरएसएस आणि अडाणी, अंबानी यांसारख्या भांडवलदारांच्या दबावातून केल्याचा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे यांनी केला आहे. 

नाशिक : नवीन कृषी कायदे शेतकरीविरोधी असून, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळण्याऐवजी त्याची लूट होईल, त्याचप्रमाणे करार शेती कायद्यामुळे भांडवलदारांना अपेक्षित उत्पादन मिळू शकले नाही, तर शेतकऱ्यांच्या जमिनीही भांडवलदार कंपन्यांच्या घशात जातील, अशा तरतुदी केंद्र सरकारने भाजप, आरएसएस आणि अडाणी, अंबानी यांसारख्या भांडवलदारांच्या दबावातून केल्याचा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे यांनी केला आहे. हे कारस्थान आता शेतकरी, श्रमिकांच्या लक्षात आले असून, आता ही लढाई केंद्र सरकारसह भांडवल दारांविरोधात या देशातील श्रमिक अशी झाली असून, या शेतकऱ्यांचाच विजय निश्चित असल्याचा विश्वास केरळचे खासदार के. के. रागेश यांनी व्यक्त केला.नाशिकमध्ये जमलेल्या आंदोलकांना संबोधित करताना ते सोमवारी (दि.२३) बोलत होते. यावेळी त्यांनी आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, दिल्लीत वेगवेगळ्या राज्यांतील शेतकऱ्यांनी दिल्लीत जाणारे पाचही राष्ट्रीय महामार्ग रोखले आहेत. त्यांच्या आंदोलनाला नाशिकधून निघणारे राज्यभरातील शेतकरी बळ देतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांच्यासोबत नरसय्या आडम,  जे. पी. गावीत, सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डी. एल. कराड, किसान सभेचे राज्य अध्यक्ष किसान गुज्जर, सचिव अजित नवले, राजू देसले आदी विविध संघटनांच्या नेत्यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले.तीन हजार शेतकरी, कामगारांचा सहभागकेंद्र सरकारने आणलेले नवीन तीन कृषी उत्पादन, व्यापार आणि करार शेतीसंदर्भातील कायदे हे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप आंदोलकांनी केला त्याचप्रमाणे केंद्राने कामगारांच्या विरोधातही चार कायदे आणल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळेच या आंदोलनात सुमारे तीन हजारहून अधिक शेतकरी व कामगारांनी सहभाग नोंदविल्याची माहिती समन्वयकांनी दिली. तीन हजार शेतकरी, कामगारांचा सहभागकेंद्र सरकारने आणलेले नवीन तीन कृषी उत्पादन, व्यापार आणि करार शेतीसंदर्भातील कायदे हे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप आंदोलकांनी केला त्याचप्रमाणे केंद्राने कामगारांच्या विरोधातही चार कायदे आणल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळेच या आंदोलनात सुमारे तीन हजारहून अधिक शेतकरी व कामगारांनी सहभाग नोंदविल्याची माहिती समन्वयकांनी दिली.

टॅग्स :NashikनाशिकFarmer strikeशेतकरी संप